शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
ईशनंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटंबाचा धक्कादायक खुलासा
3
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
4
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
5
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
6
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
7
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
8
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
9
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
10
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
11
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
12
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
13
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
14
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
15
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
16
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
17
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
18
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
19
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
20
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

खरेदी केंद्रांवर अडीच लाख क्विंटलचा टप्पा पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 12:04 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कापूस हंगाम यंदा शेवटच्या टप्पात आहे. जिल्ह्यात दोन ठिकाणी खरेदी केंद्र सुरू करण्यात आले ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कापूस हंगाम यंदा शेवटच्या टप्पात आहे. जिल्ह्यात दोन ठिकाणी खरेदी केंद्र सुरू करण्यात आले होते. दोन्ही ठिकाणी मिळून एकुण जवळपास अडीच लाख क्विंटलपेक्षा अधीक कापूस खरेदी झाली आहे. यापेक्षा अधीक कापूस खेडा खरेदीअंतर्गत विक्री झाला आहे. यंदा भावही बऱ्यापैकी मिळाल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे. दरम्यान, शहादा येथील खरेदी केंद्र बंद ठेवण्यात आले आहे. तर नंदुरबारच्या केंद्रात खरेदी कायम आहे.जिल्ह्यात यंदा जवळपास एक लाख हेक्टर क्षेत्रावर कापूस लागवड करण्यात आली होती. सुरुवातीला पर्जन्यमान चांगले राहिल्याने कापसाची स्थितीही चांगली होती. परंतु जुलै, आॅगस्ट व सप्टेंबर महिन्यात अतीवृष्टीमुळे आणि उरलासुरला कापूस आॅक्टोबर, नोव्हेंबर महिन्यातील बेमोसमी पावसामुळे खराब झाला. असे असले तरी नंदुरबार, शहादा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना सरासरी उत्पादकतेपेक्षा चांगला कापूस झाला. यंदा भावही सुरुवातीपासून समाधानकारक राहिल्याने शेतकºयांमध्येही उत्साहाचे वातावरण होते.दोन ठिकाणी खरेदीकेंद्रकापूस खरेदी केंद्र यंदा दोन ठिकाणी सुरू करण्यात आले होते. नंदुरबार व शहादा येथे सीसीआय आणि खाजगी व्यापाºयांनी कापूस खरेदी केला. भाव साधारणत: ४२०० ते ५४०० पर्यंत दिला गेला. यंदा शहादा केंद्रात सर्वाधिक कापूस खरेदी झाला आहे. तब्बल एक लाख ५५ हजार क्विंटलपेक्षा अधीक कापूस खरेदी करण्यात आला आहे. कापूस ठेवण्यास जागा नसणे आणि इतर कारणांमुळे सध्या शहाद्यातील कापूस खरेदी केंद्र तुर्तास बंद ठेवण्यात आले आहे.नंदुरबार खरेदी केंद्रात ९० हजार क्विंटलपेक्षा अधीक खरेदी झालेली आहे. सध्या या ठिकाणी खरेदी सुरू ठेवण्यात आली आहे.खेडा खरेदीलाही प्राधान्ययंदा शेतकºयांनी खेडा खरेदीलाही प्राधान्य दिले. खाजगी व्यापारी खेडोपाडी जावून शेतकºयांकडून कापूस खरेदी करत असतात. स्थानिक ठिकाणीच कापसाला चांगला भाव मिळत असल्यामुळे शिवाय वाहतुकीचा खर्चही वाचत असल्यामुळे शेतकरी त्याला प्राधान्य देतात. असे असले तरी सदोष मोजणी पद्धतीमुळे शेतकºयांना अर्धा ते दोन क्विंटलचा फटका सहन करावा लागत असतो. तरीही शेतकरी त्यालाच प्राधान्य देतात.याशिवाय मध्यप्रदेशातील खेतिया बाजारात देखील मोठ्या प्रमाणावर कापूस खरेदी केला जातो. या ठिकाणी सोमवारचा भाव ४४०० ते ५१२५ रुपये क्विंटल प्रमाणे होता. या ठिकाणी अद्यापही मोठ्या प्रमाणावर वाहने भरून येत आहेत. दरम्यान, कापूस हंगाम आणखी काही दिवस सुरू राहण्याची शक्यता आहे.

यंदा पाऊस लांबला होता. शिवाय अवकाळी पावसाचाही कहर कायम होता. त्यामुळे कापसात ओलावा जास्त राहत होता. सीसीआयने अनेक वेळा कापसातील ओल लक्षात घेता खरेदी करणे थांबविले होते. शिवाय भावही कमी दिला जात होता. त्यामुळे वेळोवेळी खरेदीदार आणि शेतकरी यांच्यातील वाद कायम राहत होता.४ओला कापूस सुकवणे आणि तो भरून पुन्हा बाजारात विक्रीस आणण्याची कसरत शेतकऱ्यांची यंदा होती. काही शेतकऱ्यांनी सुरुवातीपासूनच कापूस घरात भरून ठेवला होता. त्यामुळे आता तो कापूस विक्रीसाठी बाहेर निघत असून आणखी १५ दिवस ते एक महिना कापूस खरेदी सुरू राहील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सध्या भाव ४३०० ते ५३०० क्विंटल याप्रमाणे मिळत आहे.