शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

पी. के. अण्णा परिवर्तनवादी समाज सुधारक पुतळ्याचे अनावरण : लोणखेडा येथील कार्यक्रमात विरोधी पक्षनेते फडणवीस यांचे प्रतिपादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:31 IST

पाटीदार मंगल कार्यालयात आयोजित आदरांजली सभेत बोलताना फडणवीस म्हणाले, महापुरुषांच्या स्मारकामुळे आगामी अनेक पिढ्यांना प्रेरणा व दिशा मिळते. स्मारक ...

पाटीदार मंगल कार्यालयात आयोजित आदरांजली सभेत बोलताना फडणवीस म्हणाले, महापुरुषांच्या स्मारकामुळे आगामी अनेक पिढ्यांना प्रेरणा व दिशा मिळते. स्मारक हे त्या व्यक्तीने केलेल्या कार्याची तसेच त्या काळात केलेल्या संघर्षाचे प्रतीक असते. स्मारकाच्या माध्यमातून व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडते. त्यांनी केलेले कार्य महान आहे ते केवळ राजकीय नेते नव्हे तर समाजसुधारक होते. पुरोगामी विचारसरणीचे सर्वकालीन श्रेष्ठ नेते आहेत. समाज सुधारणांसाठी त्यांनी केलेले प्रयत्न अनमोल आहेत. समाजातील अनिष्ट प्रथा बंद करण्यासाठी धाडस लागते, त्याचप्रमाणे समाज घडवण्यासाठी शिक्षणाचे महत्त्व ओळखून त्यांनी या परिसरात शिक्षण संस्थाचे जाळे उभारले. शिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण देशात नावलौकिक कमावला. सहकारी संस्थांच्या माध्यमातून रोजगार निर्मिती झाल्याने शेतमालावर प्रक्रिया करणारे उद्योग उभे राहिल्याने शेतकरी सधन झाल्याचे त्यांनी सांगितले.

अध्यक्षीय संबोधनात जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले, पी. के. अण्णा पाटील हे परखड व स्पष्टवक्ते होते. स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडात त्यांनी प्रचंड वेगाने सहकार क्षेत्रात काम केल्याने सातपुड्याच्या पायथ्याशी सहकाराचा वटवृक्ष बहरला. राज्यात काही नवीन करायचे असेल तर त्याची सुरुवात शहाद्यातून व्हायची असा कार्यकाळ अण्णांचा होता. तापी नदीवरील २२ उपसा सिंचन योजना शेतीला पाणी मिळावे यासाठी त्यांनी सुरू केल्या. त्यांचा हा उपक्रम आदर्श मानून माझे वडील स्वर्गीय राजाराम पाटील यांनी आमच्या भागात सुरू केल्याने वाहून जाणारे पाणी शेतीला सिंचनासाठी मिळाले. जीवन कसे जगावे हे अण्णांनी आपल्याला सांगितले आहे. समाजासाठी कार्य करत असताना समाजाला काहीतरी देण्याची मानसिकता हवी हा महत्त्वाचा मूलमंत्र अण्णांनी सर्वांना दिला असल्याचे ते म्हणाले.

पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले, सातपुड्याच्या पायथ्याशी अण्णा साहेबांनी सहकार चळवळीचा पाया रचला. राजकारणात कसे वागावे, नेहमी स्पष्ट बोलावे व कृती करावी, नुकसान काय होईल याचा विचार न करता सरळ मार्गाने जीवन जगावे याचा आदर्श अण्णांनी घालून दिला आहे. संपूर्ण परिसरात सहकार शिक्षण क्षेत्रात चैतन्य निर्माण झाले आहे. त्यांच्यावरील प्रेमामुळेच आज सर्वपक्षीय नेते व्यासपीठावर जमले असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविक पी. के. अण्णा पाटील फाऊंडेशनचे अध्यक्ष दीपक पाटील यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. विजय शर्मा यांनी केले. आभार तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील पाटील यांनी मानले.