शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
3
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
4
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
5
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
6
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
7
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
8
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
9
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
10
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
11
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
12
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
13
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
14
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
15
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
16
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
17
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
18
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
19
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
20
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत

कोरोना महामारीवर संत्री, मोसंबी,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : गेल्या चार महिन्यात संत्रे, मोसंबीच्या दरात साधारण २० ते ३० रुपयांची वाढ झाली आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नंदुरबार : गेल्या चार महिन्यात संत्रे, मोसंबीच्या दरात साधारण २० ते ३० रुपयांची वाढ झाली आहे. कोरोना महामारीवर संत्रे, मोसंबी, लिंबू हे उपयुक्त असल्याचे मानले जाते. या काळात या फळांचा रसच नव्हे तर पूर्ण फळ खा, असा सल्ला तज्ज्ञ देतात.

संत्रे, मोसंबी यांच्या दरात गेल्या महिन्याच्या तुलनेत या महिन्यात वाढ झाली आहे. संत्रे १५० ते १६० रुपये किलो, मोसंबी १२० ते १४० रुपये किलो दराने विक्री होत आहे.

मुंबईचा माल व्हाया जळगावहून मागवला जातो

नंदुरबार शहरात साधारण १०-१२ घाऊक विक्रेते आहेत. ते संत्रे, मोसंबी हा माल मुंबईहून मागवतात. परंतु, हाच माल मुंबईहून आधी जळगावला जातो. मग जळगावहून हा सर्व माल नंदुरबारच्या बाजारपेठेत घाऊक विक्रेत्यांकडे येतो. यानंतर पुढे किरकोळ विक्री करणारे विक्रेते हा माल उचलतात. त्यानंतर तो ग्राहकांपर्यंत पोहोचतो. शहरात दररोज २०० बॉक्स अर्थात सुमारे अडीच-तीन हजार क्विंटल मालाची विक्री होते.

तज्ज्ञ म्हणतात...

सद्यस्थितीत संत्री, मोसंबी अशा काही लिंबूवर्गीय फळांचा केवळ रस घेण्यापेक्षा पूर्ण फळ खाणे योग्य राहील. कारण या फळांमध्ये व्हिटॅमिन सी असते. जे शरिराला आवश्यक असते. जशी आपल्या आहारात फळे घेतो, तशी ती नियमितपणे घ्यावी. आपल्या येथे जी फळे पिकतात ती उदा. पेरू, आवळा, करवंद अशा काही फळांमध्ये थोड्याफार प्रमाणात व्हिटॅमिन असतात. या फळांची आपल्याला सवय असते आणि ती आपल्यासाठी फायदेशीर असतात. सध्याच्या हंगामानुसार संत्री, मोसंबी अशा लिंबूवर्गीय फळांना स्थान राहील. पण असे काही नाही की फक्त तीच घेतली पाहिजेत. कारण निसर्गाने त्या हंगामानुसार ती फळं बनवलेली असतात. त्यामुळे त्या ऋतूत येणारी सर्व फळं ही गुणकारी आहेत. पण या फळांना वरचा क्रम राहील. आवळादेखील तितकाच गुणकारी आहे.

- डॉ. वैशाली चव्हाण, होमिओपॅथी तज्ज्ञ व समुपदेशक, नंदुरबार