शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
2
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
3
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
4
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
5
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
6
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
7
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
8
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
9
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
10
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
11
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
12
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
13
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
14
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
15
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
16
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
17
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
18
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
19
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
20
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   

कृषी विज्ञान केंद्रात ऑनलाईन कापूस पीक परिषद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:23 IST

यावेळी नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे महाव्यवस्थापक डाॅ. वाय.जी.प्रसाद यांनी मार्गदर्शन केले. डाॅ. प्रसाद यांनी चांगल्या ...

यावेळी नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे महाव्यवस्थापक डाॅ. वाय.जी.प्रसाद यांनी मार्गदर्शन केले. डाॅ. प्रसाद यांनी चांगल्या कापूस उत्पादनासाठी गुलाबी बोंडअळी आणि बोंडसड रोगाचे व्यवस्थापन करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन करुन विविध विषयांवर संवाद साधला. परिसंवादात कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ राजेंद्र दहातोंडे, यांनी जिल्ह्यातील या प्रमुख पिकात अद्यावत तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यासाठी या परिषदेतील मार्गदर्शनाचा उपयोग करून घेण्याचे आवाहन केले.

राहुरी कृषी विद्यापीठाच्या विभागीय विस्तार केंद्राचे प्रमुख डॉ.मुरलीधर महाजन यांनी संतुलित खतांचा वापर व. एकरी झाडांची संख्या महत्त्वाची असल्याचे सांगितले. कृषी विद्यापीठाने विकसित केलेले वाण,लागवडीचे अंतर, फर्टीगेशन तंत्रज्ञान,सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरतेची कापूस पिकात दिसणारी लक्षणे व त्यावरील उपाय याबाबतही डाॅ. महाजन यांनी मार्गदर्शन केले.

परिसंवादात भारतीय किसान संघाचे राज्य संघटन मंत्री दादा लाड यांनी कापूस पिकात दोन प्रकारच्या फांद्या असून त्याचे नियमन करण्याचे आवाहन केले. गळ फांद्या ज्या अनावश्यक असतात व फळ ,फांद्या ज्याद्वारे चांगले उत्पादन मिळते त्या ओळखून झाडावर कशा ठेवाव्या याबद्दल मार्गदर्शन केले. परिसंवादात केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे कीटक शास्त्रज्ञ डॉ. चिन्ना बाबू नायक यांनी गुलाबी बोंडअळी व्यवस्थापनामध्ये कमी दिवसाच्या वाणांची लागवड, नियमित सर्वेक्षण, ट्रायकोकार्डचा वापर व कीटकनाशकांचा शिफारशीनुसार वापर करण्याचे आवाहन केले. कृषी विज्ञान केंद्राचे पीक संरक्षण तज्ञ पद्माकर कुंदे यांनी कपसातील प्रमुख रोग जीवनुजन्य करपा ,दहिया तसेच आकस्मिक मर व लाल्या या विकृतींचे व्यवस्थापन याबद्दल उपस्थितांना मार्गदर्शन केले. या ऑनलाईन कार्यक्रमाचे संचालन कृषी अभियंता .जयंत उत्तरवार, उमेश पाटील यांनी केले. परिसंवादात शेतकरी सहभागी झाले होते.