शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
3
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
4
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
5
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
6
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
7
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
8
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
9
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
10
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
11
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
12
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
13
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
14
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
15
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
16
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
17
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
18
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
19
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
20
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?

रावला पाणी येथील स्मारकाचे काम मकरसंक्रांतीला सुरू करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2021 12:57 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क तळोदा : तालुक्यातील रावला पाणी येथील स्वातंत्र्य स्मारकासाठी शासनाकडून गेल्या दोन वर्षांपासून निधी उपलब्ध झालेला असताना ...

लाेकमत न्यूज नेटवर्कतळोदा : तालुक्यातील रावला पाणी येथील स्वातंत्र्य स्मारकासाठी शासनाकडून गेल्या दोन वर्षांपासून निधी उपलब्ध झालेला असताना अद्यापपर्यंत कुठलेच काम सबंधित बांधकाम विभागाने सुरू केलेले नाही. त्यामुळे जिल्हाधिकऱ्यांनी याबाबत यंत्रणेला जाब विचारणा करून मकर संक्रांतीला कामाचा शुभारंभ करून मे महिन्या अखेर काम पूर्ण करण्याची तंबी अधिकाऱ्यांना दिली. दरम्यान गवाकऱ्यांनीदेखील सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.तळोदा तालुक्यातील रावला पाणी येथे आदिवासींनी १९४२ साली ब्रिटीश सरकार विरोधात स्वातंत्र्य संग्राम पुकारला होता. त्यामुळे आदिवासींवर ब्रिटिशांनी अमानूष पणे गोळीबार केला होता. त्यात आदिवासी स्वातंत्र्य वीर शहीद झाले होते. साहजिकच रावला पाणी येथील आदिवासींच्या स्वातंत्र्य संग्रामाची युवा पिढीला प्रेरणा मिळावी यासाठी तेथे स्वातंत्र्य स्मारक निर्माण करावे, अशी या परिसरातील आदिवासी जनतेची गेल्या अनेक वर्षंपासूनची मागणी होती. त्यामूळेच शासनाने दोन वर्षांपूर्वी येथील विकासासाठी दोन कोटी साठ लाखांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. परंतु सबंधित बांधकाम विभागाने काही किरकोळ कामा व्यतिरीक्त ठोस काम केले नाही. साहजिकच कामास गती देण्यासाठी स्थानिक  ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हा प्रशासनाकडे अनेक वेळा पाठपुरावा केला होता. त्यानुसार जिल्हाधिकारी डाॅ.राजेंद्र भारुड, सहायक जिल्हाधिकारी आविशंत पांडा, उपवनसंरक्षक पी.के. बागुल, तहसीलदार गिरीष वाखारे        यांनी बुधवारी दुपारी रावलापणी येथे  भेट देवून गोळीबार झाला होता त्याठिकाणी भेट दिली. या वेळी कामची माहिती अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडून जाणून घेतली. याठिकाणी जमीन सपाटीकरण कामा व्यतिरीक्त ठोस काम झाले नसल्यामुळे बांधकामा विभागाच्या कार्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. येत्या मकर संक्रांतीला कामाचा शुभारंभ करून येत्या मे महिन्या अखेरपर्यंत कुठल्याही परिस्थितीत काम पूर्ण करण्याची तंबी बांधकाम विभागास दिली. या वेळी ग्रामस्थांनी तक्रारी न करता कामास सहकार्य करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी डाॅ.कांतीलाल तातीया, जितेंद्र पाडवी यांनी युद्ध पातळींवर काम पूर्ण करण्याची मागणी केली. या ठिकाणी नदीवर पूल, संरक्षण भिंत, सामाजिक सभागृह,  रेस्ट हाऊस, पर्यटकांना राहण्याची व्यवस्था, आदिवासींच्या स्वातंत्र्य संग्रामातील चित्रीकरण अशी  वेगवेगळी कामे करण्यात येणार  आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी भेट दिल्यामुळे साहजिकच कामास गती मिळणार असल्याने गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. या वेळी सभापती यशवंत ठाकरे, जिल्हा परिषद  सदस्य प्रकाश वळवी, सरपंच करूनाबाई पवार, महेंद्र पवार, रतीलाल पाडवी, नारायण ठाकरे, पोलीस निरीक्षक नंदराज पाटील, तालुका कृषी अधिकारी नरेंद्र महाले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे डी.एल. भदाने, वन क्षेत्रपाल निलेश रोहडे, सरपंच गोपी पावरा आदींसह ग्रामस्थ उपस्थित  होते.

ग्रामस्थांनी केली रोजगाराची मागणी.जिल्हाधिकारी डाॅ.राजेंद्र भारुड यांनी रावलापणी येथे भेट दिली. त्यावेळी ग्रामस्थांनी त्यांची भेट घेवून कामास गती देण्याची मागणी केली होती. शिवाय स्थानिक ठिकाणी रोजगार नसल्याने आम्हाला सतत गुजरात येथे स्थलांतर करावे लागत असते. त्यामुळे बारमाही रोजगार उपलब्ध करून द्यावा. तसेच रस्ते नसून, रस्तेही करून द्यावे. विशेष म्हणजे पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही, तिही तातडीने उपलब्ध करून द्या अशा वेगवेगळ्या मागण्या ग्रामस्थांनी केल्या होत्या