शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

दरा फाट्यावर प्रवासी निवारा नसल्याने प्रवाशांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:30 IST

कोरोना संकट काळात शाळा बंद होत्या. पण आज हळूहळू का होईना शाळा पूर्वपदावर येत आहेत. त्यात आता विद्यार्थ्यांसह वाढती ...

कोरोना संकट काळात शाळा बंद होत्या. पण आज हळूहळू का होईना शाळा पूर्वपदावर येत आहेत. त्यात आता विद्यार्थ्यांसह वाढती प्रवासी संख्या आणि उन्हाचे वाढते तापमान याबाबत आता विचार होणे गरजेचे झाले आहे. दरा फाट्यावरून खेतियाकडून धडगावकडे जाणारे तसेच म्हसावद, रामपूर, कन्साई, नवलपूर, आवगे, दरा, फत्तेपूर जाण्यासाठी जवळील प्रवाशांना दराफाटा येेथे यावे लागते. परंतु या ठिकाणी प्रवासी निवाराच नसल्याने प्रवशांना भर उन्हात ताटकळत बस किंवा इतर वाहनांची उभे राहून प्रतीक्षा करावी लागते. कोळदा-खेतिया रस्ता रुंदीकरणासाठी जी झाडे होती तेदेखील तोडण्यात आले असून नव्याने लावण्यात आलेली झाडे दिसेनाशी झाली असून तो संशोधनाचा विषय ठरत आहे. कारण त्या नव्याने लावण्यात आलेल्या झाडांकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाल्याने पाण्याअभावी झाडे सुकून गायब झाली आहेत.

वाढत्या उन्हात या ठिकाणी एकही छत नसल्याने एखाद्या वयोवृद्ध इसमाचा किंवा बालकाचा जीव धोक्यात येऊ शकतो ही शक्यताही नाकारता येत नाही. लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती ते ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत नेहमीच परिसरातील गावे चर्चेत राहत असतानासुद्धा या ठिकाणी प्रवाशांच्या सोयीसाठी लोकप्रतिनिधी व राजकारणी मंडळी अशा वेळी जातात कुठे? असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.

धुळीने प्रवासी हैराण

कोळदा-खेतिया आंतरराज्य मार्गाचे रुंदीकरणाचे काम सुरू आहे. पण ज्या-ज्या ठिकाणी कामे झालीत ते सोडून जे काम अपूर्ण आहे त्या-त्या ठिकाणी दिवसातून कितीदा पाण्याचा शिडकावा होतो. प्रवाशांना धुळीमुळे रोजचा किती त्रास होतो याची थोडी तरी जाणीव आहे का कुणाला? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.