शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

नंदुरबारातील महामोर्चाद्वारे धनगर आरक्षणाला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 15:28 IST

धनगर आरक्षणासंदर्भात रिट याचिकेत प्रतिज्ञापत्रही दाखल करणार आहे़

नंदुरबार : केंद्राकडे धनगर समाजाला अनुसुचित जमातीच्या यादीत स्थान द्यावे अशी शिफारस राज्य सरकार करणार आहे़ तसेच मुंबई उच्च न्यायालयात धनगर आरक्षणासंदर्भात रिट याचिकेत प्रतिज्ञापत्रही दाखल करणार आहे़ सरकारने हे दोन्ही निर्णय मागे घ्यावेत या मागणीसाठी नंदुरबार येथे आदिवासी बचाव महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते़ यात शेकडो आदिवासी बांधव सहभागी झाले़शुक्रवारी दुपारी १२ वाजता महाराणा प्रताप पुतळ्यापासून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली़ नेहरु चौक, जुनी नगरपालिका चौक, शास्त्री मार्केट, माणिक चौक, सोनार खुंट या मार्गाने साक्री नाका परिसरातील बाबासाहेब पुतळा येथून हा मोर्चा नवापूर चौफुलीकडे निघाला़ नवापूर चौफुलीवरुन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या देत सभा घेण्यात आली़सभेस माजीमंत्री अ‍ॅड पद्माकर वळवी, राष्ट्रीय आदिम जनजातील विचार मंचचे अध्यक्ष राजेंद्रकुमार गावीत, ज्येष्ठ साहित्यिक वाहरु सोनवणे, माजी आमदार डॉ़ नरेंद्र पाडवी, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास नाईक, डॉ़ भरत वळवी, आदिवासी साखर कारखान्याचे चेअरमन शिरीषकुमार नाईक, नंदुरबार पालिका सभापती कुणाल वसावे, आदिवासी महासंघाचे आमशा पाडवी, डॉ़ राजेश वळवी, भिमसिंग वळवी, वासुदेव गांगुर्डे, मालती पाडवी, दिपा वळवी, नामदेव पटले, मोहन शेवाळे, माजी सभापती सीक़े़पाडवी, वासुदेव गांगुर्डे, अर्जुनसिंग वसावे, रविंद्र पाडवी, प्रमोद नाईक, सुवर्ण नाईक, निलेश पाडवी, करणसिंग तडवी, रविंद्र मुसळदे, विनोद माळी, सुरेश मोरे, ज्ञानेश्वर ठाकरे, प्रमोद गायकवाड, मालती वळवी, अंजू पाडवी, डॉ़ जर्मनसिंग पाडवी, अ‍ॅड़ कैैलास वसावे, डॉ़ योगेश वळवी, पंडीत तडवी, जगदीश वळवी, दत्तू भिल, विक्रमसिंग वळवी यांच्यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते़ प्रारंभी ज्येष्ठ साहित्यिक वाहरु सोनवणे यांन मार्गदर्शन केले़माजीमंत्री अ‍ॅड़ वळवी यांनी आदिवासींच्या अस्तित्त्वाचा हा मोर्चा आहे़ मुख्यमंत्री आदिवासींचे वैरी असल्यासारखेच वागत आहेत़ धनगर समाज आर्थिकदृष्ट्या सधन असताना त्यांना आरक्षण देणे चुकीचे आहे़ आदिवासी समाजाने आता कायद्याची लढाई लढणे गरजेचे आहे़राजेंद्रकुमार गावीत यांनी आदिवासींना आरक्षणाविरोधात एकत्र लढा द्यावा लागेल़ जातीयवादी सरकारच्या निर्णयांमुळे नुकसान होत असून हा निर्णय हा आदिवासीविरोधी असल्याचे सांगितले़शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले़ निवेदनात धनगर समाज आरक्षणाचा निर्णय रद्द करावा, डिबीटी तात्काळ रद्द करावी, वनदाव्यांना मंजुरी, आदिवासी आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावे, बोगस आदिवासींवर कारवाई करावी, आदिवासींचा राखीव निधी इतर कोणालाही देवू नये आदी मागण्या करण्यात आल्या़मोर्चात आदिवासी एकता परिषद, आदिवासी हक्क संरक्षण समिती, राष्ट्रीय आदिम जनजाती विचार मंच, आदिवासी महासंघ, आदिवासी डॉक्टर्स असोसिएशन, आदिवासी मौखिक साहित्य परिषद, डोंगऱ्यादेव माऊली संघर्ष समिती, आदिवासी पावरा बारेला समाज, भिल्लीस्थान विकास मोर्चा, आदिवासी टायगर सेना, कोकणी-कोकणा महासंघ, भिल्लीस्थान टायगर सेना आदी संघटनांचा सहभाग होता़