शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

चार रस्त्यांवर वन-वे चे बोर्ड, अंमलबजावणी मात्र कुठेच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:59 IST

नंदुरबार : शहरातील वन वे चा फज्जा उडालेला आहे. केवळ वाहतूक पोलिसांना जेव्हा वेळ मिळेल तेव्हा अशा ठिकाणी उभे ...

नंदुरबार : शहरातील वन वे चा फज्जा उडालेला आहे. केवळ वाहतूक पोलिसांना जेव्हा वेळ मिळेल तेव्हा अशा ठिकाणी उभे राहून त्याची अंमलबजावणीचा प्रयत्न केला जातो. शहरात चार रस्त्यांवर वन वे आहे. परंतु सद्य:स्थितीत एकाही ठिकाणी अंमलबजावणी होत नसल्याची स्थिती आहे.

नंदुरबारातील रस्ते आधीच अरुंद, त्यात अतिक्रमण कमालीचे वाढले आहे. वाहनांची संख्या देखील वाढल्याने रहदारीचा नेहमीच बोजवारा उडालेला आहे. अशा स्थितीत काही वर्षांपूर्वी नंदुरबारातील चार रस्त्यांवर वन वे करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु त्याची अंमलबजावणी तेव्हढ्यापुरतीच मर्यादित राहत आली आहे. अशीच स्थिती समविषम पार्किंगचीदेखील आहे.

शास्त्री मार्केट रस्ता

शास्त्री मार्केट रस्त्यावर पिंजारी विहीर ते मार्केट तसेच शाळा क्रमांक एक ते मार्केट शिवाय सरळ जुने कोर्ट असा एकेरी मार्ग निश्चित करण्यात आला होता. काही काळ या ठिकाणी अंमलबजावणी झाली. परंतु हा मध्यवर्ती भाग असल्याने येथे वन वे यशस्वी झाला नाही. त्यामुळे वाहतूक शाखेने त्याचा नाद सोडून दिल्याचे चित्र आहे.

जळका बाजार

n जळका बाजार ते सोनाट खुंट हा रस्ता देखील चार चाकी वाहनांसाठी वन वे आहे. त्यासाठीचे बोर्ड वाहतूक शाखेेने जळका बाजारात लावले देखील आहेत. परंतु या रस्त्यावर वाहतूक पोलिसांना जेंव्हा आठवण येते तेंव्हा तेथे उभे राहून केवळ दंड आकारणीसाठी अंमलबजावणी केली जाते.

साक्रीनाका

साक्रीनाका ते जळका बाजार व साक्री नाका ते धोशातकीया हा रस्ता देखील वन वे करण्यात आला होता. हे दोन्ही रस्ते अतिशय अरुंद आहेत. एकाच वेळी दोन चारचाकी वाहने निघणे म्हणजे मोठी कसरत असते. अशा वेळी या रस्त्यावर वन-वेची अंमलबजावणी होणे आवश्यक असताना त्याबाबत मात्र वाहतूक शाखेने तसेच पालिकेनेही दुर्लक्ष केले आहे.

सम-विषम पार्किंगदेखील बारगळली...

n जुनी पालिका चौक ते नेहरू चौक, तसेच पालिका चौक ते दीनदयाल चौक या दरम्यानच्या रस्त्यावर सम-विषम पार्किंग करण्याचा निर्णय वेळोवेळी घेण्यात आला आहे. नवीन अधिकारी आल्यावर त्याची तेवढ्यापुरती अंमलबजावणी केली जाते. नंतर पुन्हा ते बारगळते. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर दुकाने आहेत. शाळा, बँका, दवाखाने व इतर कार्यालये तसेच बाजाराचा परिसर असल्यामुळे वाहनधारक रस्त्याच्या दोन्ही बाजुला मोठ्या प्रमाणावर आपली वाहने लावत असतात. त्यामुळे रहदारीला अडथळा येत असतो. दोन महिन्यांपूर्वी सम-विषम पार्किंगची अंमलबजावणी सुरू झाली, परंतु आता पुन्हा ती बारगळली आहे.