शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक युद्ध थांबविणारे ट्रम्प कोण? दाल में कुछ तो काला है : राहुल गांधी
2
आजचे राशीभविष्य २४ जुलै २०२५: धनलाभ होऊन प्राप्तीत वाढ होईल, विचारात एकदम बदल होतील
3
शिक्षिकेसोबत मुलाचे शारीरिक संबंध आहेत हे आई-वडिलांना माहिती होतं; लेडी टीचरला मिळाला जामीन
4
बनावट दूतावास उघडले, ४ खोटे देशही बनविले; गाझियाबादमध्ये कारवाई; ४४ लाख रुपये, शिक्के जप्त
5
पाच वर्षांनंतर भारताचा मोठा निर्णय; चिनी पर्यटकांना पुन्हा व्हिसा, चीनकडूनही स्वागत
6
‘ग्रीन इंडिया’मध्ये महाराष्ट्राला सहा वर्षांपासून निधीच नाही; देशभरात एकूण ७४५ कोटी रुपये निधी उपलब्ध
7
कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारीनंतर दोन महिने अटक करता येणार नाही; कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी कोर्टाचा उपाय
8
मृत्यूच्या दारातून प्रेमाच्या बंधनात! ज्यानं प्राण वाचवले, त्याच ड्रायव्हरशी केलं लग्न
9
पाकिस्तान दहशतवादात बुडालेला कट्टरपंथी देश; भारताने सुरक्षा परिषदेच्या बैठकीत सुनावले खडे बोल
10
६० टक्के महामंडळांचे वाटप ठरले, ‘मलईदार’ मंडळांबाबत रस्सीखेंच
11
संपादकीय : विरोधकांशी बोलणार कोण? विरोधकांच्या प्रश्नांवर सरकारची चुप्पी आणि संसदीय कोंडी
12
जशी नोटाबंदी, टाळेबंदी.. तशीच नवी ‘व्होटबंदी’! निवडणूक आयोगाच्या नव्या मतदार यादी मोहिमेचे विच्छेदन
13
खासगी विनाअनुदानित वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आता १०% ईडब्लूएस कोटा; ‘एमबीबीएस’च्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर
14
उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक घेण्यासाठी पूर्वतयारी सुरू; निवडणूक आयोग लवकरच जाहीर करणार वेळापत्रक
15
चीन अन् पाकिस्तानमुळे शेतकरी संकटात;  कांद्याची आखातातील निर्यात ४०% घसरली
16
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...
17
डिजिटल अरेस्ट करणाऱ्या गँगवर मोठी कारवाई, कंबोडियामध्ये १०५ भारतीयांसह ३०७५ अटकेत
18
पूजा खेडकर यांना धक्का! नॉन क्रिमीलेयर रद्द, ओबीसी प्रमाणपत्र मात्र कायम राहणार
19
'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट
20
उड्डाण करत असतानाच विमानाच्या इंजिनाला आग, पायलटने दिला मेडे कॉल, अहमदाबादमध्ये मोठा अपघात टळला  

नंदुरबारातील 721 शेतक-यांनाच पीक विमा मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 12:36 IST

17 हजार शेतकरी वा:यावर : बोंडअळीचे नुकसानही नाकारले

नंदुरबार : गेल्या खरीप हंगामात 18 हजार शेतक:यांनी पीक विमा करून घेतला होता़ यातील बहुतांश शेतक:यांना बोंडअळीचा सामना करावा लागल्याने त्यांना विमा परतावा मिळण्याची अपेक्षा होती़ परंतु विमा कंपन्यांनी ही अपेक्षा धुळीस मिळवली असून 18 हजारपैकी केवळ 721 शेतक:यांना पीक विमा मंजूर झाला आह़े एकीकडे शासनाकडून शेतकरी हितासाठी उत्पादनाला दीडपट हमीभाव देण्याचे जाहीर होत असताना जिल्ह्यातील शेतक:यांना विमा परतावा न दिला गेल्याने शेतकरी अवाक् झाले आहेत़ बोंडअळीसह अल्पपजर्न्यामुळे पिकांचे सातत्याने नुकसान झाल्याचे सव्रेक्षण समोर येऊनही विमा कंपन्यांनी शेतक:यांना विमा परतावा देण्यात कंजुषी केल्याचे दिसून आले आह़े शेतक:यांना कर्ज वितरण करत असतानाच विम्याच्या नावाखाली रक्कम कपात करून बँका शेतक:यांना लुबाडत असल्याचे शेतक:यांचे म्हणणे आह़े नैसर्गिक आपत्तीत नुकसान होऊनही विमा परतावा न मिळाल्याचा परिणाम यंदाच्या पीक विम्यावर होत असून शेतकरी विमा नसलेल्या पिकांच्या नावाने कर्ज उचलून विमा रक्कम कपातीच्या धोरणातून स्वत:ची सुटका करून घेत आहेत़ शासनाकडून आलेले बोंडअळी नुकसानीचे पैसे वेळेवर मिळत नसल्याने विमा परतावा मिळेल या प्रतीक्षेत असलेल्या शेतक:यांच्या अपेक्षा धुळीस मिळाल्याने नाराजी व्यक्त होत आह़े विमा कंपन्यांकडून कमीत कमी शेतक:यांना दिलेल्या पीक विमा परताव्याचा परिणाम आता दिसून येत आह़े पीक विमा करून कोणत्याही प्रकारचा लाभ होत नसल्याचे गृहीत धरून शेतकरी विमा नसलेल्या पिकांच्या नावाने कर्ज घेत आह़े हे कर्ज घेण्यामागे शासन आणि बँका यांचे अडेलतट्ट धोरणही कारणीभूत आह़े ज्वारी, बाजरी, कडधान्य, सोयाबीन, तेलबिया पिके यांना कर्जाच्या 2 टक्के पीक विमा, तर कापसासाठी कर्ज घेतल्यावर कर्जातून पाच टक्के रक्कम कापली जात़े यातून गरजा पूर्ण होत नसल्याने शेतक:यांनी हा मार्ग पत्करला आह़े जिल्ह्यात बोंडअळीग्रस्त 85 हजार शेतकरी पीक विम्यासाठी पात्र ठरत होत़े परंतु विमा कंपनीकडून कापूस उत्पादकांना एक रुपयाही देण्यात आलेला नाही़ बोंडअळी हे नैसर्गिक आपत्तीत मोडत असल्याने शेतक:यांना त्यानुसार हेक्टरी सात हजार किंवा उत्पादन खर्चाच्या कमीत कमी 30, तर जास्तीत जास्त 60  टक्के भरपाई देणे अपेक्षित होत़े परंतु एकाही शेतक:याचा यात समावेश करण्यात आला नाही़ कृषी विभागाने बोंडअळीवर उपाययोजना करणे शक्य असल्याने विमा कंपन्यांनी कारवाई केली नसावी असे उत्तर देत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला आह़े गेल्या खरीप हंगामात जिल्ह्यातील 18 हजार 230 शेतक:यांना पीक विम्यात समाविष्ट करण्यात आले होत़े यातून 2 कोटी 78 लाख 97 हजार 326 रुपयांची रक्कम बँकांमध्ये जमा झाली होती़ शेतक:यांच्या पीक कर्जातून ही रक्कम कपात करण्यात आली होती़ यानंतर विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींनी शेतशिवारात जाऊन पिकांचे सव्रेक्षण करून सात वर्षाच्या सरासरीनुसार आलेले उत्पादन आणि नुकसान यांची माहिती गोळा केली होती़ यातून ब:याच शेतक:यांची पिके ही नुकसानग्रस्त झाल्याचे समोर आले होत़े एकूण 18 हजार 230 शेतक:यांच्या पिकांचे सव्रेक्षण पूर्ण झाल्यानंतर संबंधित विमा कंपन्यांनी केवळ 721 शेतक:यांना पात्र ठरवत त्यांना 16 लाख 62 हजार रुपयांचा परतावा दिला आह़े यात एकही कापूस उत्पादक शेतकरी नाही़ विमा कंपन्यांनी उडीद, भुईमूग या उत्पादनांना विमा रक्कम दिली आह़े यात विमा रक्कम मिळालेले सर्व 721 शेतकरी शहादा, अक्कलकुवा, नवापूर, धडगाव आणि तळोदा तालुक्यातील असल्याची माहिती आह़े  रब्बी हंगामात 347 शेतक:यांनी आठ लाख 64 हजार रुपयांचा पीक विमा केला होता़ यात काही शेतक:यांना नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला होता़ या शेतक:यांची परताव्याची प्रतीक्षा कायम आह़े