शहरं
Join us  
Trending Stories
1
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
2
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
3
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
4
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
5
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले
6
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
7
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
8
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
9
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
10
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
11
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
12
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
13
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
14
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
15
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
16
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
17
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
18
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
19
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
20
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक

जलयुक्तच्या कामांची केवळ औपचारिकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 11:36 IST

गेल्या वर्षाची कामे अपुर्ण : दुष्काळ संधी समजून कामांना प्राधान्य द्यावे

नंदुरबार : गेल्या दोन वर्षांपासून जलयुक्तची कामे थंड पडली आहेत. यंदा दुष्काळी स्थिती असतांना नेमके जलयुक्त आहे कुठे? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडत आहे. याउलट अवघ्या दोन तालुक्यांपुरते मर्यादीत असलेल्या पाणी फाऊंडेशनच्या कामांची सध्या जिल्हाभरात चर्चा आहे. गेल्यावर्षी १८० गावांमध्ये हे अभियान राबविण्यात आले, परंतु अनेक कामे अद्यापही पुर्ण झालेली नाहीत तर यंदा २०६ गावांमध्ये ते राबविले जाणार आहे.चार वर्षांपूर्वी जलयुक्त शिवार अभियान राबविण्यास सुरुवात झाली. पहिल्या वर्षी ७० गावांची निवड करण्यात आली होती. आहे त्या तलावांचा गाळ काढणे, खोलीकरण करणे, सिमेंट बांध, कच्चा बांध बांधणे, रिचार्जशाप्ट, कुपनलिका पुनर्रभरण, शेततळे करणे, गॅबीयन बंधारे यासह इतर जलसंधारणाची कामे या योजनेअंतर्गत करण्यात येत होती. त्यासाठी तालुकानिहाय गावांची निवड करण्यात येते. पहिल्या वर्षी ७० तर दुसऱ्या वर्षी ७६ गावांची निवड करण्यात आली होती. नंतर या गावांची संख्या वाढत गेली. यंदाच्या वर्षाला २०६ गावांची निवड या योजनेअंतर्गत होणाºया कामांसाठी करण्यात आली आहे.सुरुवातीला प्रतिसादपहिल्या दोन वर्षी बºयापैकी प्रतिसाद मिळाला. पहिल्या वर्षी स्वत: मुख्यमंत्र्यांनी येवून या कामांची पहाणी केली होती. दुसºया वर्षीही चांगला प्रतिसादर राहिला. मात्र, तिसºया वर्षापासून गावांची संख्या वाढली आणि कामांचा दर्जा घसरला. गेल्या वर्षी १८० गावांची निवड करण्यात आली होती. पैकी या गावांच्या कामे अद्यापही पुर्ण झालेली नाहीत. त्यातच आता २०१९-२० च्या कामांना सुुरुवात होत आहे.जलयुक्त शिवार अभियानात गावे निवडतांना पहिल्या दोन वर्षात मोजकेच गावे निवडली जात होती. त्यामुळे अनेक गावांची इच्छा असूनही त्यांना या अभियानात सहभागी होता येत नव्हते.झालेल्या कामांचे आॅडीट व्हावेजलयुक्तमध्ये झालेल्या कामांचे आॅडीट करण्याची मागणी वेळोवेळी अनेक संघटनांनी केली होती. पहिल्या व दुसºया वर्षी झालेल्या कामांची स्थिती काय आहे. किती सातत्य त्यात राहिले या बाबीही पडताळून पहाणे आवश्यक ठरणार आहे. नाही तर केवळ योजना राबवयाची असे प्रकार सुरू आहे. दुसरीकडे पाणी फाऊंडेशनने नंदुरबार व शहादा तालुक्यात यंदा मोठ्या प्रमाणावर जनजागृती करीत कामांना सुरुवात केली आहे. त्यातील लोकसहभाग लक्षणीय ठरत आहे. परिणामी जलयुक्तीची कामात केवळ निधी खर्च करणे एवढेच उद्दीष्ट राहिल्याचे बोलले जात आहे.