शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
6
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
7
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
8
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
9
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
10
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
11
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
12
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
13
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
14
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
15
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
16
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
17
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
18
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
19
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
20
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी

पपईला प्रतिकिलो 13 रुपये भाव द्या अन्यथा चालते व्हा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 11:11 IST

दरवाढीचे आंदोलन पेटणार : पपई उत्पादकांचा इशारा

नंदुरबार : जिल्ह्यातील पपई व्यापा:यांनी प्रतिकिलो 13 रुपये दराने खरेदी करावी, अन्यथा शेतशिवारात पाय ठेवू नये, निर्धारित दर न मिळाल्यास शनिवारपासून पपई तोड बंद करण्याचा इशारा पपई उत्पादकांनी दिला आह़े शहादा बाजार समितीच्या आवारात शेतकरी संघर्ष समिती आणि स्वाभीमानी शेतकरी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या बैठकीत हा इशारा देण्यात आला़या बैठकीस जिल्ह्यातील पपई उत्पादक शेतक:यांसह धुळे आणि जळगाव जिल्ह्यातील पपई उत्पादक शेतकरी उपस्थित होत़े यावेळी जिल्हा परिषद सदस्य तथा शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष अभिजीत पाटील, स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे विभागीय अध्यक्ष घनश्याम चौधरी, सचिन पाटील, गणेश पाटील, अॅड़ स्वर्णसिंग गिरासे, जितेंद्र पाटील, विठोबा माळी, पिंटू पाटील, गणेश पाटील, रविंद्र पाटील, पमन पाटील उपस्थित होत़े बैठकीत गेल्या वर्षी व्यापा:यांनी 8 रुपयांर्पयत प्रतिकिलो दर देण्याचे निश्चित करुनही कालांतराने या दरांमध्ये कमी केल्याचे सांगून शेतक:यांनी नाराजी व्यक्त केली़  गेल्या आठ ते दहा दिवसांपासून पपई तोड सुरु झाली आह़े व्यापारी गेल्या वर्षाच्या दरांनुसार खरेदी करण्याचा आग्रह करत असल्याची माहिती देण्यात आल्यानंतर 13 रुपयांखाली एक रुपयाही कमी न घेता व्यापा:यांना पपई विक्री करण्याचा एकमुखी ठराव करण्यात आला़ स्वाभीमानी संघटनेचे घनश्याम पाटील यांनी सांगितले की, शेतकरी राबराब राबून पपईचे संगोपन करतात परंतू व्यापारी त्यांच्या कष्टाची किंमत सात आणि आठ रुपयाने ठरवतात़ चांगल्या दर्जाचे फळ निर्माण होऊनही ही अवहेलना खपवून घेतली जाणार नाही़ प्रसंगी चोपडा, पारोळा, मुक्ताईनगर, नरडाणा, शिंदखेडा, धरणगाव, पाचोरा येथील शेतकरीही उपस्थित होत़े जिल्ह्यात गेल्या काही वर्षात पपईच्या लागवड क्षेत्रात वाढ होऊन बागायती शेतक:यांचा आधार म्हणून त्याकडे पाहिले जात़े सर्वसाधारण 2 हजार 100 हेक्टर क्षेत्रात पपई लागवड करण्यात येत़े यंदा शहादा तालुक्यात 2 हजार 354, तळोदा 394, नंदुरबार 983 तर अक्कलकुवा तालुक्यात 50 हेक्टरवर पपई लागवड करण्यात आली आह़े एकूण 3 हजार 781 हेक्टरवर पपईच्या बागा असून  राज्यात सर्वाधिक पपई लागवड ही नंदुरबार जिल्ह्यात आह़े या पपई उत्पादनाला दरवर्षी वाढीव दर देण्याबाबत शेतकरी आणि व्यापारी असा संघर्ष होतो़ गेल्या पाच वर्षात व्यापा:यांनी पपईच्या प्रतिकिलो दरांमध्ये केवळ पाच रुपयांची  वाढ केली होती़ यामुळे यंदा शेतक:यांनी 13 रुपये प्रतिकिलो दराने खरेदीच्या मागणीवर ठाम भूमिका घेतली आह़े