शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विज्ञान केंद्रात जागतिक जलदिनानिमित्त ऑनलाईन चर्चासत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:28 IST

चर्चासत्रप्रसंगी कार्यकारी संचालक जलसाक्षरता केंद्र डॉ. सुमंत पांडे यांनी पंचमहाभूतांपैकी एक असलेल्या पाण्याचे किती महत्त्व आहे, पाण्याचं दुर्भिक्ष लक्षात ...

चर्चासत्रप्रसंगी कार्यकारी संचालक जलसाक्षरता केंद्र डॉ. सुमंत पांडे यांनी पंचमहाभूतांपैकी एक असलेल्या पाण्याचे किती महत्त्व आहे, पाण्याचं दुर्भिक्ष लक्षात घेता आपण सर्वांनी जागरूक राहून पाण्याविषयी आपल्या घरी, गावात, परिसरात, पाण्याच्या संवर्धनासाठी कार्यरत असले पाहिजे असा आग्रह धरला. जलसाक्षरता केंद्र संचालक आनंद पुसावळे यांनी आपल्या मार्गदर्शनात जलसाक्षरतेचे महत्त्व सांगून समाजाच्या विविध स्तरातील लोकांपर्यंत जलसाक्षरता पोहोचविण्याची गरज प्रतिपादित केली, प्रत्येक गावाने आपल्या गावाचा पाण्याचा ताळेबंद ठेवला पाहिजे, असेही मत त्यांनी व्यक्त केले.

कृषी अभियांत्रिकी राहुरी विभागप्रमुख विभाग, डॉ. एस. डी. गोरंटीवार आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की, पाण्याचा कार्यक्षम वापर कशा पद्धतीने करता येईल याची जाणीव वापरकर्त्यामध्ये रुजविणे गरजेचे आहे. विभागीय विस्तार धुळे केंद्रप्रमुख डॉ. मुरलीधर महाजन यांनी आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की, वाढत्या लोकसंख्येची वाढती अन्नाची गरज लक्षात घेता शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पाण्याचा कार्यक्षम वापर करणे आवश्यक असल्याचे म्हणाले.

चर्चासत्र समारोप प्रसंगी १६ ते २३ मार्च दरम्यान जलसाक्षरता तालुका धडगाव समितीतर्फे जलसाक्षरता सप्ताह आयोजित करण्यात आले होते. या जलसाक्षरता सप्ताहातील विविध वैशिष्टपूर्ण उपक्रमांची माहिती देताना प्राचार्य डॉ. एच. एम. पाटील यांनी सातपुड्यातील जलदूतांनी केलेल्या कार्याचे कौतुक केले. आगामी काळात जलसाक्षरता ही एक मोहीम म्हणून राबविण्याचे आवाहन उपस्थितांना केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विषय विशेषज्ञ जयंत उत्तरवार यांनी केले. या ऑनलाईन चर्चासत्रामध्ये शेतकरी, पाटबंधारे विभागातील जलकर्मी, तसेच मुक्त कृषी शिक्षण केंद्रातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.