शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

कृषी विज्ञान केंद्रात जागतिक जलदिनानिमित्त ऑनलाईन चर्चासत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:28 IST

चर्चासत्रप्रसंगी कार्यकारी संचालक जलसाक्षरता केंद्र डॉ. सुमंत पांडे यांनी पंचमहाभूतांपैकी एक असलेल्या पाण्याचे किती महत्त्व आहे, पाण्याचं दुर्भिक्ष लक्षात ...

चर्चासत्रप्रसंगी कार्यकारी संचालक जलसाक्षरता केंद्र डॉ. सुमंत पांडे यांनी पंचमहाभूतांपैकी एक असलेल्या पाण्याचे किती महत्त्व आहे, पाण्याचं दुर्भिक्ष लक्षात घेता आपण सर्वांनी जागरूक राहून पाण्याविषयी आपल्या घरी, गावात, परिसरात, पाण्याच्या संवर्धनासाठी कार्यरत असले पाहिजे असा आग्रह धरला. जलसाक्षरता केंद्र संचालक आनंद पुसावळे यांनी आपल्या मार्गदर्शनात जलसाक्षरतेचे महत्त्व सांगून समाजाच्या विविध स्तरातील लोकांपर्यंत जलसाक्षरता पोहोचविण्याची गरज प्रतिपादित केली, प्रत्येक गावाने आपल्या गावाचा पाण्याचा ताळेबंद ठेवला पाहिजे, असेही मत त्यांनी व्यक्त केले.

कृषी अभियांत्रिकी राहुरी विभागप्रमुख विभाग, डॉ. एस. डी. गोरंटीवार आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की, पाण्याचा कार्यक्षम वापर कशा पद्धतीने करता येईल याची जाणीव वापरकर्त्यामध्ये रुजविणे गरजेचे आहे. विभागीय विस्तार धुळे केंद्रप्रमुख डॉ. मुरलीधर महाजन यांनी आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की, वाढत्या लोकसंख्येची वाढती अन्नाची गरज लक्षात घेता शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पाण्याचा कार्यक्षम वापर करणे आवश्यक असल्याचे म्हणाले.

चर्चासत्र समारोप प्रसंगी १६ ते २३ मार्च दरम्यान जलसाक्षरता तालुका धडगाव समितीतर्फे जलसाक्षरता सप्ताह आयोजित करण्यात आले होते. या जलसाक्षरता सप्ताहातील विविध वैशिष्टपूर्ण उपक्रमांची माहिती देताना प्राचार्य डॉ. एच. एम. पाटील यांनी सातपुड्यातील जलदूतांनी केलेल्या कार्याचे कौतुक केले. आगामी काळात जलसाक्षरता ही एक मोहीम म्हणून राबविण्याचे आवाहन उपस्थितांना केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विषय विशेषज्ञ जयंत उत्तरवार यांनी केले. या ऑनलाईन चर्चासत्रामध्ये शेतकरी, पाटबंधारे विभागातील जलकर्मी, तसेच मुक्त कृषी शिक्षण केंद्रातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.