शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन उगवण क्षमतेबाबत दोनच तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 11:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : राज्यात सोयाबीन बियाणे उगवणीबाबत शेतकऱ्यांच्या असंख्य तक्रारी कृषी विभागाला प्राप्त होत आहेत़ यातून बोगस ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : राज्यात सोयाबीन बियाणे उगवणीबाबत शेतकऱ्यांच्या असंख्य तक्रारी कृषी विभागाला प्राप्त होत आहेत़ यातून बोगस बियाण्याचा प्रश्न समोर आला आहे़ परंतु नंदुरबार जिल्ह्यात याउलट स्थिती असून केवळ दोन शेतकऱ्यांनी बियाणे उगवणीबाबत तालुकास्तरावर तक्रार दिली होती़ या तक्रारींचे निरसन करण्यात आले आहे़शहादा तालुक्यातील एक आणि अक्कलकुवा तालुक्याच्या एका शेतकºयाने सोयाबीन बियाणे पेरणी केल्यानंतर रोपच उगवले नसल्याची तक्रार तालुका कृषी विभागस्तरावर केली होती़ या तक्रारीनुसार बियाणे कंपन्यांना सूचना केल्यानंतर त्यांनी त्या परस्पर बदलून देत शेतकºयांचे समाधान करुन दिले आहे़ सोयाबीन बियाण्यांबाबत जिल्हाधिकारी यांनी कृषी विभागाला सक्तीचे आदेश देत बियाणे तपासणी करुन घेण्याचे सूचित केले आहे़ त्यानुसार गुणनियंत्रण अधिकारी यांच्यासह तालुकास्तरीय पथके बियाणे तपासणी करत आहेत़ दोन तक्रारी वगळता जिल्ह्यात एकही तक्रार प्राप्त झालेली नसल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे़ दरम्यान सोयाबीन बियाण्याची योग्य प्रकारे वाहतूक न करणे, साठा करुन ठेवताना अयोग्य जागा तसेच शेतकºयांकडून ओल नसलेल्या जमिनीत पेरणी यामुळे अडचणी येत असाव्यात असा अंदाज कृषी तज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे़ जिल्ह्यात महाबीजसह पाच खाजगी कंपन्या सोयाबीन बियाण्याचा दरवर्षी पुरवठा करतात़

जिल्ह्यात यंदा २७ हजार २४१ हेक्टर क्षेत्रात सोयाबीन पेरणीचा अंदाज आहे़ यातून आजअखेरीस १७ हजार ५३७ हेक्टर क्षेत्रात सोयाबीन पेरा पूर्ण झाला आहे़ जिल्ह्यात प्रतीहेक्टर ७५ किलो सोयाबीन बियाणे लागते़ यामुळे कृषी विभागाने १५ हजार ७५० क्विंटल सोयाबीन बियाण्याची आवक करुन घेतली आहे़