शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!
3
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
4
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
5
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
6
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
7
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
8
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
9
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
10
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
11
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
12
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
13
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
14
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
15
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
16
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
17
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
18
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
19
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
20
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार

रावला पाणी येथील स्मारकाचे काम मकरसंक्रांतीला सुरू करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2021 12:57 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क तळोदा : तालुक्यातील रावला पाणी येथील स्वातंत्र्य स्मारकासाठी शासनाकडून गेल्या दोन वर्षांपासून निधी उपलब्ध झालेला असताना ...

लाेकमत न्यूज नेटवर्कतळोदा : तालुक्यातील रावला पाणी येथील स्वातंत्र्य स्मारकासाठी शासनाकडून गेल्या दोन वर्षांपासून निधी उपलब्ध झालेला असताना अद्यापपर्यंत कुठलेच काम सबंधित बांधकाम विभागाने सुरू केलेले नाही. त्यामुळे जिल्हाधिकऱ्यांनी याबाबत यंत्रणेला जाब विचारणा करून मकर संक्रांतीला कामाचा शुभारंभ करून मे महिन्या अखेर काम पूर्ण करण्याची तंबी अधिकाऱ्यांना दिली. दरम्यान गवाकऱ्यांनीदेखील सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.तळोदा तालुक्यातील रावला पाणी येथे आदिवासींनी १९४२ साली ब्रिटीश सरकार विरोधात स्वातंत्र्य संग्राम पुकारला होता. त्यामुळे आदिवासींवर ब्रिटिशांनी अमानूष पणे गोळीबार केला होता. त्यात आदिवासी स्वातंत्र्य वीर शहीद झाले होते. साहजिकच रावला पाणी येथील आदिवासींच्या स्वातंत्र्य संग्रामाची युवा पिढीला प्रेरणा मिळावी यासाठी तेथे स्वातंत्र्य स्मारक निर्माण करावे, अशी या परिसरातील आदिवासी जनतेची गेल्या अनेक वर्षंपासूनची मागणी होती. त्यामूळेच शासनाने दोन वर्षांपूर्वी येथील विकासासाठी दोन कोटी साठ लाखांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. परंतु सबंधित बांधकाम विभागाने काही किरकोळ कामा व्यतिरीक्त ठोस काम केले नाही. साहजिकच कामास गती देण्यासाठी स्थानिक  ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हा प्रशासनाकडे अनेक वेळा पाठपुरावा केला होता. त्यानुसार जिल्हाधिकारी डाॅ.राजेंद्र भारुड, सहायक जिल्हाधिकारी आविशंत पांडा, उपवनसंरक्षक पी.के. बागुल, तहसीलदार गिरीष वाखारे        यांनी बुधवारी दुपारी रावलापणी येथे  भेट देवून गोळीबार झाला होता त्याठिकाणी भेट दिली. या वेळी कामची माहिती अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडून जाणून घेतली. याठिकाणी जमीन सपाटीकरण कामा व्यतिरीक्त ठोस काम झाले नसल्यामुळे बांधकामा विभागाच्या कार्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. येत्या मकर संक्रांतीला कामाचा शुभारंभ करून येत्या मे महिन्या अखेरपर्यंत कुठल्याही परिस्थितीत काम पूर्ण करण्याची तंबी बांधकाम विभागास दिली. या वेळी ग्रामस्थांनी तक्रारी न करता कामास सहकार्य करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी डाॅ.कांतीलाल तातीया, जितेंद्र पाडवी यांनी युद्ध पातळींवर काम पूर्ण करण्याची मागणी केली. या ठिकाणी नदीवर पूल, संरक्षण भिंत, सामाजिक सभागृह,  रेस्ट हाऊस, पर्यटकांना राहण्याची व्यवस्था, आदिवासींच्या स्वातंत्र्य संग्रामातील चित्रीकरण अशी  वेगवेगळी कामे करण्यात येणार  आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी भेट दिल्यामुळे साहजिकच कामास गती मिळणार असल्याने गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. या वेळी सभापती यशवंत ठाकरे, जिल्हा परिषद  सदस्य प्रकाश वळवी, सरपंच करूनाबाई पवार, महेंद्र पवार, रतीलाल पाडवी, नारायण ठाकरे, पोलीस निरीक्षक नंदराज पाटील, तालुका कृषी अधिकारी नरेंद्र महाले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे डी.एल. भदाने, वन क्षेत्रपाल निलेश रोहडे, सरपंच गोपी पावरा आदींसह ग्रामस्थ उपस्थित  होते.

ग्रामस्थांनी केली रोजगाराची मागणी.जिल्हाधिकारी डाॅ.राजेंद्र भारुड यांनी रावलापणी येथे भेट दिली. त्यावेळी ग्रामस्थांनी त्यांची भेट घेवून कामास गती देण्याची मागणी केली होती. शिवाय स्थानिक ठिकाणी रोजगार नसल्याने आम्हाला सतत गुजरात येथे स्थलांतर करावे लागत असते. त्यामुळे बारमाही रोजगार उपलब्ध करून द्यावा. तसेच रस्ते नसून, रस्तेही करून द्यावे. विशेष म्हणजे पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही, तिही तातडीने उपलब्ध करून द्या अशा वेगवेगळ्या मागण्या ग्रामस्थांनी केल्या होत्या