शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
2
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
3
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
4
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
5
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
6
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
7
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
8
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
9
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
10
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
11
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
12
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
13
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू
14
भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव?
15
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
16
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
17
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
18
धक्कादायक! 'लुटेरी दुल्हन' गँगचा धुमाकूळ, जो समोर आला त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
19
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
20
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 

खरेदी केंद्रांवर अडीच लाख क्विंटलचा टप्पा पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 12:04 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कापूस हंगाम यंदा शेवटच्या टप्पात आहे. जिल्ह्यात दोन ठिकाणी खरेदी केंद्र सुरू करण्यात आले ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कापूस हंगाम यंदा शेवटच्या टप्पात आहे. जिल्ह्यात दोन ठिकाणी खरेदी केंद्र सुरू करण्यात आले होते. दोन्ही ठिकाणी मिळून एकुण जवळपास अडीच लाख क्विंटलपेक्षा अधीक कापूस खरेदी झाली आहे. यापेक्षा अधीक कापूस खेडा खरेदीअंतर्गत विक्री झाला आहे. यंदा भावही बऱ्यापैकी मिळाल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे. दरम्यान, शहादा येथील खरेदी केंद्र बंद ठेवण्यात आले आहे. तर नंदुरबारच्या केंद्रात खरेदी कायम आहे.जिल्ह्यात यंदा जवळपास एक लाख हेक्टर क्षेत्रावर कापूस लागवड करण्यात आली होती. सुरुवातीला पर्जन्यमान चांगले राहिल्याने कापसाची स्थितीही चांगली होती. परंतु जुलै, आॅगस्ट व सप्टेंबर महिन्यात अतीवृष्टीमुळे आणि उरलासुरला कापूस आॅक्टोबर, नोव्हेंबर महिन्यातील बेमोसमी पावसामुळे खराब झाला. असे असले तरी नंदुरबार, शहादा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना सरासरी उत्पादकतेपेक्षा चांगला कापूस झाला. यंदा भावही सुरुवातीपासून समाधानकारक राहिल्याने शेतकºयांमध्येही उत्साहाचे वातावरण होते.दोन ठिकाणी खरेदीकेंद्रकापूस खरेदी केंद्र यंदा दोन ठिकाणी सुरू करण्यात आले होते. नंदुरबार व शहादा येथे सीसीआय आणि खाजगी व्यापाºयांनी कापूस खरेदी केला. भाव साधारणत: ४२०० ते ५४०० पर्यंत दिला गेला. यंदा शहादा केंद्रात सर्वाधिक कापूस खरेदी झाला आहे. तब्बल एक लाख ५५ हजार क्विंटलपेक्षा अधीक कापूस खरेदी करण्यात आला आहे. कापूस ठेवण्यास जागा नसणे आणि इतर कारणांमुळे सध्या शहाद्यातील कापूस खरेदी केंद्र तुर्तास बंद ठेवण्यात आले आहे.नंदुरबार खरेदी केंद्रात ९० हजार क्विंटलपेक्षा अधीक खरेदी झालेली आहे. सध्या या ठिकाणी खरेदी सुरू ठेवण्यात आली आहे.खेडा खरेदीलाही प्राधान्ययंदा शेतकºयांनी खेडा खरेदीलाही प्राधान्य दिले. खाजगी व्यापारी खेडोपाडी जावून शेतकºयांकडून कापूस खरेदी करत असतात. स्थानिक ठिकाणीच कापसाला चांगला भाव मिळत असल्यामुळे शिवाय वाहतुकीचा खर्चही वाचत असल्यामुळे शेतकरी त्याला प्राधान्य देतात. असे असले तरी सदोष मोजणी पद्धतीमुळे शेतकºयांना अर्धा ते दोन क्विंटलचा फटका सहन करावा लागत असतो. तरीही शेतकरी त्यालाच प्राधान्य देतात.याशिवाय मध्यप्रदेशातील खेतिया बाजारात देखील मोठ्या प्रमाणावर कापूस खरेदी केला जातो. या ठिकाणी सोमवारचा भाव ४४०० ते ५१२५ रुपये क्विंटल प्रमाणे होता. या ठिकाणी अद्यापही मोठ्या प्रमाणावर वाहने भरून येत आहेत. दरम्यान, कापूस हंगाम आणखी काही दिवस सुरू राहण्याची शक्यता आहे.

यंदा पाऊस लांबला होता. शिवाय अवकाळी पावसाचाही कहर कायम होता. त्यामुळे कापसात ओलावा जास्त राहत होता. सीसीआयने अनेक वेळा कापसातील ओल लक्षात घेता खरेदी करणे थांबविले होते. शिवाय भावही कमी दिला जात होता. त्यामुळे वेळोवेळी खरेदीदार आणि शेतकरी यांच्यातील वाद कायम राहत होता.४ओला कापूस सुकवणे आणि तो भरून पुन्हा बाजारात विक्रीस आणण्याची कसरत शेतकऱ्यांची यंदा होती. काही शेतकऱ्यांनी सुरुवातीपासूनच कापूस घरात भरून ठेवला होता. त्यामुळे आता तो कापूस विक्रीसाठी बाहेर निघत असून आणखी १५ दिवस ते एक महिना कापूस खरेदी सुरू राहील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सध्या भाव ४३०० ते ५३०० क्विंटल याप्रमाणे मिळत आहे.