शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारात केवळ 50 शेतक:यांनीच केला पीक विमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 13:07 IST

नंदुरबार : पीक विम्याचे संरक्षण देऊन शेतक:यांना दिलासा देण्याचा जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाचा प्रयत्न फसला आह़े पीक विमा करून घेण्यासाठी शेतक:यांची जागृती मोहीम राबवूनही जिल्ह्यात केवळ 50 शेतक:यांनी पीक विमा करवून घेतला आह़े हे शेतकरी बिगर कजर्दार असून त्यांच्यावर कोणत्याही बँकेचे कर्ज नाही़ कृषी विभागाने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार 18 ...

नंदुरबार : पीक विम्याचे संरक्षण देऊन शेतक:यांना दिलासा देण्याचा जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाचा प्रयत्न फसला आह़े पीक विमा करून घेण्यासाठी शेतक:यांची जागृती मोहीम राबवूनही जिल्ह्यात केवळ 50 शेतक:यांनी पीक विमा करवून घेतला आह़े हे शेतकरी बिगर कजर्दार असून त्यांच्यावर कोणत्याही बँकेचे कर्ज नाही़ कृषी विभागाने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार 18 हजार पैकी 721 शेतक:यांना पीक विमा मंजूर केला होता़ या मंजुरीमुळे बोंडअळीतून नुकसान झालेल्या शेतक:यांनी व्यक्त केलेली नाराजी यंदाच्या पीक विम्याच्या पथ्यावर पडली असून शेतकरी विमा करण्यास अनुत्सुक असल्याचे स्पष्ट होत आह़े यातून बँकांकडून कर्ज घेणा:या 11 हजार पैकी केवळ 742 कजर्दार शेतक:यांनीच  पीक विमा करण्यास सहमती दर्शवल्याचे आकडेवारीवरून समारे आले आह़े पीक विमा करणा:या शेतक:यांच्या संख्येत वाढ व्हावी म्हणून गेल्या दोन आठवडय़ांपूर्वी कृषी विभाग आणि जिल्हा प्रशासन यांनी संयुक्तपणे बिगर कजर्दार शेतक:यांना कॉमन सव्र्हिस सेंटर आणि आपले सरकार केंद्रातून पीक विमा करता यावा म्हणून केंद्रचालकांचे प्रशिक्षण घेतले होत़े यात 145 महाऑनलाईन आणि 150 कॉमन सव्र्हिस सेंटरचे संचालक उपस्थित होत़े यातून पीक विम्याची व्याप्ती वाढेल असे वाटत असतानाच दोन आठवडय़ात केवळ 50 शेतक:यांनी पीक विमा करवून घेतला आह़े एकीकडे ही स्थिती असताना दुसरीकडे जिल्हा बँक आणि 10 राष्ट्रीयकृत बँकांच्या शांखांमधून पीक कर्ज घेणा:या 11 हजार 571 शेतक:यांपैकी केवळ 742 शेतक:यांनी पीक विमा करून घेतला आह़े बँकांकडून विम्यापोटी 2 ते 5 टक्के रक्कम वसूल होऊ नये यासाठी शेतकरी विमा नसलेल्या पिकांचा बोजा चढवून घेत बँकांकडून कर्ज घेत आहेत़ जिल्हा बँकेने आजअखेरीस जिल्ह्यात 58 टक्के वाटप केले आह़े तर स्टेट बँकेसह 9 राष्ट्रीय बँकांच्या शाखांमधून केवळ 17 टक्के पीक कर्जाचे वाटप झाले असल्याने विम्याची आकडेवारीही खाली आली आह़े 10 जुलै अखेर्पयत जिल्ह्यातील बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, देना बँक, आयडीबीआय, पंजाब नॅशनल बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि युनियन बॅँक यांच्याकडून 55 हजार 600 शेतक:यांना पीक कर्ज वाटप करून त्यांच्याकडून विमा करून घेण्याचे टार्गेट देण्यात आले होत़े या बँकांनी 10 जुलैर्पयत केवळ 4 हजार 255 शेतक:यांना 72 कोटी 27 लाख रुपयांचे कर्ज वाटप केले आह़े जिल्ह्यात सर्वाधिक 14 हजार 950 शेतकरी सभासद संख्या असलेल्या स्टेट बॅंक ऑफ इंडियाने 721 शेतक:यांना 13 कोटी 29 लाख तर त्या खालोखाल सेंट्रल बँकेने त्यांच्या 11 हजार 744 शेतकरी सभासदांपैकी 704 शेतक:यांना 12 कोटी 50 लाख रुपयांचे कर्ज वाटप केले आह़े  बँक ऑफ महाराष्ट्राने 508, बँक ऑफ बडोदा 644, बँक ऑफ इंडिया 92, देना बँक 376 आणि युनियन बँकेने 540 शेतक:यांनाच कजर्वाटप केल्याचे समोर आले आह़े जिल्ह्यातील उर्वरित बँकांची आकडेवारीही याच प्रकारे आह़े राष्ट्रीयकृत बँका कागदपत्रांची  कागदपत्र आणि कजर्माफीचा बोजा चढवण्याची सक्ती करत असल्याचे शेतक:यांचे म्हणणे आह़े तसेच राष्ट्रीयकृत बँकांनी शेतक:यांना पीक कर्ज वाटप करताना मागील कर्जाचा भरणा आणि कजर्माफीचे निकष लावल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आह़े  येत्या 31 जुलैर्पयत बँकांकडून कर्ज घेणा:या शेतक:यांना पीक विमा करून घेता येणार असल्याचे कृषी विभागाने कळवले आह़े कृषी विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार भात पिकासाठी प्रति हेक्टर 27 हजार 500 रूपयांचे विमा संरक्षण आह़े यासाठी 550 रुपयांची रक्कम कर्जातून कपात होणार आह़े ज्वारी 24 हजार संरक्षण-कपात 480, बाजरी 20 हजार-कपात 400, भूईमूग 30 हजार-कपात 600, सोयाबीन 35 हजार-कपात 700, मूग आणि  उडीद 18 हजार 750-कपात 375, तूर 27 हजार 500 तर कपात 550, कापूस 35 हजार-कपात 1 हजार 750 तर मका पिकाला 26 हजार 200 रुपयांचे संरक्षण देण्यात आले असून 524 रुपयांची विमा रक्कम कर्जातून कापली जाणार असल्याचे सांगण्यात आले आह़े ही रक्कम बँकांकडून कपात करतेवेळी इतर 150 रूपयांर्पयत चाज्रेस लागत आहेत़