शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

रेनवॉटर हाव्रेस्टींगद्वारे पाणीटंचाईवर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 12:24 IST

वसंत मराठे ।  लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : सध्याच्या प्रचंड तापमानामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी सातत्याने खोल जात असून शहरातील ...

वसंत मराठे । लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : सध्याच्या प्रचंड तापमानामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी सातत्याने खोल जात असून शहरातील बहुसंख्य खाजगी बोअर आटत आहेत. तथापि, येथील एका घरमालकाने पावसाचे वाया जाणारे पाणी रेनवॉटर हाव्रेस्टींगद्वारे आपल्याच घरापुढील कूपनलिकेस जिरवत आहे. त्यांच्या या उपक्रमामुळे घराच्या आजूबाजूच्या परिसरातील पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे दुष्काळी स्थितीचा किंचीतही प्रभाव या भागात झालेला नाही. भूगर्भातील पाण्याची पातळी कायम राखण्यासाठी इतरांनीही असा उपक्रम राबविण्याची आवश्यकता आहे.तळोदा शहरातील लवकुमार पिंपरे यांनी आपल्या घरापुढे बोअर केला आहे. गेल्या पाच वर्षापासून सातत्याने घटत जाणा:या पजर्न्यमानामुळे भूगर्भातील पाण्याच्या पातळीत घट झाली आहे. भविष्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य निश्चितच निर्माण होणार असल्याची परिस्थिती जाणून पावसाचे  वाया जाणारे पाणी जमिनीतच जिरविण्याचा धोरणात्मक निर्णय त्यांनी घेतला. गेल्यावर्षी             पिंपरे यांनी रेनवॉटर हाव्रेस्टींगचा उपक्रम हाती घेतला. आपल्या घराच्या छतावरील वाया            जाणारे पावसाचे पाणी पाईपद्वारे बोअरमध्ये सोडले आहे. त्याठिकाणी ठिबकचा फिल्टरदेखील बसवला आहे. त्यामुळे आपोआपच रेती, माती, गाळ व क्षार फिल्टर होऊन त्यांना शुद्ध पाणी           मिळत आहे. विशेष म्हणजे हे पाणी अतिशय गोड लागत असल्याचे ते सांगतात. त्यांच्या या रेनवॉटर हाव्रेस्टींग उपक्रमामुळे परिसरातील पाण्याच्या पातळीतही वाढ झाली आहे. आजूबाजूच्या बोअरचे पाणी कमी झालेले नाही. वास्तविक यंदा अल्प पजर्न्यमानामुळे शहराबरोबरच ग्रामीण भागात दुष्काळी परिस्थिती आहे. शिवाय रोजच्या वाढत्या तापमानामुळे भूजल पातळीही कमालीची घटत आहे. परिणामी शहरातील बहुसंख्य खाजगी बोअरचे पाणी आटत चालले आहे. मात्र या परिसरात पाण्याच्या पातळीत किंचीतही फरक पडला नसल्याचे ते म्हणतात.20 हजाराचा खर्चरेनवॉटर हाव्रेस्टींगसाठी लवकुमार पिंपरे यांना 20 हजार रुपये खर्च आला आहे. घराच्या तीन हजार स्क्वेअर फूट स्लॅबवरील वाया जाणारे पावसाचे पाणी आपल्याच बोअरमध्ये जिरविण्यासाठी 25 ते 30 फूट लांबीचे दोन पाईप जोडले आहेत. त्याचबरोबर कूपनलिकेजवळ ठिबक सिंचनचे दोन फिल्टर संच बसविले  आहेत. त्यामुळे त्यांना क्षारविरहीत निसर्गाचे  गोड पाणी मिळत आहे. सध्या निसर्गाचे कालचक्र बदलत चालले आहे. तळोदेकरांनी  कधी नव्हे एवढी दुष्काळी स्थिती पहिल्यांदाच पाहिली आहे. साहजिकच अशा दुष्काळी स्थितीमुळे रेनवॉटर हाव्रेस्टींग उपक्रम आवश्यक बनणार आहे.