शहरं
Join us  
Trending Stories
1
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
2
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
3
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
4
गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
5
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
6
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!
7
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
8
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
9
दहावीतील विद्यार्थ्याची नववीतील विद्यार्थ्याने केली हत्या, चाकूने सपासप वार केले आणि...  
10
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
11
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
12
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
13
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
14
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
15
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले
16
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
17
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
18
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
19
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
20
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...

पी. के. अण्णा परिवर्तनवादी समाज सुधारक पुतळ्याचे अनावरण : लोणखेडा येथील कार्यक्रमात विरोधी पक्षनेते फडणवीस यांचे प्रतिपादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:31 IST

पाटीदार मंगल कार्यालयात आयोजित आदरांजली सभेत बोलताना फडणवीस म्हणाले, महापुरुषांच्या स्मारकामुळे आगामी अनेक पिढ्यांना प्रेरणा व दिशा मिळते. स्मारक ...

पाटीदार मंगल कार्यालयात आयोजित आदरांजली सभेत बोलताना फडणवीस म्हणाले, महापुरुषांच्या स्मारकामुळे आगामी अनेक पिढ्यांना प्रेरणा व दिशा मिळते. स्मारक हे त्या व्यक्तीने केलेल्या कार्याची तसेच त्या काळात केलेल्या संघर्षाचे प्रतीक असते. स्मारकाच्या माध्यमातून व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडते. त्यांनी केलेले कार्य महान आहे ते केवळ राजकीय नेते नव्हे तर समाजसुधारक होते. पुरोगामी विचारसरणीचे सर्वकालीन श्रेष्ठ नेते आहेत. समाज सुधारणांसाठी त्यांनी केलेले प्रयत्न अनमोल आहेत. समाजातील अनिष्ट प्रथा बंद करण्यासाठी धाडस लागते, त्याचप्रमाणे समाज घडवण्यासाठी शिक्षणाचे महत्त्व ओळखून त्यांनी या परिसरात शिक्षण संस्थाचे जाळे उभारले. शिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण देशात नावलौकिक कमावला. सहकारी संस्थांच्या माध्यमातून रोजगार निर्मिती झाल्याने शेतमालावर प्रक्रिया करणारे उद्योग उभे राहिल्याने शेतकरी सधन झाल्याचे त्यांनी सांगितले.

अध्यक्षीय संबोधनात जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले, पी. के. अण्णा पाटील हे परखड व स्पष्टवक्ते होते. स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडात त्यांनी प्रचंड वेगाने सहकार क्षेत्रात काम केल्याने सातपुड्याच्या पायथ्याशी सहकाराचा वटवृक्ष बहरला. राज्यात काही नवीन करायचे असेल तर त्याची सुरुवात शहाद्यातून व्हायची असा कार्यकाळ अण्णांचा होता. तापी नदीवरील २२ उपसा सिंचन योजना शेतीला पाणी मिळावे यासाठी त्यांनी सुरू केल्या. त्यांचा हा उपक्रम आदर्श मानून माझे वडील स्वर्गीय राजाराम पाटील यांनी आमच्या भागात सुरू केल्याने वाहून जाणारे पाणी शेतीला सिंचनासाठी मिळाले. जीवन कसे जगावे हे अण्णांनी आपल्याला सांगितले आहे. समाजासाठी कार्य करत असताना समाजाला काहीतरी देण्याची मानसिकता हवी हा महत्त्वाचा मूलमंत्र अण्णांनी सर्वांना दिला असल्याचे ते म्हणाले.

पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले, सातपुड्याच्या पायथ्याशी अण्णा साहेबांनी सहकार चळवळीचा पाया रचला. राजकारणात कसे वागावे, नेहमी स्पष्ट बोलावे व कृती करावी, नुकसान काय होईल याचा विचार न करता सरळ मार्गाने जीवन जगावे याचा आदर्श अण्णांनी घालून दिला आहे. संपूर्ण परिसरात सहकार शिक्षण क्षेत्रात चैतन्य निर्माण झाले आहे. त्यांच्यावरील प्रेमामुळेच आज सर्वपक्षीय नेते व्यासपीठावर जमले असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविक पी. के. अण्णा पाटील फाऊंडेशनचे अध्यक्ष दीपक पाटील यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. विजय शर्मा यांनी केले. आभार तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील पाटील यांनी मानले.