शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
6
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
7
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
8
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
9
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
10
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
11
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
12
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
13
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
14
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
15
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
16
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
17
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
18
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
19
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
20
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार

‘ऑनलाइन उच्च शिक्षण-पर्याप्त पर्याय नसून पूरक प्रणाली मानली जावी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:21 IST

साधारणत: इयत्ता १२ वी उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थी-विद्यार्थिनी उच्च शिक्षणाच्या प्रवाहात सामील होतात. उच्च शिक्षणाची व्याप्ती प्रचंड आहे. त्याच्या सीमा ...

साधारणत: इयत्ता १२ वी उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थी-विद्यार्थिनी उच्च शिक्षणाच्या प्रवाहात सामील होतात. उच्च शिक्षणाची व्याप्ती प्रचंड आहे. त्याच्या सीमा विश्वव्यापी आहेत. आपल्या देशात मुख्यत्वेकरून समाजविज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, वैद्यकीय, अभियांत्रिकी, औषधी निर्माण, कला-ललितकला, अशा विविधतापूर्ण शिक्षण- प्रशिक्षण आणि मार्गदर्शन देणाऱ्या शासकीय, निमशासकीय किंवा स्वायत्त संस्था आहेत.

उच्च शिक्षण घेणारे आणि घेऊ पाहणारे याना सद्य:स्थितीत ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय उपलब्ध झालेला आहे. परंतु ऑनलाइन उच्च शिक्षणाचे काही अल्पकालीन फायदे जरी वाटत असले तरीही प्रणाली दोषरहीत समजली जाते.

१) मन एकाग्र होत नाही - आभासी शिक्षण प्रणालीही पूर्णत: संगणक, मोबाइल किंवा दूरदर्शन स्क्रीनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत असते. वास्तव्यासाठी प्रत्येकाला घर महत्त्वाचे आहे. घराची कधीही शाळा, महाविद्यालय होऊ शकत नाही. कारण कोणताही शैक्षणिक परिसर हा नैसर्गिक वातावरण डोळ्यासमोर ठेवून मानवाच्या कल्पकतेमधून निर्माण होत असतो. असा परिसर सदैव शाश्वत, बोलका आणि मनाला उभारी देणारा ठरलेला आहे आणि ठरत राहील.

प्रशस्तवर्ग खोल्या, ग्रंथालये, प्रयोगशाळा, जिमखाना, क्रीडांगणे, उद्याने, उपहारगृहे, विद्यार्थी-शिक्षक संवाद, मित्र-मैत्रिणींचा परिचय, आपलेपणाची भावना, समायोजन इ.जीवन मूल्यांशी संबंधित अनुभव पारंपरिक आणि सजीव प्रणालीजन्य शिक्षणातूनच शक्य आहे. ऑनलाइन शिक्षण प्रणाली विद्यार्थ्यांचे मन एकाग्र करण्यामध्ये अपुरी पडत आहे. कारण ऑनलाइन शिक्षणाचे धडे विद्यार्थ्यांना घरी राहूनच घ्यावे लागत आहेत. विद्यार्थ्यांची जडण-घडण ही साधारणपणे तीन संस्कारपीठांमधून होते. पहिले संस्कारपीठ कुटुंब, दुसरे संस्कारपीठ शाळा आणि तिसरे संस्कारपीठ समाज असतो. घराची कधीच शाळा / महाविद्यालय होऊ शकत नाही. कारण घरात एकाच वेळी अनेक पिढ्यांचे प्रतिनिधित्व करणारे सदस्य राहतात.

पारंपरिक शिक्षण प्रणालीमध्ये समवयस्क, समविचारी, भविष्याला कलाटणी देणारे, सांस्कृतिक देवाण-घेवाण करणारे, विविध प्रकारची कौटुंबिक पार्श्वभूमी असणारे अनेक मित्र, मैत्रिणी आणि परिचयातील समूह एकत्र येतो. जवळपास सर्वांच्या गरजा, ध्येय, वाटचाल आणि मानसिकता समान असते. त्यामुळे विद्यार्थ्यांना वास्तवाचे भान आणि समाजमन सहज ओळखता येते. त्यांच्यातील नैराश्य, वैफल्यता, नकारात्मकता आणि अस्थिर मनाची घालमेल मित्र, मैत्रिणी, शिक्षक किंवा विश्वासू सहकाऱ्यांकडे व्यक्त करून अशा अंतर्मनातील समस्यांवर हमखास उपाय सापडतो. त्यामुळे विद्यार्थ्यांचा एकाकीपणा दूर हाेऊन मन एकाग्र होऊन ते नियंत्रणात राहू शकेल.

२) नैसर्गिक हालचालींवर निर्बंध :- ऑनलाइन उच्च शिक्षण हे १०० टक्के तंत्रज्ञानाशी आणि उपकरणांशी निगडित आहे, अशी उपकरणे मुळातच स्मार्ट समजली जातात. परंतु त्यांना हाताळणारे सर्वच कुशल आणि स्मार्ट असतीलच असे नाही. या प्रणालीचा अनिवार्य आणि अनिर्बंध वापरामुळे विद्यार्थ्यांच्या शारीरिक, बौद्धीक, मानसिक वाढीवर आणि हालचालींवर अनेक निर्बंध येत असल्याचे निदर्शनास येत आहे. काही सर्वेक्षणातील निष्कर्षांवरून सांगितले जाते की, आभासी शिक्षण प्रणालीमध्ये दृष्य / श्राव्य माध्यमांमुळे विद्यार्थ्यांच्या स्वभावामध्ये ताठरपणा येऊन ते एकांतात राहणे फायद्याचे समजू लागले आहेत. त्यांच्या नैसर्गिक आणि जीवनाेपयोगी हालचाली जशा की, पायी फिरे, सायकल चालविणे, मैदानी खेळ खेळणे, प्रवास करणे, मित्र-मैत्रिणींकडे जाणे, ग्रंथालयात जाणे आदी हालचाली कुंठित होऊन त्यांच्या कार्यक्षमतेवर विपरित परिणाम होण्याचा धोका संभवू शकतो.

शरीराला आणि मनाला चालना देणाऱ्या हालचालींवर अनेक निर्बंध आल्यामुळे विद्यार्थी-विद्यार्थीनींमध्ये स्नायूंची ताठरता, स्थूलपणा, दृष्टिदोष, श्रवण दोष, शिघ्रकोपी स्वभाव, निद्रानाश, ऑनलाइन खरेदी, ऑनलाइन जुगार, प्रतिबंधित दृष्यांसारखे कार्यक्रम बघणे, सायबर गुन्हेगारीकडे वळणे इ.अपप्रवृत्ती काही ठिकाणी अनुभवास येत आहेत.

ऑनलाइन उच्च शिक्षण प्रणालीमध्ये अध्ययन आणि अध्यापन या दोन बाबी महत्त्वाच्या आहेत. म्हणजेच विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यात आभासी संवाद होतो. विद्यार्थी आणि शिक्षक त्यांच्यात पिढीचे अंतर असते. बहुसंख्य शिक्षक १९९० आणि २००० च्या दशकापूर्वीचे गुणवत्ता आणि पात्रताधारक आहेत. ज्ञानप्रधान व्यवस्थेत त्यांची निर्मिती झालेली आहे. विद्यमान तंत्रज्ञानाबाबत आणि ऑनलाइन शिक्षणाबाबत बहुसंख्य शिक्षकांना अनिश्चितते सोबतच उत्सुकता होती. जरी विविध कार्यशाळा, प्रशिक्षणवर्ग, अभ्यास मंडळाचे मार्गदर्शन, डिजिटल माहितीचे स्त्रोत इत्यादीच्या माध्यमातून ऑनलाइन अध्यापन प्रणाली वापरास प्रारंभ झालेला असला तरी बहुसंख्य शिक्षकांना, संशोधकांना आपल्या अनुभवाचा, कौशल्याचा, सुप्त विचार शक्तीचा, संकलित ज्ञानाचा शिस्तीचा आणि शिष्टाचाराचा प्रभावीपणे ठसा उमटविता आला नाही.

कारण भावनिकता आणि संवेदनशीलता हे दोन संस्कार मानवासाठी वरदान ठरले आहेत. समस्त शिक्षकांमध्ये अनेक मूल्यांचा ठेवा असतो. शिक्षकांमधील विद्यार्थ्यांप्रती भावनिकता आणि संवेदनशीलता हे संस्कार अंतर्मन एकरूप हाेण्यासाठी मोलाचे ठरले आहेत. आणि ठरणार आहेत. परंतु ऑनलाइन प्रणालीमध्ये ह्या प्रकारचे संस्कार आभासी ठरत आहेत. कारण असे संस्कार आणि मूल्य कधीही फॉरवर्ड करता येत नाहीत.

समारोप :- ऑनलाइन उच्च शिक्षणासाठी सद्य:स्थितीतला पर्याय हा कायमस्वरूपी कदापि पर्याप्त ठरणारा नाही. कारण आपली जडण घडण या तंत्रज्ञानाधिष्ठीत प्रणालीतून अजिबात झालेली नाही आणि होणारदेखील नाही. जर शिक्षणाची उपयुक्तता आणि गुणवत्ता अधिक सुदृढ करावयाची असेल, स्वावलंबन, रोजगाराभिमुखता आणि स्वयंपूर्णता हे व्रत आपल्याला स्वीकारायचे असेल तर ऑनलाइन उच्च शिक्षण प्रणालीचा कार्यक्षमपणे पूरक यंत्रणामधून आपण वापर करू शकतो.

कारण आज ऑनलाइन कामकाजामुळे बँकिंग, खरेदी-विक्री व्यवहार, व्यापार, शेअर बाजार आदी व्यवहार सुकर झालेले आहेत आणि त्यांच्यात पारदर्शीपणादेखील येऊ लागला आहे. म्हणूनच पारंपरिक शिक्षणप्रणाली अबाधित ठेवण्यासाठी आणि अधिक बळकट व रचनात्मक करण्यासाठी ऑनलाइन शिक्षण प्रणालीचा पर्याप्त पर्याय म्हणून नव्हे तर शत-प्रतिशत पूरक म्हणून तिचा स्वीकार व्हावा एवढीच अपेक्षा आहे.

- प्राचार्य, डॉ.डी.एस. पाटील, महिला महाविद्यालय, नंदुरबार