शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
2
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
3
धनंजय मुंडेंनी माफी मागावी! ‘वंजारा-बंजारा एकच’ वक्तव्यावरून बंजारा समाज आक्रमक
4
Video: बुडत्याला काडीचा आधार! कुणी खांबावर चढून, तर कुणी झाडाच्या फांदीला लटकून वाचवला जीव...
5
बँकांमध्ये बदलल्या जातात कापलेल्या-फाटलेल्या नोटा, परंतु 'या'साठी मिळू शकतो नकार; काय आहे RBI चा नियम?
6
Robin Uthappa: माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाला ईडीचे समन्स, ऑनलाइन बेटिंग प्रकरणात चौकशी!
7
९० लाख रोख अन् १ कोटीचे सोन्याचे दागिने... महिला अधिकाऱ्याच्या घरी सापडलं कोट्यवधींचं घबाड
8
IPO News: १८ सप्टेंबरला उघडणार 'या' कंपनीचा ५६०.२९ कोटी रुपयांचा IPO; काय आहेत डिटेल्स?
9
अंत्ययात्रा काढली, चितेवर ठेवलं, पण मुखाग्नी देणार तोच जिवंत झाली महिला, आता अशी आहे प्रकृती
10
इंदिरा एकादशी २०२५: पितरांना मोक्ष देणारी इंदिरा एकादशी; तुळशीचा 'असा' वापर आठवणीने टाळा
11
'श्रीयुत गंगाधर टिपरे' मालिकेचा इंटरेस्टिंग किस्सा, आबांच्या भूमिकेतील दिलीप प्रभावळकर म्हणाले...
12
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
13
"हा तर 'पोपटवाडी' संघ..."; IND vs PAK सामन्यानंतर सुनील गावसकरांनी उडवली पाकिस्तानची खिल्ली
14
एक घर अन् ४२७१ मतदार! निवडणूक तोंडावर अन् AIने केली पोलखोल; कुठे घडला हा प्रकार?
15
निसर्गाचा प्रकोप! डेहरादूनमध्ये ढगफुटीमुळे विध्वंस; सहस्त्रधारा, तपकेश्वरचे धडकी भरवणारे Video
16
वारंवार हल्ले करणाऱ्या कुत्र्यांना जन्मठेप होणार! उत्तर प्रदेश सरकारने घेतला मोठा निर्णय
17
इश्क का जुनून! ६ मुलांचा ३८ वर्षीय बाप पडला १७ वर्षांच्या मुलीच्या प्रेमात; पुढे झालं असं काही...
18
ऑनलाईन गेमचा नाद लय बेकार! ११ लाख गमावल्यानंतर सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या
19
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी आमदार निर्मला ठोकळ यांचे निधन 
20
वाशीच्या दिशेने येणारा ट्रक उड्डाणपुलावरून कोसळला, मुंबई-पुणे महामार्गावरील घटना

टपावरुन प्रवासी वाहतुक बंदीसाठी काढल्या कॅरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 12:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : आधीच अवघड व अपघातग्रस्त ठरणा:या तळोदा ते धडगाव मार्गाने खाजगी प्रवासी वाहतुक करणा:या वाहनधारकांकडून ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : आधीच अवघड व अपघातग्रस्त ठरणा:या तळोदा ते धडगाव मार्गाने खाजगी प्रवासी वाहतुक करणा:या वाहनधारकांकडून जिपगाडय़ांच्या टपावरुन प्रवाशांची धोकेदायक वाहतुक करण्यात येते. अशा वाहतुकीवर तळोदा पोलीसांमार्फत बंदी करण्यात आली आहे. पुन्हा अशी वाहतुक              होऊ नये म्हणून या मार्गावर प्रवासी वाहतुक करणा:या प्रत्येक जिपगाडय़ांच्या कॅरीही काढण्यात आल्या आहे.तळोदा ते धडगाव हा मार्ग वळणदार असून तो जिल्ह्यातील सर्वाधिक धोक्याचा मार्ग  असल्याचे सांगण्यात येते. तिव्र चढ-उतार, अरुंद त्याशिवाय अगदी गोलाकार स्वरुपाचे वळणे या  मार्गावर आहेत. त्यामुळे हा   रस्ता बहुतांश वाहतुकीला अवघड ठरत असून धोक्याचा  देखील आहे. त्यामुळे या मार्गावर  मोठी वाहतुक सुरूच करण्यात आली नाही. रस्त्याच्या प्रतिकुल परिस्थितीमुळे मोठय़ा बसेस  देखील जाऊ शकत नसल्यामुळे नंदुरबार आगारामार्फत मिनी बससेवा सरू करण्यात आली होती. परंतु अतिवृष्टीत हा मार्ग अधिकच खराब झाल्याने ही बससेवा देखील बंद करण्यात आली     आहे. ही वाहतुक करतांना प्रवाशांना वाहनाच्या टपावरील कॅरीचा आधार दिला जातो. कॅरीच्या आधारे वाहनात जेवढे प्रवासी बसतात, त्याहीपेक्षा अधिक        प्रवासी टपावर बसविले जात  होते. त्याशिवाय जिपगाडय़ांच्या  तिन्ही बाजूला देखील प्रवासी  उभे करीत वाहतुक करण्यात येत होती. साध्या प्रवासालाच  धोक्याचा ठरत असतानाच या  मार्गाने बहुतांश जिपगाडय़ांच्या टपावरुन प्रवाशांची वाहतुक  करण्यात येत होती. ही वाहतुक प्रवाशांसाठी जीवघेणी ठरत  असल्याने कधीही मोठय़ा अपघाताची शक्यता वर्तविण्यात आली. संभाव्य धोके तथा अपघात टाळत प्रवाशांना  सुरक्षीत प्रवास करता यावा,  यासाठी तळोदा पोलीसांमार्फत या जीवघेण्यात प्रवासी वाहतुकीवर  काही अंशी नियंत्रण आणले आहे. काही वर्षापासून टपावरुन प्रवासी वाहतुक करणा:या प्रत्येक वाहनांच्या कॅरी काढण्याचे  निर्देश तळोदा पोलीसांमार्फत  देण्यात ओ होते. पोलीसांच्या आदेशाचे तंतोतंत पालन करीत सर्वच वाहनधारकांनी देखील आपापल्या वाहनावरील कॅरी   काढून ठेवल्या आहेत. त्यामुळे अनेक वर्षापासून सुरू असलेली जीवघेणी वाहतुक सुखरुप झाल्याचे म्हटले जात आहे. जनहितासाठी पोलीस प्रशासनामार्फत घेण्यात आलेल्या निर्णयाचे केवळ प्रवाशांमधूनच नव्हे तर खाजगी प्रवासी वाहतुक करणा:या वाहनधारकांकडूनही कौतुक   करण्यात येत आहे. 

कॅरीचा आधार देत प्रवाशांना टपावर बसवून त्यांची वाहतुक करणे वाहनधारकांच्या आर्थिक उन्नतीचे होतेच, परंतु प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ही बाब अत्यंत धोक्याची होती. वाहनधारकांचे आर्थिक नुकसान होत असले तरी जीवीत हानी टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाने घेतलेला हा निर्णय जनहिताचा ठरतो. टपावरुन होणारी वाहतुक थांबविण्यासाठी कॅरी काढण्यात आल्याने प्रवाशांना सामान ठेवण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. तळोदा ते धडगाव या मार्गावरुन प्रवास करणा:या प्रत्येक प्रवाशांकडे मोठा सामान असतो. हा सामान वाहनात ठेवल्यास प्रवाशांना बसण्यास अडचण येते. त्यामुळे सामान वाहनाच्या टपावर ठेवणेच अधिक योग्य ठरते. परंतु प्रत्येक वाहनाच्या कॅरीच काढल्यामुळे प्रवाशांना सामान ठेवण्याच्या अडचणी निर्माण झाल्या आहेत.