शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्तच्या कामांची केवळ औपचारिकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 11:36 IST

गेल्या वर्षाची कामे अपुर्ण : दुष्काळ संधी समजून कामांना प्राधान्य द्यावे

नंदुरबार : गेल्या दोन वर्षांपासून जलयुक्तची कामे थंड पडली आहेत. यंदा दुष्काळी स्थिती असतांना नेमके जलयुक्त आहे कुठे? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडत आहे. याउलट अवघ्या दोन तालुक्यांपुरते मर्यादीत असलेल्या पाणी फाऊंडेशनच्या कामांची सध्या जिल्हाभरात चर्चा आहे. गेल्यावर्षी १८० गावांमध्ये हे अभियान राबविण्यात आले, परंतु अनेक कामे अद्यापही पुर्ण झालेली नाहीत तर यंदा २०६ गावांमध्ये ते राबविले जाणार आहे.चार वर्षांपूर्वी जलयुक्त शिवार अभियान राबविण्यास सुरुवात झाली. पहिल्या वर्षी ७० गावांची निवड करण्यात आली होती. आहे त्या तलावांचा गाळ काढणे, खोलीकरण करणे, सिमेंट बांध, कच्चा बांध बांधणे, रिचार्जशाप्ट, कुपनलिका पुनर्रभरण, शेततळे करणे, गॅबीयन बंधारे यासह इतर जलसंधारणाची कामे या योजनेअंतर्गत करण्यात येत होती. त्यासाठी तालुकानिहाय गावांची निवड करण्यात येते. पहिल्या वर्षी ७० तर दुसऱ्या वर्षी ७६ गावांची निवड करण्यात आली होती. नंतर या गावांची संख्या वाढत गेली. यंदाच्या वर्षाला २०६ गावांची निवड या योजनेअंतर्गत होणाºया कामांसाठी करण्यात आली आहे.सुरुवातीला प्रतिसादपहिल्या दोन वर्षी बºयापैकी प्रतिसाद मिळाला. पहिल्या वर्षी स्वत: मुख्यमंत्र्यांनी येवून या कामांची पहाणी केली होती. दुसºया वर्षीही चांगला प्रतिसादर राहिला. मात्र, तिसºया वर्षापासून गावांची संख्या वाढली आणि कामांचा दर्जा घसरला. गेल्या वर्षी १८० गावांची निवड करण्यात आली होती. पैकी या गावांच्या कामे अद्यापही पुर्ण झालेली नाहीत. त्यातच आता २०१९-२० च्या कामांना सुुरुवात होत आहे.जलयुक्त शिवार अभियानात गावे निवडतांना पहिल्या दोन वर्षात मोजकेच गावे निवडली जात होती. त्यामुळे अनेक गावांची इच्छा असूनही त्यांना या अभियानात सहभागी होता येत नव्हते.झालेल्या कामांचे आॅडीट व्हावेजलयुक्तमध्ये झालेल्या कामांचे आॅडीट करण्याची मागणी वेळोवेळी अनेक संघटनांनी केली होती. पहिल्या व दुसºया वर्षी झालेल्या कामांची स्थिती काय आहे. किती सातत्य त्यात राहिले या बाबीही पडताळून पहाणे आवश्यक ठरणार आहे. नाही तर केवळ योजना राबवयाची असे प्रकार सुरू आहे. दुसरीकडे पाणी फाऊंडेशनने नंदुरबार व शहादा तालुक्यात यंदा मोठ्या प्रमाणावर जनजागृती करीत कामांना सुरुवात केली आहे. त्यातील लोकसहभाग लक्षणीय ठरत आहे. परिणामी जलयुक्तीची कामात केवळ निधी खर्च करणे एवढेच उद्दीष्ट राहिल्याचे बोलले जात आहे.