शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरात पाणीटंचाईमुळे चार लाख नागरिक बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 11:57 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात 2018-19 या वर्षात तब्बल साडेचार लाख नागरिक पाणीटंचाईचे बळी ठरले आहेत़ एकूण 240 ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात 2018-19 या वर्षात तब्बल साडेचार लाख नागरिक पाणीटंचाईचे बळी ठरले आहेत़ एकूण 240 गावांमध्ये गेल्या वर्षभरापासून उपाययोजा सुरु असल्या तरीही अद्याप 93 गावे टंचाईच्या तीव्र झळा सोसत आहेत़ गेल्या वर्षापासून आजवर टंचाई निवारणासाठी तब्बल 11 कोटी रुपयांचा खर्च झाला आह़े         2018 च्या पावसाळ्यात केवळ 67 टक्के पावसाची नोंद झालेल्या नंदुरबार जिल्ह्यात चार तालुके भिषण दुष्काळी म्हणून आधीच घोषित होत़े डिसेंबर 2018 मध्ये अंतीम पैसेवारी घोषित झाल्यानंतर प्रशासनाने जिल्हा दुष्काळी जाहिर केला होता़ या पाश्र्वभूमीवर तयार करण्यात आलेल्या पाणीटंचाई कृती आराखडय़ात ऑक्टोबर 2018 ते जून 2019 या दरम्यान 240 गावे आणि 240 पाडय़ांवर उपाययोजना करण्यात आल्याचे सांगण्यात आले होत़े परंतू ह्या उपाययोजना दीर्घकालीन नसल्याने अद्यापही त्या-त्या गावांमध्ये टंचाई कायम आह़े यामुळे नंदुरबार तालुक्यात सर्वाधिक 1 लाख 97 हजार 934, नवापुर 24 हजार 646, शहादा 1 लाख 64 हजार 924, तळोदा 32 हजार 678, अक्कलकुवा 27 हजार 66 आणि धडगाव तालुक्यातील 23 हजार 544 नागरिक ऑक्टोबर 2018 पासून निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या झळा आजही सोसत आहेत़  प्रशासनाने मार्च महिन्यापासून केलेल्या उपाययोजनांतर्गत अधिग्रहीत विहिरी आणि कूपनलिकांचे पाणी जूनच्या पहिल्या आठवडय़ापासून आटण्यास सुरुवात झाल्याने पाऊस लांबल्यास पाणीटंचाई आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आह़े 

नंदुरबार तालुक्यात 109 गावे आणि 4 पाडे, नवापुर 19 गावे 6 पाडे, शहादा 80 गावे आणि 35 पाडे, तळोदा 25 गावे व 5 पाडे, अक्कलकुवा 5 गावे आणि 27 पाडे तर धडगाव तालुक्यात दोन गावे आणि 137 पाडय़ांवर गेल्या वर्षापासून पाणीटंचाई आह़े यावर मात करण्यासाठी 13 विहिरी खोलीकरण, 88 खाजगी विहिरींचे अधिग्रहण, 20 ठिकाणी टँकर किंवा बैेलगाडीने पाणी, 22 ठिकाणी तात्पुरत्या पाणी योजना तर 302 ठिकाणी विंधन विहिरी आणि 19 तात्पुरत्या नळपाणी योजना करण्याचे नियोजन करण्यात आले होत़े यातील नळपाणी व तात्पुरत्या योजनांची कामे अजूनही पूर्ण झालेली नाहीत़ तर गेल्या महिन्यात केवळ 24 विंधनविहिरींची कामे झाल्याची माहिती देण्यात आली होती़ यानंतर जिल्हा परिषदेने कारवाई करत तातडीने ठेकेदारांना नोटीस बजावत दंड भरण्यास सांगितले होत़े परंतू यानंतर मात्र नवीन ठेकेदराने केलेल्या कामाची स्थिती समजलेली नाही़  नंदुरबार 10, नवापुर 12, शहादा 88, तळोदा 26, अक्कलकुवा 31 तर धडगाव तालुक्यात सर्वाधिक 135 विंधनविहिरी मंजूर होत्या़ 

दरवर्षी करण्यात येणारा टंचाई निवारण कृती आराखडा हा केवळ 15 जूनर्पयत असतो़ 15 जूननंतर येणा:या कोणत्याही प्रस्तावावर कारवाई होत नाही़ यंदा पाऊस लांबल्याने आराखडा लांबेल किंवा कसे हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आह़े एप्रिल ते जून अखेरीचा टप्पा सध्या सुरु आह़े यातही 93 गावे ही टंचाईग्रस्त असल्याचे निर्धारित आह़े यात सर्वाधिक गावे 30 गावे नंदुरबार, नवापुर 3, शहादा 38, तळोदा 18, अक्ककुवा 4 गावे 27 पाडे टंचाईग्रस्त आहेत़ यातील एकूण 1 लाख 90 हजार 272 नागरिक अजूनही टंचाई भोगत आहेत़ प्रशासनाने गावे टंचाईमुक्त केल्याचा दावा केला असला तरी टंचाई कायम आह़े