शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
3
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
4
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
5
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
6
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
7
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
8
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
9
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
10
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
11
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
12
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
13
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
14
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
15
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
16
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
17
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
18
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
19
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
20
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."

रेनवॉटर हाव्रेस्टींगद्वारे पाणीटंचाईवर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 12:24 IST

वसंत मराठे ।  लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : सध्याच्या प्रचंड तापमानामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी सातत्याने खोल जात असून शहरातील ...

वसंत मराठे । लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : सध्याच्या प्रचंड तापमानामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी सातत्याने खोल जात असून शहरातील बहुसंख्य खाजगी बोअर आटत आहेत. तथापि, येथील एका घरमालकाने पावसाचे वाया जाणारे पाणी रेनवॉटर हाव्रेस्टींगद्वारे आपल्याच घरापुढील कूपनलिकेस जिरवत आहे. त्यांच्या या उपक्रमामुळे घराच्या आजूबाजूच्या परिसरातील पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे दुष्काळी स्थितीचा किंचीतही प्रभाव या भागात झालेला नाही. भूगर्भातील पाण्याची पातळी कायम राखण्यासाठी इतरांनीही असा उपक्रम राबविण्याची आवश्यकता आहे.तळोदा शहरातील लवकुमार पिंपरे यांनी आपल्या घरापुढे बोअर केला आहे. गेल्या पाच वर्षापासून सातत्याने घटत जाणा:या पजर्न्यमानामुळे भूगर्भातील पाण्याच्या पातळीत घट झाली आहे. भविष्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य निश्चितच निर्माण होणार असल्याची परिस्थिती जाणून पावसाचे  वाया जाणारे पाणी जमिनीतच जिरविण्याचा धोरणात्मक निर्णय त्यांनी घेतला. गेल्यावर्षी             पिंपरे यांनी रेनवॉटर हाव्रेस्टींगचा उपक्रम हाती घेतला. आपल्या घराच्या छतावरील वाया            जाणारे पावसाचे पाणी पाईपद्वारे बोअरमध्ये सोडले आहे. त्याठिकाणी ठिबकचा फिल्टरदेखील बसवला आहे. त्यामुळे आपोआपच रेती, माती, गाळ व क्षार फिल्टर होऊन त्यांना शुद्ध पाणी           मिळत आहे. विशेष म्हणजे हे पाणी अतिशय गोड लागत असल्याचे ते सांगतात. त्यांच्या या रेनवॉटर हाव्रेस्टींग उपक्रमामुळे परिसरातील पाण्याच्या पातळीतही वाढ झाली आहे. आजूबाजूच्या बोअरचे पाणी कमी झालेले नाही. वास्तविक यंदा अल्प पजर्न्यमानामुळे शहराबरोबरच ग्रामीण भागात दुष्काळी परिस्थिती आहे. शिवाय रोजच्या वाढत्या तापमानामुळे भूजल पातळीही कमालीची घटत आहे. परिणामी शहरातील बहुसंख्य खाजगी बोअरचे पाणी आटत चालले आहे. मात्र या परिसरात पाण्याच्या पातळीत किंचीतही फरक पडला नसल्याचे ते म्हणतात.20 हजाराचा खर्चरेनवॉटर हाव्रेस्टींगसाठी लवकुमार पिंपरे यांना 20 हजार रुपये खर्च आला आहे. घराच्या तीन हजार स्क्वेअर फूट स्लॅबवरील वाया जाणारे पावसाचे पाणी आपल्याच बोअरमध्ये जिरविण्यासाठी 25 ते 30 फूट लांबीचे दोन पाईप जोडले आहेत. त्याचबरोबर कूपनलिकेजवळ ठिबक सिंचनचे दोन फिल्टर संच बसविले  आहेत. त्यामुळे त्यांना क्षारविरहीत निसर्गाचे  गोड पाणी मिळत आहे. सध्या निसर्गाचे कालचक्र बदलत चालले आहे. तळोदेकरांनी  कधी नव्हे एवढी दुष्काळी स्थिती पहिल्यांदाच पाहिली आहे. साहजिकच अशा दुष्काळी स्थितीमुळे रेनवॉटर हाव्रेस्टींग उपक्रम आवश्यक बनणार आहे.