शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल; पित्याच्या आत्महत्याप्रकरणी चार जणांना अटक
4
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
5
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
6
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
7
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
8
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
9
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
10
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
11
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
12
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
13
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
14
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
15
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
16
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
17
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
18
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
19
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
20
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट

आकांक्षित जिल्ह्यातच अधिकाऱ्यांचा वाणवा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:24 IST

नंदुरबार : नंदुरबार जिल्हा हा विकासाच्या बाबतीत मागास जिल्हा असल्याने केंद्र शासनाने या जिल्ह्याचा समतोल विकास साधण्यासाठी आकांक्षित जिल्ह्यात ...

नंदुरबार : नंदुरबार जिल्हा हा विकासाच्या बाबतीत मागास जिल्हा असल्याने केंद्र शासनाने या जिल्ह्याचा समतोल विकास साधण्यासाठी आकांक्षित जिल्ह्यात समावेश करुन विकासाचे विविध उपक्रम सुरू केले आहेत. या जिल्ह्याला मागास जिल्ह्यातून बाहेर काढण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखण्यात आला आहे. असे असले तरी जिल्ह्याच्या विकासाबाबत मात्र राज्यकर्त्यांकडून गांभीर्याने पाहिले जात नसल्याचे चित्र आहे. विकास योजना राबवणारी प्रशासकीय यंत्रणाच जिल्ह्यात रिक्त पदांमुळे खिळखिळी झाली आहे. वर्ग-३ व ४ सोडा पण प्रमुख जबाबदारी सांभाळणारेच अनेक अधिकाऱ्यांची पदे वर्षानुवर्षे रिक्त असल्याने त्याचा परिणाम साहजिकच योजनांच्या अंमलबजावणीवर झाला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे आदिवासी विकासमंत्री ॲड.के.सी. पाडवी यांनी आता हा प्रश्न मनावर घेऊन तो तात्काळ मार्गी लावण्याची आवश्यकता आहे.

धुळे जिल्ह्यातून नंदुरबार जिल्ह्याचे विभाजन होऊन २३ वर्षे झाली असली तरी अजूनही काही कार्यालयांची प्रतीक्षा सुरूच आहे. विशेष म्हणजे अनेक विभाग अजूनही प्रभारी अधिकाऱ्यांवरच अवलंबून आहेत. महसूल विभागाचे चित्र पाहिल्यास नंदुरबार आणि तळोदा या दोन्ही ठिकाणी सहायक जिल्हाधिकारी अर्थात प्रांताधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. सरदार सरोवर प्रकल्पातील उपजिल्हाधिकारी पदही रिक्त आहे. प्रशासन आणि पुनर्वसन विभागाचे दोन्ही उपजिल्हाधिकारी अनेक दिवसांपासून रजेवर आहेत. अशीच गत अक्कलकुवा तहसीलदारांची आहे. जिल्हा परिषदेतील रिक्त पदांची यादी तर भली मोठी आहे. याठिकाणी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या पदाबरोबर सामान्य प्रशासन, महिला बालकल्याणचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नाहीत. प्राथमिक जिल्हा शिक्षणाधिकारी नाहीत. समाज कल्याण अधिकारी, जिल्हा ग्रामीण विकास अधिकारी, बांधकामचे कार्यकारी अभियंता यांची पदे रिक्तच आहेत. धडगाव, अक्कलकुवा, तळोदा आणि नंदुरबार या चारही तालुका ठिकाणचे गटविकास अधिकारी नाहीत. चार गटशिक्षणाधिकारी नाहीत. दोन बालविकास प्रकल्प अधिकारी नाहीत. सार्वजनिक बांधकाम विभागात शहादा विभागाचे कार्यकारी अभियंता नाहीत. तेथेच उपअभियंता नाहीत. मोलगी, धडगावलाही उपअभियंता नाहीत. आदिवासी एकात्मिक प्रकल्पाचे तळोदा आणि नंदुरबार या दोन्ही ठिकाणी प्रकल्प अधिकारी नाहीत. कृषी विभाग, वन विभागाची अवस्थादेखील अशीच आहे. त्यामुळे प्रमुख जबाबदारी सांभाळणारे अधिकारीच नसतील तर प्रशासन गतीमान होईल कसे? एकीकडे जिल्ह्यात नियमित योजनांबरोबरच सरदार सरोवर प्रकल्प तसेच अतिक्रमीत वनजमीन धारकांची सुनावणी यासह अनेक अतिरिक्त उपक्रम जिल्ह्यात आहेत. कुपोषण, सिकलसेलचा प्रश्नही गंभीर आहे. त्यामुळे सर्व स्तरावरुन योजनांचे नियोजन करताना सक्षम अधिकारी असणे आवश्यक आहे. मात्र बहुतांश प्रमुख पदेच रिक्त असल्याने योजनांच्या अंमलबजावणीवर त्याचा निश्चितच परिणाम दिसून येतो.

नंदुरबार जिल्हा हा आदिवासी बहुल वस्तीचा जिल्हा आहे. १५ वर्षानंतर जिल्ह्याकडे पुन्हा आदिवासी विकास विभागाचे मंत्रीपद मिळाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जनतेच्या विकासाच्या अपेक्षाही वाढल्या आहेत. त्यातच नीती आयोगाने जिल्ह्याचा आकांक्षित जिल्ह्यांमध्ये समावेश करुन नव्या योजना व उपक्रम राबविण्याची संधी दिली आहे. त्याचा पुरेपूर फायदा घेऊन जिल्ह्याला इतर विकसीत जिल्ह्यांच्या बरोबरीने आणण्यासाठी प्रयत्नांची आवश्यकता आहे. त्यासाठी पालकमंत्री ॲड.के.सी. पाडवी यांनी आपल्या मंत्रीपदाचा पुरेपूर लाभ जिल्ह्याला मिळवून देण्यासाठी अधिक आक्रमकपणे काम करावे, अशी जनतेची अपेक्षा आहे. विशेषत: रिक्त पदे भरण्यासाठी त्यांनी राज्य शासनाकडे पाठपुरावा करुन हा प्रश्न निकाली काढण्याची गरज आहे.