शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

रखडलेले १२४ हातपंप बसवण्याचे मिळाले आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 12:43 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा प्रशासनाने टंचाई निवारण आराखड्यात मंजूर केलेल्या हातपंपांना अखेर मूहूर्त मिळाला आहे़ दुर्गम भागासह ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा प्रशासनाने टंचाई निवारण आराखड्यात मंजूर केलेल्या हातपंपांना अखेर मूहूर्त मिळाला आहे़ दुर्गम भागासह सपाटीच्या गावांमध्ये मंजूर असलेल्या १२४ हातपंपांचे काम थेट पावसाळ्यात पूर्ण करण्याचे आदेश काढण्यात आले असून दोन महिन्याच्या अवधीत गावोगावी हातपंप सुरु होणार आहेत़कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय कार्यालयांमध्ये मनुष्यबळ कमी असल्याने विविध कामे रखडली होती़ यात टंचाई निवारण आराखड्यात मंजूर करण्यात आलेल्या हातपंपांचाही समावेश करण्यात आला होता़ गेल्या १५ दिवसात या कामांना वेग आला असून जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने १२४ हातपंप आणि विहिर अधिग्रहणाचे प्रस्ताव मंजूर करुन त्यांना कार्यरंभ आदेश दिले आहेत़ या पार्श्वभूमीवर हातपंप आणि पाणी योजनांची मागणी करणाऱ्या गावांना पावसाळ्यात शुद्ध आणि पिण्यायोग्य पाणी मिळणार असून दोन महिन्याच्या आत हा उपक्रम पूर्ण होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे़ दरम्यान अक्कलकुवा तालुक्यात डेब्रामाळ येथील पाणी पुरवठा योजनेचा प्रश्न गेल्या वर्ष भरापासून प्रलंबित होता़ साहित्य बसवूनही प्रशासन याठिकाणी पाण्याच्या मोटारी बसवत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे होते़ याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर संबधित विभागाने कामकाजाला गती दिली असून येत्या आठवड्यात या ठिकाणी मोटारी बसवून पाणी योजनेची ‘टेस्टींग’ करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे़कोरोनामुळे तालुकनिहाय रखडलेल्या पाणी पुरवठा योजनांची कामे बांधकामे तसेच दुरुस्तीच्या कामांचे प्रस्तावही सध्या मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने म्हटले आहे़यंदाच्या टंचाई निवारण आराखड्यात आदिवासी उपयोजनांतर्गत ६५ तर इतर योजनेतून ५९ असे एकूण १२४ हातपंप मंजूर करण्यात आले होते़ यासाठी १ कोटी रुपयांच्या निधीला मान्यता देण्यात आली होती़४धडगाव तालुक्यात ३१, अक्कलकुवा २७, नंदुरबार २९, नवापूर ३०, शहादा ११ आणि तळोदा तालुक्यात १० हातपंप मंजूर करण्यात आले होते़ गतकाळात लॉकडाऊनमुळे आलेल्या अडचणीत हे हातपंप रखडले होते़ या हातपंपांना नुकताच कार्यरंभ आदेश जारी करण्यात आला असून नियुक्त ठेकेदाराकडून हे काम दोन महिन्याच्या अवधीत पूर्ण होईल़अक्कलकुवा तालुक्यातील डेब्रामाळ येथील पाणी योजनेचा प्रश्न गेल्या काही वर्षात गंभीर झाला आहे़ यासाठी सुमारे ४० लाख रुपयांचा खर्चाची सोलर पाणी पुरवठा योजना मंजूर करुन साहित्य बसवण्यात आले होते़ परंतू योजनेची चाचणी रखडल्याने ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागला होता़ यावर मार्ग काढून प्रशासनाने आठ दिवसात चाचणी करुन योजना सुरु करण्याचे नियोजन केले आहे़४टंचाई आराखड्यत जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार मागणी करणाºया ग्रामपंचायतींना पाणी योजना देण्याचे सूचित केले गेले होते़ यानुसार जिल्ह्यातून २१ प्रस्ताव मंजूर झाले असून या प्रस्तावांवर कारवाई करुन नळपाणी योजना १९ गावांमध्ये तातडीने सुरु केली जाणार आहे़जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कामकाजाला गती दिली आहे़ दोन महिन्यात हातपंप पूर्ण होतील़ पावसाळ्यात कामांना वेग देण्यात यावा यासाठी वेळोवेळी संबधितांकडून आढावा घेत पाणीटंचाई दूर करण्यात येणार आहे़-पी़टी़बडगुजर, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जि़प़नंदुरबाऱ