शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

तळोद्यात फक्त 215 शेतक:यांची नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 12:16 IST

कजर्माफी योजना : सक्षम यंत्रणेअभावी नोंदणीसाठी शेतक:यांची दमछाक

ठळक मुद्देशेतक:यांचे कुटुंबासह हेलपाटे येथील महसूल प्रशासनाने ऑनलाईन अर्ज नोंदणीसाठी ग्रामीण भागात स्थानिक ठिकाणी महाईसेवा केंद्राची सुविधा उपलब्ध करून दिली असली तरी पुरेशा नेटवर्कअभावी तेथील सेवा शेतक:यांना निरूपयोगी ठरत आहे. या केंद्रावर तास्न-तास रांगा लावूनही

वसंत मराठे। लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : सव्र्हरच्या पुरेशा क्षमतेअभावी शासनाच्या कजर्माफीसाठी संपूर्ण तळोदा तालुक्यातून महिनाभरात केवळ 215 अर्जाचीच नोंदणी झाल्याचे समोर आले आहे. या प्रणालीत सातत्याने अडथळे येत असल्यामुळे सुविधा केंद्राच्या संचालकांबरोबरच शेतक:यांची अक्षरश: दमछाक झाली आहे. ऑनलाईन प्रणालीच्या संथगतीमुळे शेतकरी मोठय़ा प्रमाणात वंचित राहण्याची शक्यता असल्याने जिल्हा प्रशासनाने सव्र्हरची कॅपसिटी अर्थात क्षमता वाढविण्याची अपेक्षा आहे. राज्यातील शेतक:यांच्या कजर्माफीसाठी छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना शासन राबवित आहे. या योजनेतून शासनाने शेतक:यांना कर्ज माफीचा निर्णय घेतला आहे. कजर्माफीसाठी शेतक:यांनी शासनाकडे ऑनलाईन अर्ज करण्याची अट शासनाची आहे. यासाठी शासनाने आपले सरकार ही पोर्टल सुरू केली आहे. या पोर्टलवरच तालुक्यातील शेतक:यांनी ऑनलाईन अर्ज करण्याची कार्यवाही गेल्या महिनाभरापासून सुरू आहे. या ऑनलाईन अर्ज नोंदणीसाठी येथील महसूल प्रशासनाने शहरात तीन व ग्रामीण भागात मोड, वाल्हेरी, राजविहीर, बोरद, लोभाणी, तळवे, त:हावद, खुषगव्हाण, रांझणी, चिनोदा, खरवड, अशा 14 ठिकाणी महा ई सेवा केंद्र सुरू केली आहेत. तथापि सव्र्हरच्या पुरेशा क्षमतेअभावी कनेक्टीव्हीटी मिळत नसल्याने या कामात सातत्याने खोळंबा येत               आहे. साधारण 35 ते 40 दिवसांपासून शेतक:याने ऑनलाईन नोंदणीची प्रक्रिया सुरू असली तरी आतापावेतो 215 जणांची ऑनलाईन नोंदणी झाल्याची माहिती येथील  उपनिबंधक कार्यालयाकडून प्राप्त झाली आहे. वास्तविक संपूर्ण तालुक्यात साडेसहा हजार शेतकरी सातबाराधारक आहेत.  त्यातील साडेचार हजार शेतकरी शासनाच्या कजर्मुक्तीसाठी पात्र ठरल्याचे सांगितले जाते. शेतक:यांचा ऑनलाईन अर्ज करताना संबंधित शेतकरी व त्याच्या कुटुंबाचा थंम घेतला जातो. थम घेतल्यानंतर त्याचे आधार व रेशनकार्ड लिकींग केले जाते. खातेक्रमांकाशी आधार लिंकींग करताना एका शेतक:यास कमीत कमी 40 ते 45 मिनटे लागतात. त्यातही अधून-मधून नेट कनेक्टीव्हीटी गायब होत असते. साहजिकच दिवसभरातून आठ ते दहा शेतक:यांचेही अर्ज नोंदणी केली जात नाही. यामुळे अक्षरश: वैतागल्याची भावना शेतक:यांबरोबरच सेवा केंद्रांच्यासंचालकांनी केली आहे. कजर्मुक्तीसाठी शासनाने ऑनलाईन अर्जातून पारदर्शकतेचा दावा केला असला तरी त्यात सातत्याने             खोळंबा येत असल्याने शेतक:यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या वेळखाऊ धोरणामुळे मोठय़ा प्रमाणात शेतकरी कजर्मुक्तीसाठी वंचित राहण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.सव्र्हरवरची क्षमता वाढविण्यासाठी शेतक:यांनी प्रशासनाकडे सातत्याने तक्रारी करूनही या गंभीर प्रकाराकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नसल्याचा शेतक:यांचा आरोप आहे. निदान जिल्हा प्रशासनाने तरी या प्रकरणी वरिष्ठांकडे ठोस कार्यवाही करावी, अशी शेतक:यांची मागणी आहे. अन्यथा याविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही शेतक:यांनी दिला आहे