शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

चार रस्त्यांवर वन-वे चे बोर्ड, अंमलबजावणी मात्र कुठेच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:59 IST

नंदुरबार : शहरातील वन वे चा फज्जा उडालेला आहे. केवळ वाहतूक पोलिसांना जेव्हा वेळ मिळेल तेव्हा अशा ठिकाणी उभे ...

नंदुरबार : शहरातील वन वे चा फज्जा उडालेला आहे. केवळ वाहतूक पोलिसांना जेव्हा वेळ मिळेल तेव्हा अशा ठिकाणी उभे राहून त्याची अंमलबजावणीचा प्रयत्न केला जातो. शहरात चार रस्त्यांवर वन वे आहे. परंतु सद्य:स्थितीत एकाही ठिकाणी अंमलबजावणी होत नसल्याची स्थिती आहे.

नंदुरबारातील रस्ते आधीच अरुंद, त्यात अतिक्रमण कमालीचे वाढले आहे. वाहनांची संख्या देखील वाढल्याने रहदारीचा नेहमीच बोजवारा उडालेला आहे. अशा स्थितीत काही वर्षांपूर्वी नंदुरबारातील चार रस्त्यांवर वन वे करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु त्याची अंमलबजावणी तेव्हढ्यापुरतीच मर्यादित राहत आली आहे. अशीच स्थिती समविषम पार्किंगचीदेखील आहे.

शास्त्री मार्केट रस्ता

शास्त्री मार्केट रस्त्यावर पिंजारी विहीर ते मार्केट तसेच शाळा क्रमांक एक ते मार्केट शिवाय सरळ जुने कोर्ट असा एकेरी मार्ग निश्चित करण्यात आला होता. काही काळ या ठिकाणी अंमलबजावणी झाली. परंतु हा मध्यवर्ती भाग असल्याने येथे वन वे यशस्वी झाला नाही. त्यामुळे वाहतूक शाखेने त्याचा नाद सोडून दिल्याचे चित्र आहे.

जळका बाजार

n जळका बाजार ते सोनाट खुंट हा रस्ता देखील चार चाकी वाहनांसाठी वन वे आहे. त्यासाठीचे बोर्ड वाहतूक शाखेेने जळका बाजारात लावले देखील आहेत. परंतु या रस्त्यावर वाहतूक पोलिसांना जेंव्हा आठवण येते तेंव्हा तेथे उभे राहून केवळ दंड आकारणीसाठी अंमलबजावणी केली जाते.

साक्रीनाका

साक्रीनाका ते जळका बाजार व साक्री नाका ते धोशातकीया हा रस्ता देखील वन वे करण्यात आला होता. हे दोन्ही रस्ते अतिशय अरुंद आहेत. एकाच वेळी दोन चारचाकी वाहने निघणे म्हणजे मोठी कसरत असते. अशा वेळी या रस्त्यावर वन-वेची अंमलबजावणी होणे आवश्यक असताना त्याबाबत मात्र वाहतूक शाखेने तसेच पालिकेनेही दुर्लक्ष केले आहे.

सम-विषम पार्किंगदेखील बारगळली...

n जुनी पालिका चौक ते नेहरू चौक, तसेच पालिका चौक ते दीनदयाल चौक या दरम्यानच्या रस्त्यावर सम-विषम पार्किंग करण्याचा निर्णय वेळोवेळी घेण्यात आला आहे. नवीन अधिकारी आल्यावर त्याची तेवढ्यापुरती अंमलबजावणी केली जाते. नंतर पुन्हा ते बारगळते. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर दुकाने आहेत. शाळा, बँका, दवाखाने व इतर कार्यालये तसेच बाजाराचा परिसर असल्यामुळे वाहनधारक रस्त्याच्या दोन्ही बाजुला मोठ्या प्रमाणावर आपली वाहने लावत असतात. त्यामुळे रहदारीला अडथळा येत असतो. दोन महिन्यांपूर्वी सम-विषम पार्किंगची अंमलबजावणी सुरू झाली, परंतु आता पुन्हा ती बारगळली आहे.