शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
2
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
3
"अरुणाचल प्रदेश आमचा होता, आहे आणि राहणार", चीनच्या 'त्या' नापाक कृत्यावर भारताने ठणकावले!
4
संतापलेले भारतीय तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकिस्तानला मदत करणारे इन्कम गमावून बसणार
5
युक्रेन सोडा, आता 'या' देशावर कब्जा करण्याचा पुतिन यांचा प्लॅन; सॅटेलाईट इमेजनं सीक्रेट उघडलं
6
मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल, मनसेने कार्यकर्ते साकिनाक्यातील नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळले!
7
'बिग बॉस' हिंदी नंतर रिजेक्शचाच सामना करावा लागला, निक्की तांबोळी म्हणाली, "त्यानंतर मी..."
8
Guru Gochar 2025: गुरु गोचरमुळे आठ वर्षात बदलणार जगाचा चेहरा मोहरा, व्हायरसचीही भीती!
9
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
10
७६६ कोटी रुपयांची कमाई तरीही रेमंडचे शेअर्स ६६% आपटले; काय आहे कारण?
11
सॅल्यूट! अ‍ॅसिड हल्ल्याने गेली दृष्टी, मानली नाही हार; बारावीत मिळवले ९५%, IAS होण्याचं स्वप्न
12
"तुम्हा सर्वांना सलाम..."; तेजस्वी यादव यांचा शहीद जवान रामबाबू सिंह यांच्या भावाला Video कॉल
13
पाकिस्ताननंतर भारताचा चीनविरोधात 'डिजिटल स्ट्राईक'; ग्लोबल टाईम्सचे X अकाउंट केलं BLOCK !
14
अबब! तब्बल ४ लाखांची पोपटाची पर्स घेऊन 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये पोहोचली उर्वशी रौतेला, सर्वजण पाहतच राहिले
15
CJI BR Gavai Oath Ceremony : महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
16
भाजपा मंत्र्याच्या नेमप्लेटवर शाई, काँग्रेसची निदर्शनं; कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवलं
17
'या' दिग्गज कंपनीतून बाहेर पडण्याच्या तयारीत Reliance; ५०० कोटींची केलेली गुंतवणूक, मिळणार ११,१४१ कोटी रुपये
18
Video: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीचे श्रेय घेणारा अमेरिका दहशतवादाच्या प्रश्नावर गप्प...
19
सरन्यायाधीशांना मिळतो पंतप्रधानांपेक्षा जास्त पगार; सोबत भत्ते आणि मिळतात 'या' खास सुविधा
20
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...

पी. के. अण्णा परिवर्तनवादी समाज सुधारक पुतळ्याचे अनावरण : लोणखेडा येथील कार्यक्रमात विरोधी पक्षनेते फडणवीस यांचे प्रतिपादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:31 IST

पाटीदार मंगल कार्यालयात आयोजित आदरांजली सभेत बोलताना फडणवीस म्हणाले, महापुरुषांच्या स्मारकामुळे आगामी अनेक पिढ्यांना प्रेरणा व दिशा मिळते. स्मारक ...

पाटीदार मंगल कार्यालयात आयोजित आदरांजली सभेत बोलताना फडणवीस म्हणाले, महापुरुषांच्या स्मारकामुळे आगामी अनेक पिढ्यांना प्रेरणा व दिशा मिळते. स्मारक हे त्या व्यक्तीने केलेल्या कार्याची तसेच त्या काळात केलेल्या संघर्षाचे प्रतीक असते. स्मारकाच्या माध्यमातून व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडते. त्यांनी केलेले कार्य महान आहे ते केवळ राजकीय नेते नव्हे तर समाजसुधारक होते. पुरोगामी विचारसरणीचे सर्वकालीन श्रेष्ठ नेते आहेत. समाज सुधारणांसाठी त्यांनी केलेले प्रयत्न अनमोल आहेत. समाजातील अनिष्ट प्रथा बंद करण्यासाठी धाडस लागते, त्याचप्रमाणे समाज घडवण्यासाठी शिक्षणाचे महत्त्व ओळखून त्यांनी या परिसरात शिक्षण संस्थाचे जाळे उभारले. शिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण देशात नावलौकिक कमावला. सहकारी संस्थांच्या माध्यमातून रोजगार निर्मिती झाल्याने शेतमालावर प्रक्रिया करणारे उद्योग उभे राहिल्याने शेतकरी सधन झाल्याचे त्यांनी सांगितले.

अध्यक्षीय संबोधनात जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले, पी. के. अण्णा पाटील हे परखड व स्पष्टवक्ते होते. स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडात त्यांनी प्रचंड वेगाने सहकार क्षेत्रात काम केल्याने सातपुड्याच्या पायथ्याशी सहकाराचा वटवृक्ष बहरला. राज्यात काही नवीन करायचे असेल तर त्याची सुरुवात शहाद्यातून व्हायची असा कार्यकाळ अण्णांचा होता. तापी नदीवरील २२ उपसा सिंचन योजना शेतीला पाणी मिळावे यासाठी त्यांनी सुरू केल्या. त्यांचा हा उपक्रम आदर्श मानून माझे वडील स्वर्गीय राजाराम पाटील यांनी आमच्या भागात सुरू केल्याने वाहून जाणारे पाणी शेतीला सिंचनासाठी मिळाले. जीवन कसे जगावे हे अण्णांनी आपल्याला सांगितले आहे. समाजासाठी कार्य करत असताना समाजाला काहीतरी देण्याची मानसिकता हवी हा महत्त्वाचा मूलमंत्र अण्णांनी सर्वांना दिला असल्याचे ते म्हणाले.

पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले, सातपुड्याच्या पायथ्याशी अण्णा साहेबांनी सहकार चळवळीचा पाया रचला. राजकारणात कसे वागावे, नेहमी स्पष्ट बोलावे व कृती करावी, नुकसान काय होईल याचा विचार न करता सरळ मार्गाने जीवन जगावे याचा आदर्श अण्णांनी घालून दिला आहे. संपूर्ण परिसरात सहकार शिक्षण क्षेत्रात चैतन्य निर्माण झाले आहे. त्यांच्यावरील प्रेमामुळेच आज सर्वपक्षीय नेते व्यासपीठावर जमले असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविक पी. के. अण्णा पाटील फाऊंडेशनचे अध्यक्ष दीपक पाटील यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. विजय शर्मा यांनी केले. आभार तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील पाटील यांनी मानले.