अचानक वातावरणात बदलामुळे अवकाळी पाऊस येण्याची चिन्हे दिसू लागल्याने बळीराजा चिंतेत दिसून येत आहे. गेल्या वर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे अगोदरच शेतकरी अडचणीत आलेले आहे. तर सप्टेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेंबर, ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीनेही खरीप पिके पूर्णपणे वाया गेली,त् यामुळे नव्या उमेदीने शेतकऱ्यांनी रब्बी पिकांची पेरणी केली. मात्र, सततच्या ढगाळ वातावरणामुळे या पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे पिके वाया जाण्याच्या धास्तीने शेतकरीवर्ग चिंतेत पडला आहे. रब्बी हंगामासाठी विहिरींमध्ये पाणी आहे, पण रब्बीतील गहू आणि हरभरावाढीसाठी पूरक वातावरणाची निर्मिती होणे आवश्यक आहे. त्यामुळे याचा विपरित परिणाम उत्पादनावर होण्याची शक्यता आहे. रब्बीच्या ऐन हंगामात पावसाचे वातावरण तयार होत असून त्यामुळे भाजीपाला व इतर पिकांचे नुकसान होणार आहे. वातावरणातील गारवा वाढल्याने पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होत आहे, त्यामुळे उत्पादनवाढीस खीळ बसते. पावसाळी वातावरण आणि ढग कायम राहिले तर खरिपाप्रमाणेच रब्बीचे नुकसान होईल, अशी भीती शेतकरी व्यक्त करू लागले आहेत. कांदा पिकांवरील कीडनाशकांची फवारणी करीत पिके वाचवण्याचा प्रयत्न शेतकरी करीत आहेत. जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे आणि हेच ढगाळ वातावरण अजून चार ते पाच दिवस राहण्याची शक्यता आहे. अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे कांदा पिकांना जास्त फटका बसण्याची शक्यता आहे.
सप्टेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेंबर, ऑक्टोबर महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीनेही खरीप पिके पूर्णपणे वाया गेली. त्यामुळे नव्या उमेदीने शेतकऱ्यांनी रब्बी पिके घेतली. मात्र, सततच्या ढगाळ वातावरणामुळे कांदा पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे पिके वाया जाण्याच्या धास्तीने शेतकरीवर्ग चिंतेत दिसून येत आहे. रब्बीच्या ऐन हंगामात पावसाचे वातावरण तयार होत असून त्यामुळे कांदा पिकांचे व भाजीपाला नुकसान होत आहे. वातावरणातील गारवा वाढल्याने पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढीस वाव मिळत असल्याने त्यामुळे उत्पादनवाढीस खीळ बसताना दिसून येत आहे. ढगाळ वातावरण कायम राहिले तर खरिपाप्रमाणेच रब्बीचे नुकसान होईल, अशी भीती शेतकरी व्यक्त करू लागले आहेत.