शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

ठरलेल्या दरानेच पपई विक्री करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 13:05 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : पपई फळाची टंचाई पाहता उत्तर भारतातील बाजारात दिवसेंदिवस भाववाढ होत आहे. परंतु शेतकऱ्यांना त्यामानाने ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : पपई फळाची टंचाई पाहता उत्तर भारतातील बाजारात दिवसेंदिवस भाववाढ होत आहे. परंतु शेतकऱ्यांना त्यामानाने कमी भाव मिळत असल्याने पपई उत्पादक शेतकरी संघर्ष समिती, व्यापारी व कृषी उत्पन्न बाजार समिती यांची संयुक्त बैठक येथे पार पडली. बैठकीत आठवड्याचा सरासरी भाव काढत १३ रुपये ५१ पैसे दर निश्चित करण्यात आला. शेतकऱ्यांनी या दरानुसारच पपईची तोडणी करावी, असे आवाहन संघर्ष समितीतर्फे करण्यात आले.येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात बाजार समितीचे सभापती सुनील पाटील, सचिव संजय पाटील, पपई उत्पादक संघर्ष समितीचे सदस्य भगवान पाटील, अनिल पाटील, राजू पाटील, विश्वनाथ पाटील, फुलभाई पाटील आदींसह शिरपूर, नंदुरबार, तळोदा परिसरातील शेतकरी व व्यापारी शेख नाजीम सरताज, हाजी इकबाल, प्रकाशभाई राजस्थानवाले, राहुलभाई राजस्थानवाले, अहमद नाजिम आदी व्यापारी प्रतिनिधींची पपईच्या दरवाढीबाबत चर्चा झाली. चर्चेअंती १३ रुपये ५१ पैसे दर निश्चित करण्यात आला. अतिवृष्टीमुळे पपईच्या बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. फळधारणाही किमान झाली. जिल्ह्यात पपईचे मोठ्या प्रमाणावर क्षेत्र आहे. पपई पिकावर व्हायरससह डाऊनीमुळे उत्पादनात ५० टक्क्यांहून अधिक घट झाली आहे. दररोज जिल्ह्यातून पपईच्या सरासरी शंभर गाड्या जात होत्या. ती संख्या सध्या निम्म्याहून अधिक कमी झाली आहे. गेल्या आठवड्यातही संयुक्त बैठक झाली होती. त्या बैठकीत ११ रुपये ७५ पैसे भाव ठरविण्यात आला होता. परंतु उत्तर भारतातील बाजारपेठेत वाढणारा भाव पाहता संघर्ष समितीने पुन्हा पुढाकार घेत आठवड्याचा सरासरी भाव काढून शेतकºयांना भाववाढ मिळवून दिली.दरम्यान, कधी दोन रुपये तर कधी पाच रुपये प्रतीकिलो या दराने आजपर्यंत पपई उत्पादक शेतकरी पपई फळाची विक्री करीत होता. परंतु यंदा प्रथमच पपईला चांगला भाव मिळत आहे. तरीही पपई पिकावर झालेला खर्च व मिळणारे अपेक्षित उत्पादन पाहता भाव वाढ समाधानकारक नसल्याचे शेतकरी सांगतात. शेतकºयांना बाजारपेठेतील दराची माहिती नसल्याने नुकसान होते. महानगरांमध्ये ३५ ते ४० रुपये किलोप्रमाणे पपईची विक्री सुरू आहे. त्यामुळे पपईला प्रतीकिलो १५ रुपयेप्रमाणे दर मिळावा, अशी अपेक्षा शेतकºयांकडून व्यक्त होत आहे. सध्या व्यापाºयांनी ठरवलेल्या दरापेक्षा खुल्या बाजारात १५ रुपयेप्रमाणे काही व्यापारी पपई खरेदी करत असल्याचे बोलले जात आहे.