शहरं
Join us  
Trending Stories
1
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
2
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
3
Crime News : पुन्हा निळ्या ड्रमचे प्रकरण आले, बायको घरमालकाच्या प्रेमात पडली; पतीला संपवले अन्...
4
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
5
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
6
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
7
सोहम बांदेकरचं 'ठरलं तर मग'! 'या' अभिनेत्रीसोबत बांधणार लग्नगाठ? होतोय अभिनंदनाचा वर्षाव
8
Asia Cup 2025 : गिलमुळे धोक्यात होतं तिलक वर्माचं स्थान; शेवटी BCCI निवडकर्त्यांनी असा काढला तोडगा
9
गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
10
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
11
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!
12
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
13
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
14
दहावीतील विद्यार्थ्याची नववीतील विद्यार्थ्याने केली हत्या, चाकूने सपासप वार केले आणि...  
15
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
16
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
17
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
18
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
19
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
20
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले

चार रस्त्यांवर वन-वे चे बोर्ड, अंमलबजावणी मात्र कुठेच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:59 IST

नंदुरबार : शहरातील वन वे चा फज्जा उडालेला आहे. केवळ वाहतूक पोलिसांना जेव्हा वेळ मिळेल तेव्हा अशा ठिकाणी उभे ...

नंदुरबार : शहरातील वन वे चा फज्जा उडालेला आहे. केवळ वाहतूक पोलिसांना जेव्हा वेळ मिळेल तेव्हा अशा ठिकाणी उभे राहून त्याची अंमलबजावणीचा प्रयत्न केला जातो. शहरात चार रस्त्यांवर वन वे आहे. परंतु सद्य:स्थितीत एकाही ठिकाणी अंमलबजावणी होत नसल्याची स्थिती आहे.

नंदुरबारातील रस्ते आधीच अरुंद, त्यात अतिक्रमण कमालीचे वाढले आहे. वाहनांची संख्या देखील वाढल्याने रहदारीचा नेहमीच बोजवारा उडालेला आहे. अशा स्थितीत काही वर्षांपूर्वी नंदुरबारातील चार रस्त्यांवर वन वे करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु त्याची अंमलबजावणी तेव्हढ्यापुरतीच मर्यादित राहत आली आहे. अशीच स्थिती समविषम पार्किंगचीदेखील आहे.

शास्त्री मार्केट रस्ता

शास्त्री मार्केट रस्त्यावर पिंजारी विहीर ते मार्केट तसेच शाळा क्रमांक एक ते मार्केट शिवाय सरळ जुने कोर्ट असा एकेरी मार्ग निश्चित करण्यात आला होता. काही काळ या ठिकाणी अंमलबजावणी झाली. परंतु हा मध्यवर्ती भाग असल्याने येथे वन वे यशस्वी झाला नाही. त्यामुळे वाहतूक शाखेने त्याचा नाद सोडून दिल्याचे चित्र आहे.

जळका बाजार

n जळका बाजार ते सोनाट खुंट हा रस्ता देखील चार चाकी वाहनांसाठी वन वे आहे. त्यासाठीचे बोर्ड वाहतूक शाखेेने जळका बाजारात लावले देखील आहेत. परंतु या रस्त्यावर वाहतूक पोलिसांना जेंव्हा आठवण येते तेंव्हा तेथे उभे राहून केवळ दंड आकारणीसाठी अंमलबजावणी केली जाते.

साक्रीनाका

साक्रीनाका ते जळका बाजार व साक्री नाका ते धोशातकीया हा रस्ता देखील वन वे करण्यात आला होता. हे दोन्ही रस्ते अतिशय अरुंद आहेत. एकाच वेळी दोन चारचाकी वाहने निघणे म्हणजे मोठी कसरत असते. अशा वेळी या रस्त्यावर वन-वेची अंमलबजावणी होणे आवश्यक असताना त्याबाबत मात्र वाहतूक शाखेने तसेच पालिकेनेही दुर्लक्ष केले आहे.

सम-विषम पार्किंगदेखील बारगळली...

n जुनी पालिका चौक ते नेहरू चौक, तसेच पालिका चौक ते दीनदयाल चौक या दरम्यानच्या रस्त्यावर सम-विषम पार्किंग करण्याचा निर्णय वेळोवेळी घेण्यात आला आहे. नवीन अधिकारी आल्यावर त्याची तेवढ्यापुरती अंमलबजावणी केली जाते. नंतर पुन्हा ते बारगळते. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर दुकाने आहेत. शाळा, बँका, दवाखाने व इतर कार्यालये तसेच बाजाराचा परिसर असल्यामुळे वाहनधारक रस्त्याच्या दोन्ही बाजुला मोठ्या प्रमाणावर आपली वाहने लावत असतात. त्यामुळे रहदारीला अडथळा येत असतो. दोन महिन्यांपूर्वी सम-विषम पार्किंगची अंमलबजावणी सुरू झाली, परंतु आता पुन्हा ती बारगळली आहे.