शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
3
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
4
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
5
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
6
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
7
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
8
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
9
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
10
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
11
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
12
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
13
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
14
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
15
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
16
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
17
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
20
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

विसरवाडीत महामार्ग चौपदरीकरणास विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 12:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्कविसरवाडी  : नवापूर तालुक्यातील विसरवाडी गावातून जाणा:या धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या चौपदीकरणाचे काम सुरू झाले आह़े यात विसरवाडी गावातील काही घरे आणि दुकाने काढण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर एकच गहजब उडाला आह़े कोणतिही पूर्वसूचना न देता महामार्ग प्राधिकरणने घरे पाडण्याची कारवाई हाती घेतल्याने नाराजी व्यक्त होत आह़े   गेल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कविसरवाडी  : नवापूर तालुक्यातील विसरवाडी गावातून जाणा:या धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या चौपदीकरणाचे काम सुरू झाले आह़े यात विसरवाडी गावातील काही घरे आणि दुकाने काढण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर एकच गहजब उडाला आह़े कोणतिही पूर्वसूचना न देता महामार्ग प्राधिकरणने घरे पाडण्याची कारवाई हाती घेतल्याने नाराजी व्यक्त होत आह़े   गेल्या काही वर्षात विसरवाडी गावाच्या मध्यातून जाणा:या धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या दोन्ही बाजूस मोठय़ा प्रमाणावत बांधकामे झाली आहेत़ यातील काही बांधकामे ही ग्रामपंचायतीच्या परवानगीने तर निवडक बांधकामे ही रस्त्यार्पयत वाढली आहेत़ यात अनेकांची घरे आहेत़ 30 वर्षापेक्षा अधिक कालावधीच्या या घरांचे आणि दुकानांचे अतिक्रमण काढण्याची कारवाई मंगळवारपासून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडून सुरू करण्यात आले होत़े कोणतिही पूर्वसूचना न देता अतिक्रमण काढण्याच्या या कारवाईला दुकानदार आणि ग्रामस्थ यांनी विरोध केल्यानंतर हे काम थांबवण्यात आल्याचे सांगण्यात आले आह़े यासाठी ग्रामपंचायतीकडून कोणत्याही प्रकारे ना-हरकत दाखला किंवा नोटिसा देण्यात आलेल्या नसल्याने यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आह़े ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ यांनी अतिक्रमण काढण्याचे काम थांबवण्याच्या मागणीचे निवेदन बुधवारी सकाळी पोलीस निरीक्षकांना दिले आह़े साधारण 30 वर्षापेक्षा अधिक जुन्या असलेल्या घरे आणि दुकानांना आधी मोबदला आणि मग नोटीस त्यानंतरच घरे पाडणे किंवा दुकान हटवण्याची कारवाई करण्याचा नियम असताना, महामार्ग प्राधिकरणच्या अधिका:यांनी परस्पर ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्यालगतच्या घरांचे सव्रेक्षण करून मोबदला देण्याची माहिती संबधितांना दिली होती़ मात्र रस्त्यालगतच्या इतर छोटे विक्रेते किंवा कच्ची मातीची घरे यांच्या मालकांना कोणतीही सूचना किंवा त्यांचे सव्रेक्षण केलेले नसल्याची गंभीर बाब समोर आली आह़े यातही 15 जानेवारी रोजी कोणतीही पूर्वसूचना न देता सायंकाळी चार वाजेपासून दुकाने पाडण्यास सुरूवात केली़ यात काहींची दुकाने जमिनदोस्त झाली आहेत़ त्यांच्या साहित्याची तूटफूट होऊन नुकसान झाले आह़े या कारवाईनंतर विसरवाडी गावातील अनेकांची चांगलीच धावपळ उडाली़ मंगळवारीही कारवाई सुरू करण्यात आल्यानंतर नागरिकांनी विरोध करत आधी मोबदला आणि नंतर अतिक्रमण काढावे अशी भूमिका घेत कामाला विरोध केला़ यावेळी ग्रामपंचायतीचे सरपंच बकाराम गावीत महेश अग्रवाल, आबिद शेख यांच्यासह गावातील ज्येष्ठांनी हस्तक्षेप करत महामार्ग प्राधिकरणच्या अधिका:यांना जाब विचारला,संबधित अधिका:यांनी थातूरमातूर उत्तर दिल्याने उपस्थित सर्वानीच नाराजी व्यक्त करत, मोबदल्याशिवाय रस्त्याच्या दुर्तफा असलेल्या घरांची तोडफोड केल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला़