शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

टपावरुन प्रवासी वाहतुक बंदीसाठी काढल्या कॅरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 12:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : आधीच अवघड व अपघातग्रस्त ठरणा:या तळोदा ते धडगाव मार्गाने खाजगी प्रवासी वाहतुक करणा:या वाहनधारकांकडून ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : आधीच अवघड व अपघातग्रस्त ठरणा:या तळोदा ते धडगाव मार्गाने खाजगी प्रवासी वाहतुक करणा:या वाहनधारकांकडून जिपगाडय़ांच्या टपावरुन प्रवाशांची धोकेदायक वाहतुक करण्यात येते. अशा वाहतुकीवर तळोदा पोलीसांमार्फत बंदी करण्यात आली आहे. पुन्हा अशी वाहतुक              होऊ नये म्हणून या मार्गावर प्रवासी वाहतुक करणा:या प्रत्येक जिपगाडय़ांच्या कॅरीही काढण्यात आल्या आहे.तळोदा ते धडगाव हा मार्ग वळणदार असून तो जिल्ह्यातील सर्वाधिक धोक्याचा मार्ग  असल्याचे सांगण्यात येते. तिव्र चढ-उतार, अरुंद त्याशिवाय अगदी गोलाकार स्वरुपाचे वळणे या  मार्गावर आहेत. त्यामुळे हा   रस्ता बहुतांश वाहतुकीला अवघड ठरत असून धोक्याचा  देखील आहे. त्यामुळे या मार्गावर  मोठी वाहतुक सुरूच करण्यात आली नाही. रस्त्याच्या प्रतिकुल परिस्थितीमुळे मोठय़ा बसेस  देखील जाऊ शकत नसल्यामुळे नंदुरबार आगारामार्फत मिनी बससेवा सरू करण्यात आली होती. परंतु अतिवृष्टीत हा मार्ग अधिकच खराब झाल्याने ही बससेवा देखील बंद करण्यात आली     आहे. ही वाहतुक करतांना प्रवाशांना वाहनाच्या टपावरील कॅरीचा आधार दिला जातो. कॅरीच्या आधारे वाहनात जेवढे प्रवासी बसतात, त्याहीपेक्षा अधिक        प्रवासी टपावर बसविले जात  होते. त्याशिवाय जिपगाडय़ांच्या  तिन्ही बाजूला देखील प्रवासी  उभे करीत वाहतुक करण्यात येत होती. साध्या प्रवासालाच  धोक्याचा ठरत असतानाच या  मार्गाने बहुतांश जिपगाडय़ांच्या टपावरुन प्रवाशांची वाहतुक  करण्यात येत होती. ही वाहतुक प्रवाशांसाठी जीवघेणी ठरत  असल्याने कधीही मोठय़ा अपघाताची शक्यता वर्तविण्यात आली. संभाव्य धोके तथा अपघात टाळत प्रवाशांना  सुरक्षीत प्रवास करता यावा,  यासाठी तळोदा पोलीसांमार्फत या जीवघेण्यात प्रवासी वाहतुकीवर  काही अंशी नियंत्रण आणले आहे. काही वर्षापासून टपावरुन प्रवासी वाहतुक करणा:या प्रत्येक वाहनांच्या कॅरी काढण्याचे  निर्देश तळोदा पोलीसांमार्फत  देण्यात ओ होते. पोलीसांच्या आदेशाचे तंतोतंत पालन करीत सर्वच वाहनधारकांनी देखील आपापल्या वाहनावरील कॅरी   काढून ठेवल्या आहेत. त्यामुळे अनेक वर्षापासून सुरू असलेली जीवघेणी वाहतुक सुखरुप झाल्याचे म्हटले जात आहे. जनहितासाठी पोलीस प्रशासनामार्फत घेण्यात आलेल्या निर्णयाचे केवळ प्रवाशांमधूनच नव्हे तर खाजगी प्रवासी वाहतुक करणा:या वाहनधारकांकडूनही कौतुक   करण्यात येत आहे. 

कॅरीचा आधार देत प्रवाशांना टपावर बसवून त्यांची वाहतुक करणे वाहनधारकांच्या आर्थिक उन्नतीचे होतेच, परंतु प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ही बाब अत्यंत धोक्याची होती. वाहनधारकांचे आर्थिक नुकसान होत असले तरी जीवीत हानी टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाने घेतलेला हा निर्णय जनहिताचा ठरतो. टपावरुन होणारी वाहतुक थांबविण्यासाठी कॅरी काढण्यात आल्याने प्रवाशांना सामान ठेवण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. तळोदा ते धडगाव या मार्गावरुन प्रवास करणा:या प्रत्येक प्रवाशांकडे मोठा सामान असतो. हा सामान वाहनात ठेवल्यास प्रवाशांना बसण्यास अडचण येते. त्यामुळे सामान वाहनाच्या टपावर ठेवणेच अधिक योग्य ठरते. परंतु प्रत्येक वाहनाच्या कॅरीच काढल्यामुळे प्रवाशांना सामान ठेवण्याच्या अडचणी निर्माण झाल्या आहेत.