शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
2
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
3
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
4
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
5
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
6
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
7
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
8
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
9
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
10
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
11
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
12
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
13
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
14
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
15
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
16
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
17
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
18
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
19
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
Daily Top 2Weekly Top 5

दांडी बहाद्दर कर्मचाऱ्यांना अहवाल सादर करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:32 IST

तळोदा : येथील प्रांताधिकांऱ्यांच्या भेटीत गैरहजर असलेल्या २५ कर्मचारींचा अहवाल सादर करण्याचे आदेश विभाग प्रमुखांना सहायक जिल्हाधिकारी अविशांत पांडा ...

तळोदा : येथील प्रांताधिकांऱ्यांच्या भेटीत गैरहजर असलेल्या २५ कर्मचारींचा अहवाल सादर करण्याचे आदेश विभाग प्रमुखांना सहायक जिल्हाधिकारी अविशांत पांडा यांनी दिल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता अधिकाऱ्यांच्या अहवालाकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे. कार्यालयाच्या नियोजित वेळेपूर्वीच काही कर्मचारी निघून जात असल्याचे निदर्शनास आल्यामुळे अधिकाऱ्यांनी कारवाई केल्याचे सांगितले जात आहे.

कर्मचारी आपापल्या टेबलावर काम करताना दिसून येत नसल्याने त्यामुळे नागरिकांची कार्यालयीन कामे वेळेवर होत नाही. त्यामुळे शासकीय कार्यालयातील अशा दांडी बहादर कर्मचाऱ्यांच्या बाबतीत येथील सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी होत्या. त्या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी आविशांत पांडा यांनी दुपारी ४ वाजेच्या सुमारास अचानक तहसील कार्यालय, पंचायत समिती, भूमी अभिलेख, बांधकाम विभाग, तलाठी कार्यालय, उपनिबंधक, तालुका कृषी विभाग, पुरवठा विभाग,कोषागार कार्यालय, वनपरिक्षेत्र कार्यालय अशा मध्यवर्ती प्रशासकीय इमारत व परिसरातील कार्यालयात अचानक भेट देऊन झाडाझडती घेतली होती. त्यावेळी तब्बल शासकीय कार्यालयातील २५ कर्मचारी आपापल्या टेबलावर आढळून आले नव्हते. काही कर्मचारी कार्यालयीन व्यवस्थापन बैठकीस गेले व काही रजेवर असल्याचे कारण सांगण्यात आले होते. त्यामुळे या दांडी बहाद्दरावर कारवाई करता आली नाही. या गैरहजर कर्मचाऱ्यांमध्ये काही विभाग विभागप्रमुख देखील होते, मात्र हे विभागप्रमुख कार्यालयीन बैठकीला गेल्याचे सांगण्यात आले होते. या गैरहजर कर्मचाऱ्यांवर पुढील कारवाई करण्यासाठी प्रांताधिकारी अविशांत पांडा यांनी संबंधित विभाग प्रमुखांना नुकतेच पत्र पाठवले असून, त्या दिवसाचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. सदर पत्रात त्यांनी आपल्या भेटीत कार्यालयात गैरहजर आढळून आलेले कर्मचारी अधिकृत रजेवर होते का? शिवाय त्यांना कार्यालयीन कामासाठी बाहेर पाठवले होते का? पाठविले असेल तर तसा वस्तूनिष्ठ, पारदर्शी अहवाल लवकरात लवकर प्रांत कार्यालयात पाठवण्याची सूचना पत्राद्वारे केली आहे. सर्वच विभाग प्रमुखांना सदर पत्रदेखील प्राप्त झाले असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आता या शासकीय कर्मचाऱ्याच्या अहवालाकडे लक्ष लागले आहे. दरम्यान प्रांत कार्यालयातर्फे तहसील कार्यालय, पंचायत समिती, भूमी अभिलेख, बांधकाम विभाग, तलाठी कार्यालय, उपनिबंधक, तालुका कृषी विभाग, पुरवठा विभाग, कोषागार कार्यालय, वनपरिक्षेत्र कार्यालय अशा मध्यवर्ती प्रशासकीय इमारत या विभागातील प्रमुखांना पत्र देऊन ५ ते ६ दिवस झाले असून अजूनही अहवाल प्रांत कार्यालयात प्राप्त झाल्या नसल्याचे सांगितले जात आहे. तथापि विभागातील कर्मचाऱ्यांना कारवाईपासून वाचवण्यासाठी अधिकाऱ्यांकडून केवळ कागदी घोडे नाचवत असण्याची व प्रकरणावर सारवासारव होण्याची शक्यता अधिक असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत सहायक जिल्हाधिकारी अविशांत पांडा यांनी दांडी बहाद्दर कर्मचाऱ्यावर कडक प्रशासन करण्याची गरज आवश्यकता व्यक्त होत आहे. अन्यथा झाडाझडती कारवाईला काही अर्थ उरणार नसल्याचे सांगितले जात आहे.