शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

वाढत्या तापमानामुळे पपई संकटात

By admin | Updated: March 29, 2017 23:43 IST

भावही घसरला : उत्पादक शेतकºयांकडून विविध उपाययोजना

ब्राह्मणपुरी : दिवसेंदिवस पडत असलेल्या कडाक्याच्या उन्हामुळे पपई पीक संकटात सापडले आहे.  आधीच घसरलेल्या दरामुळे यापुढे पपईची लागवड करावी की नाही, अशा प्रश्न पपई उत्पादक शेतकºयांसमोर निर्माण झाला आहे.शहादा तालुक्यातील ब्राह्मणपुरी परिसरात पपईची लागवड करण्यात येते. दहा महिन्यांच्या या पिकाला दर चार ते पाच दिवसात पाणी देण्याची आवश्यकता असते. ब्राह्मणपुरी परिसरातील पपई पंजाब, दिल्ली, हरियानासह विविध राज्यात रवाना होते. मात्र यंदा पपई पिकावर रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यात पपईवर व्हायरल येत असल्याने ती खराब  होत आहे. याशिवाय सध्या गेल्या आठवड्यापासून तापमानाने चाळिशी गाठली आहे. बदलत्या वातावरणामुळे पिके धोक्यात आलेली आहे. उन्हामुळे झाडावरील छत्र्या गळत असल्याने पपई फळ निकामी होत आहे. काही शेतकºयांनी गोणपाट, पांढरे कापड लावून पपईला जगविण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यातूनही पपईचे पूर्णपणे संरक्षण होत नसल्याचे समोर येत आहे.आजच्या स्थितीत पपई पिकाला पाच ते साडेपाच रुपये प्रती किलोने भाव मिळत आहे. त्यातून उत्पादन खर्चही निघत नसल्याचे चित्र आहे. अशा मन:स्थितीमुळे अनेक शेतकरी थेट पपई पिकावर रोटाव्हेटर फिरवून पपईचे क्षेत्र खाली करीत असल्याचे दिसून येत आहे.     (वार्ताहर)बदलत्या वातावरणाने पपई पीक खराब होत आहे. पपई पिकावर पांढरा व्हायरस येत असल्याने पपई खराब होत आहे. उन्हामुळे पपईच्या झाडावरील छत्र्या गळत असल्याने पपई फळ खराब होत आहे. मागील वर्षी झालेल्या अवकाळी पावसामुळे पपई व केळी पिकाच्या नुकसानीची अद्यापपर्यंत भरपाई मिळालेली नाही. त्यामुळे संबंधितांनी नुकसानग्रस्त शेतकºयांना लवकरात लवकर भरपाई द्यावी, अशी अपेक्षा.-विजय पाटील,शेतकरी