लोकमत न्यूज नेटवर्करांझणी : तळोदा तालुक्यातील रांझणी येथे मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास प्रगतीशिल शेतकरी हेमराज भारती यांच्या मालकीच्या शेतात बैलजोडीच्या सह्याने आदऱ्या पाडवी हे शेतीची मशागत करीत होते. सलग दोन दिवस झालेल्या पावसामुळे शेतजमीन ओली असल्याने मशागत करीत असतांना बैल विद्युत रोहित्राजवळ अचानक खेचल्या गेल्याने वीजेचा धक्का बसून त्यात बैलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. त्यामुळे घटनास्थळी एकच गर्दी होऊन सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.दरम्यान, विद्युत वितरण कंपनीचे अभियंता विलास गुरव यांनी घटना स्थळी भेट देवून पाहणी केली असता संबंधित शेतकºयास नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. या वेळी उपस्थित शेतकऱ्यांनाही त्यांनी पावसाळ्याच्या दिवसात वीजेबाबत खबरदारी घेण्याचे आवाहन केले. या वेळी रांझणी गावातील जीर्ण विद्युत ताराही लवकरच बदलणार असल्याचे सांगितले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.सुनील गोस्वामी यांनी शवविच्छेदन करुन पंचनामा करण्यात आला.
ऐन खरीप हंगामाच्या सुरूवातीलाच जोडीतील एक बैल गेल्याने हळहळ व्यक्त होत असून, कोरोनामुळे आधीच रब्बीत फटका बसलेल्या शेतकरीला मोठा आर्थिक फटका बसणार असल्याने संबंधित शेतकरीला तत्काळ मदत मिळावी, अशीही अपेक्षा व्यक्त होत आहे.