शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

विसरवाडीत महामार्ग चौपदरीकरणास विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 12:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्कविसरवाडी  : नवापूर तालुक्यातील विसरवाडी गावातून जाणा:या धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या चौपदीकरणाचे काम सुरू झाले आह़े यात विसरवाडी गावातील काही घरे आणि दुकाने काढण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर एकच गहजब उडाला आह़े कोणतिही पूर्वसूचना न देता महामार्ग प्राधिकरणने घरे पाडण्याची कारवाई हाती घेतल्याने नाराजी व्यक्त होत आह़े   गेल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कविसरवाडी  : नवापूर तालुक्यातील विसरवाडी गावातून जाणा:या धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या चौपदीकरणाचे काम सुरू झाले आह़े यात विसरवाडी गावातील काही घरे आणि दुकाने काढण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर एकच गहजब उडाला आह़े कोणतिही पूर्वसूचना न देता महामार्ग प्राधिकरणने घरे पाडण्याची कारवाई हाती घेतल्याने नाराजी व्यक्त होत आह़े   गेल्या काही वर्षात विसरवाडी गावाच्या मध्यातून जाणा:या धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या दोन्ही बाजूस मोठय़ा प्रमाणावत बांधकामे झाली आहेत़ यातील काही बांधकामे ही ग्रामपंचायतीच्या परवानगीने तर निवडक बांधकामे ही रस्त्यार्पयत वाढली आहेत़ यात अनेकांची घरे आहेत़ 30 वर्षापेक्षा अधिक कालावधीच्या या घरांचे आणि दुकानांचे अतिक्रमण काढण्याची कारवाई मंगळवारपासून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडून सुरू करण्यात आले होत़े कोणतिही पूर्वसूचना न देता अतिक्रमण काढण्याच्या या कारवाईला दुकानदार आणि ग्रामस्थ यांनी विरोध केल्यानंतर हे काम थांबवण्यात आल्याचे सांगण्यात आले आह़े यासाठी ग्रामपंचायतीकडून कोणत्याही प्रकारे ना-हरकत दाखला किंवा नोटिसा देण्यात आलेल्या नसल्याने यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आह़े ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ यांनी अतिक्रमण काढण्याचे काम थांबवण्याच्या मागणीचे निवेदन बुधवारी सकाळी पोलीस निरीक्षकांना दिले आह़े साधारण 30 वर्षापेक्षा अधिक जुन्या असलेल्या घरे आणि दुकानांना आधी मोबदला आणि मग नोटीस त्यानंतरच घरे पाडणे किंवा दुकान हटवण्याची कारवाई करण्याचा नियम असताना, महामार्ग प्राधिकरणच्या अधिका:यांनी परस्पर ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्यालगतच्या घरांचे सव्रेक्षण करून मोबदला देण्याची माहिती संबधितांना दिली होती़ मात्र रस्त्यालगतच्या इतर छोटे विक्रेते किंवा कच्ची मातीची घरे यांच्या मालकांना कोणतीही सूचना किंवा त्यांचे सव्रेक्षण केलेले नसल्याची गंभीर बाब समोर आली आह़े यातही 15 जानेवारी रोजी कोणतीही पूर्वसूचना न देता सायंकाळी चार वाजेपासून दुकाने पाडण्यास सुरूवात केली़ यात काहींची दुकाने जमिनदोस्त झाली आहेत़ त्यांच्या साहित्याची तूटफूट होऊन नुकसान झाले आह़े या कारवाईनंतर विसरवाडी गावातील अनेकांची चांगलीच धावपळ उडाली़ मंगळवारीही कारवाई सुरू करण्यात आल्यानंतर नागरिकांनी विरोध करत आधी मोबदला आणि नंतर अतिक्रमण काढावे अशी भूमिका घेत कामाला विरोध केला़ यावेळी ग्रामपंचायतीचे सरपंच बकाराम गावीत महेश अग्रवाल, आबिद शेख यांच्यासह गावातील ज्येष्ठांनी हस्तक्षेप करत महामार्ग प्राधिकरणच्या अधिका:यांना जाब विचारला,संबधित अधिका:यांनी थातूरमातूर उत्तर दिल्याने उपस्थित सर्वानीच नाराजी व्यक्त करत, मोबदल्याशिवाय रस्त्याच्या दुर्तफा असलेल्या घरांची तोडफोड केल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला़