चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन.डी.चौधरी होते. प्रमुख अतिथी म्हणून नंदुरबार तालुका विधायक समितीचं वरीष्ठ महाविलयीन समन्वयक प्रा.डॉ.एम.एस.रघुवंशी हो. चर्चासत्रात प्राचार्य प्रा डॉ.एन.डी.चौधरी व प्रा.डॉ.एम.एस.रघुवंशी यांनी काेरोना महामारीमुळे शैक्षणिक क्षेत्रात नवनवीन प्रयोग करण्याच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात बदल होऊन हे बदल भविष्यात मोठे परिणाम करणारे असून हे बदल हे विशेषतः विज्ञान क्षेत्रात शिक्षण घेणान्या विद्यार्थ्यांवर मोठ्या प्रमाणात परिणाम करणारे असल्याचे मत व्यक्त केले . चर्चासत्रात आचल रघुवंशी , शमीम पठाण , हर्षल पाटील , प्रीतम निकम , रूपाली कोळी , नरेंद्र हिरणवाला, विनीत बडगुजर, किर्तेश जगताप, कांचन पाटील, दीपक अहिरे, काजल अग्रवाल, देवयानी शेवाळे , अंतिमा राजभर या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांनी कोरोना महामारीमुळे सकारात्मक व नकारात्मक बदल व त्याचा भविष्यात वकिली व्यवसायावर होणारा परिणाम यावर त्यांचे मत मांडले. चर्चासत्राचे संयोजन प्रा.डॉ.आशा तिवारी यांनी केले. संस्थेचे अध्यक्ष मनोज रघुवंशी, उपाध्यक्ष ॲड.राजेंद्र रघुवंशी यांच्या मार्गदर्शनात हा उपक्रम पार पडला. ललीत सूर्यवंशी यांनी आभार मानले .
विधी महाविद्यालयात ऑनलाईन चर्चासत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:23 IST