शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

‘डावणी’च्या प्रादुर्भावाने पपई उत्पादक चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 12:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : तालुक्यातील शेतक:यांनी मोठय़ा प्रमाणावर पपईची लागवड केली आहे. सध्या पपईला फळधारणा होत असून फळधारणेच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : तालुक्यातील शेतक:यांनी मोठय़ा प्रमाणावर पपईची लागवड केली आहे. सध्या पपईला फळधारणा होत असून फळधारणेच्या कालावधीत ‘डावणी’ नावाच्या रोगाचा प्रादुर्भाव आढळून येत असल्याने पपईची फुलगळ होत आहे. फळधारणेवर त्याच्या परिणाम होत असल्याने आधीच संकटात सापडलेल्या शेतक:यांना कृषी विभागान मार्गदर्शन करण्याची गरज आहे.पपई या पिकासाठी उत्पन्न निघेर्पयत मोठय़ा प्रमाणावर खर्च करावा लागतो. यावर्षी शेतक:यांनी 14 रुपयांपासून  ते 25 रुपयार्पयत पपईच्या रोपांची  खरेदी  करून लागवड केली आहे. शिवाय उन्हाच्या तीव्रतेने ‘मर’ रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळे तीन ते चारवेळा रोपे आणून पुन्हा लागवड करावी लागली. त्याला उन्हाच्या संरक्षणापासून क्रॉप कव्हर लावण्यात आले. ते क्रॉप कव्हर प्रती झाड तीन ते चार रुपये खर्च आला. तसेच महागडे रासायनिक खत वेगवेगळ्या कंपन्यांचे स्प्रे त्यात व्हायरस मिलीबगसारख्या रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने सहाजिकच खर्चाचे प्रमाण वाढले. दरवर्षी पपईचा दर कमी-अधिक प्रमाणात होत असल्याने दर कमी झाल्यावर शेतक:याला मोठी आर्थिक झळ सोसावी लागते. त्यामुळे हे पीक परवडेनासे झाले आहे. पपईचे पीक दरवर्षी वादाच्या भोव:यात सापडते. कधी व्यापा:यांकडून कमी दर दिला जातो तर कधी नैसर्गिक संकट यावर्षी सुरुवातीलाच निसर्गाच्या संकटाने शेतकरी हैराण झाला असून कसेबसे उधारउसनवार पैसे करून पीक घेत आहेत. काही शेतक:यांनी तर कूपनलिका आटल्याने उभे पीक मोडून काढले. ज्या शेतक:यांचे पपईचे पीक  तग धरून उभे आहे त्यावर सध्या ‘रिक्षा’ नावाच्या किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. या किडीच्या नियंत्रणासाठी कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची मार्गदर्शनाची गरज आहे. कृषी विभागाने गावोगावी बैठका घेऊन मार्गदर्शन केले पाहिजे, अशी मागणी शेतक:यांकडून होत आहे.ज्या शेतक:यांनी एप्रिल महिन्यात पपईची लागवड केली आहे हे ते पीक  सध्या फळधारणेच्या अवस्थेत आहे. त्या पिकाला सध्या ‘डावणी’ रोगाने                पछाडले आहे. यात झाड पिवळे पडणे, झाडाची छत्री बारीक होणे, कोरडी पडणे आदी प्रकार घडत आहेत. पपई पीक हे मुख्यत: पानांच्या छत्रीवरच अवलंबून असते. या पिकात पानांची छत्री गेल्यास झाडच कमकुवत होते. त्यामुळे उन्हाळ्यात सावली नसल्याने फळांवर उष्णतेचे चटके बसल्याने फळ खराब होऊन आर्थिक नुकसान होते. शिवाय व्यापारीहीही माल घेत नसल्याने शेतक:यांचे नुकसान होते. कृषी विभागाने वेळीच दखल घेऊन समस्यांना आळा घालण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात.