शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
4
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
5
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
6
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
7
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
8
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
9
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
10
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
11
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
12
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
13
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
14
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
15
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
18
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
19
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
20
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...

खरेदी केंद्रांवर अडीच लाख क्विंटलचा टप्पा पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 12:04 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कापूस हंगाम यंदा शेवटच्या टप्पात आहे. जिल्ह्यात दोन ठिकाणी खरेदी केंद्र सुरू करण्यात आले ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कापूस हंगाम यंदा शेवटच्या टप्पात आहे. जिल्ह्यात दोन ठिकाणी खरेदी केंद्र सुरू करण्यात आले होते. दोन्ही ठिकाणी मिळून एकुण जवळपास अडीच लाख क्विंटलपेक्षा अधीक कापूस खरेदी झाली आहे. यापेक्षा अधीक कापूस खेडा खरेदीअंतर्गत विक्री झाला आहे. यंदा भावही बऱ्यापैकी मिळाल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे. दरम्यान, शहादा येथील खरेदी केंद्र बंद ठेवण्यात आले आहे. तर नंदुरबारच्या केंद्रात खरेदी कायम आहे.जिल्ह्यात यंदा जवळपास एक लाख हेक्टर क्षेत्रावर कापूस लागवड करण्यात आली होती. सुरुवातीला पर्जन्यमान चांगले राहिल्याने कापसाची स्थितीही चांगली होती. परंतु जुलै, आॅगस्ट व सप्टेंबर महिन्यात अतीवृष्टीमुळे आणि उरलासुरला कापूस आॅक्टोबर, नोव्हेंबर महिन्यातील बेमोसमी पावसामुळे खराब झाला. असे असले तरी नंदुरबार, शहादा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना सरासरी उत्पादकतेपेक्षा चांगला कापूस झाला. यंदा भावही सुरुवातीपासून समाधानकारक राहिल्याने शेतकºयांमध्येही उत्साहाचे वातावरण होते.दोन ठिकाणी खरेदीकेंद्रकापूस खरेदी केंद्र यंदा दोन ठिकाणी सुरू करण्यात आले होते. नंदुरबार व शहादा येथे सीसीआय आणि खाजगी व्यापाºयांनी कापूस खरेदी केला. भाव साधारणत: ४२०० ते ५४०० पर्यंत दिला गेला. यंदा शहादा केंद्रात सर्वाधिक कापूस खरेदी झाला आहे. तब्बल एक लाख ५५ हजार क्विंटलपेक्षा अधीक कापूस खरेदी करण्यात आला आहे. कापूस ठेवण्यास जागा नसणे आणि इतर कारणांमुळे सध्या शहाद्यातील कापूस खरेदी केंद्र तुर्तास बंद ठेवण्यात आले आहे.नंदुरबार खरेदी केंद्रात ९० हजार क्विंटलपेक्षा अधीक खरेदी झालेली आहे. सध्या या ठिकाणी खरेदी सुरू ठेवण्यात आली आहे.खेडा खरेदीलाही प्राधान्ययंदा शेतकºयांनी खेडा खरेदीलाही प्राधान्य दिले. खाजगी व्यापारी खेडोपाडी जावून शेतकºयांकडून कापूस खरेदी करत असतात. स्थानिक ठिकाणीच कापसाला चांगला भाव मिळत असल्यामुळे शिवाय वाहतुकीचा खर्चही वाचत असल्यामुळे शेतकरी त्याला प्राधान्य देतात. असे असले तरी सदोष मोजणी पद्धतीमुळे शेतकºयांना अर्धा ते दोन क्विंटलचा फटका सहन करावा लागत असतो. तरीही शेतकरी त्यालाच प्राधान्य देतात.याशिवाय मध्यप्रदेशातील खेतिया बाजारात देखील मोठ्या प्रमाणावर कापूस खरेदी केला जातो. या ठिकाणी सोमवारचा भाव ४४०० ते ५१२५ रुपये क्विंटल प्रमाणे होता. या ठिकाणी अद्यापही मोठ्या प्रमाणावर वाहने भरून येत आहेत. दरम्यान, कापूस हंगाम आणखी काही दिवस सुरू राहण्याची शक्यता आहे.

यंदा पाऊस लांबला होता. शिवाय अवकाळी पावसाचाही कहर कायम होता. त्यामुळे कापसात ओलावा जास्त राहत होता. सीसीआयने अनेक वेळा कापसातील ओल लक्षात घेता खरेदी करणे थांबविले होते. शिवाय भावही कमी दिला जात होता. त्यामुळे वेळोवेळी खरेदीदार आणि शेतकरी यांच्यातील वाद कायम राहत होता.४ओला कापूस सुकवणे आणि तो भरून पुन्हा बाजारात विक्रीस आणण्याची कसरत शेतकऱ्यांची यंदा होती. काही शेतकऱ्यांनी सुरुवातीपासूनच कापूस घरात भरून ठेवला होता. त्यामुळे आता तो कापूस विक्रीसाठी बाहेर निघत असून आणखी १५ दिवस ते एक महिना कापूस खरेदी सुरू राहील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सध्या भाव ४३०० ते ५३०० क्विंटल याप्रमाणे मिळत आहे.