शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

रब्बीच्या तयारीसाठी न फुटलेली बोंडेच आणली घरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2020 12:52 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांचा खरीप हंगामातील कापूस लांबणीवर पडत आहे. यात रब्बी हंगामाला उशिर होऊ ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांचा खरीप हंगामातील कापूस लांबणीवर पडत आहे. यात रब्बी हंगामाला उशिर होऊ नये, यासाठी नंदुरबार तालुक्यातील काही शेतकऱ्यांकडून न फुटलेली कापसाची बोंडेच तोडण्यात येत आहे.खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील शेतकºयांकडून मे व जुलै या दोन महिन्यांमध्ये कापसाची लागवड करण्यात आली. अतिवृष्टी व अवकाळी पाऊस अशा संकटांचा सामना करीत शेतकºयांनी कापूस पिकाची काळजी घेतली. त्यात मे महिन्यात लागवड केलेला कापूस संकटातच काढण्यात आला. तर जुलै महिन्यात लागवड करणाºया काही शेतकºयांनी डसेंबरपर्यंत कापूस काढला. तर बहुतांश शेतातील कापसाची बोंडे सतत ढगाळ वातावरण व वातावरणातील बदलांमुळे जानेवारीच्या अखरेपर्यंत फुटली नसून खरीप हंगामच लांबत चालला आहे.खरीपातील कापूस लांबणीवर पडत असल्याने रब्बी हंगामही लांबत काही अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. रब्बी हंगाम लांबू नये, संभाव्य समस्या उद्भवू नये, यासाठी लहान शहादेसह नंदुरबार तालुक्यातील बहुतांश शेतकºयांकडून खरीप हंगामातील कापसाची बोंडे फुटण्याची प्रतिक्षा न करता फुटण्यापूर्वीच बोंडे तोडली जात आहे. त्यातील कापूस मजूरांकडून काढण्यात येत असल्याचे लहान शहाद्याचे किरण पाटील यांनी सांगितले.अतिवृष्टी व अवकाळी पाऊस अशा संकटांचा सामना करीत शेतकºयांनी कापूस पिकाची काळजी घेतली. त्यात मे महिन्यात लागवड केलेला कापूस संकटातच काढण्यात आला. तर जुलै महिन्यात लागवड करणाºया काही शेतकºयांनी डिसेंबरपर्यंत कापूस काढला.नंदुरबार तालुक्यातील शेतकºयांना दुर्गम भागातील शेतमजूरांचा आधार घ्यावा लागत आहे.