शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
3
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
4
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
5
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
6
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
7
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
8
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
9
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
10
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
11
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
12
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
13
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
14
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
15
उल्हासनगर महापालिका कलानी मुक्त करणार; भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश वधारियांचा इशारा
16
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
17
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
18
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
19
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!
20
Smriti Mandhana: 'वनडे क्वीन'ची 'परफेक्ट कपल गोल' सेट करणारी लव्हस्टोरी! पलाशसोबतचा मैदानातील 'तो' व्हिडिओ व्हायरल

रेनवॉटर हाव्रेस्टींगद्वारे पाणीटंचाईवर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 12:24 IST

वसंत मराठे ।  लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : सध्याच्या प्रचंड तापमानामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी सातत्याने खोल जात असून शहरातील ...

वसंत मराठे । लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : सध्याच्या प्रचंड तापमानामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी सातत्याने खोल जात असून शहरातील बहुसंख्य खाजगी बोअर आटत आहेत. तथापि, येथील एका घरमालकाने पावसाचे वाया जाणारे पाणी रेनवॉटर हाव्रेस्टींगद्वारे आपल्याच घरापुढील कूपनलिकेस जिरवत आहे. त्यांच्या या उपक्रमामुळे घराच्या आजूबाजूच्या परिसरातील पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे दुष्काळी स्थितीचा किंचीतही प्रभाव या भागात झालेला नाही. भूगर्भातील पाण्याची पातळी कायम राखण्यासाठी इतरांनीही असा उपक्रम राबविण्याची आवश्यकता आहे.तळोदा शहरातील लवकुमार पिंपरे यांनी आपल्या घरापुढे बोअर केला आहे. गेल्या पाच वर्षापासून सातत्याने घटत जाणा:या पजर्न्यमानामुळे भूगर्भातील पाण्याच्या पातळीत घट झाली आहे. भविष्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य निश्चितच निर्माण होणार असल्याची परिस्थिती जाणून पावसाचे  वाया जाणारे पाणी जमिनीतच जिरविण्याचा धोरणात्मक निर्णय त्यांनी घेतला. गेल्यावर्षी             पिंपरे यांनी रेनवॉटर हाव्रेस्टींगचा उपक्रम हाती घेतला. आपल्या घराच्या छतावरील वाया            जाणारे पावसाचे पाणी पाईपद्वारे बोअरमध्ये सोडले आहे. त्याठिकाणी ठिबकचा फिल्टरदेखील बसवला आहे. त्यामुळे आपोआपच रेती, माती, गाळ व क्षार फिल्टर होऊन त्यांना शुद्ध पाणी           मिळत आहे. विशेष म्हणजे हे पाणी अतिशय गोड लागत असल्याचे ते सांगतात. त्यांच्या या रेनवॉटर हाव्रेस्टींग उपक्रमामुळे परिसरातील पाण्याच्या पातळीतही वाढ झाली आहे. आजूबाजूच्या बोअरचे पाणी कमी झालेले नाही. वास्तविक यंदा अल्प पजर्न्यमानामुळे शहराबरोबरच ग्रामीण भागात दुष्काळी परिस्थिती आहे. शिवाय रोजच्या वाढत्या तापमानामुळे भूजल पातळीही कमालीची घटत आहे. परिणामी शहरातील बहुसंख्य खाजगी बोअरचे पाणी आटत चालले आहे. मात्र या परिसरात पाण्याच्या पातळीत किंचीतही फरक पडला नसल्याचे ते म्हणतात.20 हजाराचा खर्चरेनवॉटर हाव्रेस्टींगसाठी लवकुमार पिंपरे यांना 20 हजार रुपये खर्च आला आहे. घराच्या तीन हजार स्क्वेअर फूट स्लॅबवरील वाया जाणारे पावसाचे पाणी आपल्याच बोअरमध्ये जिरविण्यासाठी 25 ते 30 फूट लांबीचे दोन पाईप जोडले आहेत. त्याचबरोबर कूपनलिकेजवळ ठिबक सिंचनचे दोन फिल्टर संच बसविले  आहेत. त्यामुळे त्यांना क्षारविरहीत निसर्गाचे  गोड पाणी मिळत आहे. सध्या निसर्गाचे कालचक्र बदलत चालले आहे. तळोदेकरांनी  कधी नव्हे एवढी दुष्काळी स्थिती पहिल्यांदाच पाहिली आहे. साहजिकच अशा दुष्काळी स्थितीमुळे रेनवॉटर हाव्रेस्टींग उपक्रम आवश्यक बनणार आहे.