शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

कोरोना महामारीवर संत्री, मोसंबी,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : गेल्या चार महिन्यात संत्रे, मोसंबीच्या दरात साधारण २० ते ३० रुपयांची वाढ झाली आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नंदुरबार : गेल्या चार महिन्यात संत्रे, मोसंबीच्या दरात साधारण २० ते ३० रुपयांची वाढ झाली आहे. कोरोना महामारीवर संत्रे, मोसंबी, लिंबू हे उपयुक्त असल्याचे मानले जाते. या काळात या फळांचा रसच नव्हे तर पूर्ण फळ खा, असा सल्ला तज्ज्ञ देतात.

संत्रे, मोसंबी यांच्या दरात गेल्या महिन्याच्या तुलनेत या महिन्यात वाढ झाली आहे. संत्रे १५० ते १६० रुपये किलो, मोसंबी १२० ते १४० रुपये किलो दराने विक्री होत आहे.

मुंबईचा माल व्हाया जळगावहून मागवला जातो

नंदुरबार शहरात साधारण १०-१२ घाऊक विक्रेते आहेत. ते संत्रे, मोसंबी हा माल मुंबईहून मागवतात. परंतु, हाच माल मुंबईहून आधी जळगावला जातो. मग जळगावहून हा सर्व माल नंदुरबारच्या बाजारपेठेत घाऊक विक्रेत्यांकडे येतो. यानंतर पुढे किरकोळ विक्री करणारे विक्रेते हा माल उचलतात. त्यानंतर तो ग्राहकांपर्यंत पोहोचतो. शहरात दररोज २०० बॉक्स अर्थात सुमारे अडीच-तीन हजार क्विंटल मालाची विक्री होते.

तज्ज्ञ म्हणतात...

सद्यस्थितीत संत्री, मोसंबी अशा काही लिंबूवर्गीय फळांचा केवळ रस घेण्यापेक्षा पूर्ण फळ खाणे योग्य राहील. कारण या फळांमध्ये व्हिटॅमिन सी असते. जे शरिराला आवश्यक असते. जशी आपल्या आहारात फळे घेतो, तशी ती नियमितपणे घ्यावी. आपल्या येथे जी फळे पिकतात ती उदा. पेरू, आवळा, करवंद अशा काही फळांमध्ये थोड्याफार प्रमाणात व्हिटॅमिन असतात. या फळांची आपल्याला सवय असते आणि ती आपल्यासाठी फायदेशीर असतात. सध्याच्या हंगामानुसार संत्री, मोसंबी अशा लिंबूवर्गीय फळांना स्थान राहील. पण असे काही नाही की फक्त तीच घेतली पाहिजेत. कारण निसर्गाने त्या हंगामानुसार ती फळं बनवलेली असतात. त्यामुळे त्या ऋतूत येणारी सर्व फळं ही गुणकारी आहेत. पण या फळांना वरचा क्रम राहील. आवळादेखील तितकाच गुणकारी आहे.

- डॉ. वैशाली चव्हाण, होमिओपॅथी तज्ज्ञ व समुपदेशक, नंदुरबार