शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
2
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
3
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
4
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
5
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
6
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
7
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
8
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
9
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
10
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
11
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
12
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
13
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
14
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
15
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
16
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
17
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
18
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
20
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS

संशयीत 71 पैकी 40 शिक्षकांबाबत नंदुरबार जि.प.चे वर हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 13:12 IST

एसआयटीकडे बोट : परिचर भरतीचाही चौकशी अहवाल दडपला, संशयकल्लोळ वाढला

मनोज शेलार । लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 3 : अपंग युनिटअंतर्गत जिल्हा परिषदेत बोगस शिक्षक भरतीप्रकरणी संदिग्धता आढळून आलेल्या 71 पैकी 31 शिक्षकांवर गुन्हे दाखल झाले असले तरी उर्वरित 40 शिक्षकांचे काय? हा प्रश्न अद्यापही अनुत्तरीतच आहे.  शिवाय परिचर भरतीचीही चौकशी उघड का केली जात नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्हा परिषदेने तडकाफडकी गुन्हे दाखल करून वाहवा मिळवली, परंतु नंतर प्रकरणात जी शिथीलता आणली गेली त्यामुळे संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. बोगस शिक्षक भरतीचे प्रकरण उघडकीस येवून दोन महिने झाले आहे. चौकशी समितीने 71 जणांच्या कागदपत्र आणि नियुक्तीपत्राबाबत शंका उपस्थित केली होती. त्यानुसार प्रथम टप्प्यात 31 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. शिवाय तत्कालीन दोन शिक्षणाधिकारी आणि चार कर्मचा:यांचा देखील त्यात समावेश होता. उर्वरित 40 शिक्षकांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी ते शासनाकडे पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले. 31 जणांवर गुन्हे दाखल होऊन काहींना अटकही करण्यात आली. परंतु 40 जणांचे काय? हा प्रश्न अजूनही अनुत्तरीतच आहे.या प्रकरणाची व्याप्ती राज्यभर असतांना पहिला गुन्हा दाखल करण्याचे धाडस जिल्हा परिषदेने केले. त्यामुळे राज्यभर कौतूकही झाले. परंतु 71 पैकी केवळ 31 जणांनाच का शिक्षा उर्वरित 40 जण नियमानुसार आणि कायदेशीर बाबींची पुर्तता करून रुजू झाले आहेत काय? तसे असेल तर चौकशी समितीने कुठल्या आधारे त्यांच्यावर शंका घेतली होती? असे एक ना अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. त्याला कारण जिल्हा परिषदेने थांबविलेली चौकशी आणि कारवाई. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याने व त्यात यापूर्वीचे आणि विद्यमान काही वरिष्ठ अधिकारी देखील गोत्यात येण्याची शक्यता असल्यामुळे आणि जिल्हा परिषदेची नाहक बदनामी होत असल्यामुळे पुढील कारवाई थांबविण्यात आली आहे. आता एसआयटीकडेच बोट दाखविण्याचे काम सुरू असल्याची चर्चा देखील सुरू आहे.परिचर भरती चौकशीचे काय?परिचर भरती चौकशीचेही गौडबंगाल कायम आहे. राज्यभरात 32 परिचर अपंग युनिटअंतर्गत सामावून घेण्याच्या सुचना व यादी असतांना एकटय़ा नंदुरबार जिल्ह्यात 23 जणांना सामावून घेण्यात आलेले आहे. यातही मोठे रॅकेट असल्याचे स्पष्ट झाले आहे. चौकशी अहवालात देखील तसे नमुद असल्याचे बोलले जात आहे. मात्र परिचर भरतीचा चौकशी अहवाल देखील गुलदस्त्यातच राहिला आहे. आता हा अहवाल एसआयटीकडे दिला जाणार असल्याचे सांगण्यात येते. परिणामी या प्रकरणीही चालढकल कायम आहे.पोलिसांचा तपासपोलिसांचा तपास देखील संथ गतीने सुरू आहे. ज्या 12 जणांना पोलिसांनी अटक केली आहे त्यांनी कुणामार्फत लाईन लावली होती. कुणाला पैसे दिले होते. कुणी कागदपत्रे तयार करून दिली याबाबत सर्व माहिती दिलेली असतांना पोलीसही मुळ सूत्रधारांर्पयत पोहण्यासंदर्भात चालढकलपणा करीत असल्याचे चित्र आहे.