नंदुरबार : ऑनलाईन दंडाची पावती दिली जात असल्याने अनेकजण दंडाची रक्कम भरण्यास उशीर करीत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, यावर्षी अर्थात जानेवारी ते जूनदरम्यान तब्बल १५ हजारजणांनी जिल्ह्यात वाहतुकीचे नियम मोडले असून, त्यांच्याकडून तब्बल सात लाख ४८ हजार रुपये दंड आकारण्यात आला आहे. त्यातील ४० टक्के दंडाची रक्कम संबधितांकडे बाकी असल्याचे समजते.
नियम तोडल्याने अनेकांना अपघाताला सामोरे जावे लागते. यासाठी वाहतूक पोलीस वाहनधारकांना नियम समजावून सांगून, प्रसंगी दंड आकारूनदेखील त्याचा उपयोग होत नसल्याचे चित्र आहे. सध्या दंडाच्या पावतीसह ऑनलाईन दंडाची पावतीदेखील दिली जात असते. ऑनलाईन पावतीमुळे अनेकजण दंडाची रक्कम भरण्यास उशीर करीत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे वाहन जप्तीची कारवाईदेखील केली जात आहे.