शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

तीन रुग्णांमागे एक रुग्ण अपघाताचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 12:15 IST

जिल्ह्याची स्थिती : पाच वर्षात गमावले ९०१ जणांनी प्राण, ७७४ प्राणांकित अपघात

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यात सन २०१४ ते एप्रिल २०१९ पर्यंतच्या साधारणत: पाच वर्षांच्या कालावाधीत एकूण झालेल्या ७७४ प्राणांकीत (फेटल) अपघातात एकूण ९०१ जणांचा बळी गेला आहे़ तर जिल्ह्यातील एकूण अपघातांची संख्या पाच वर्षात २ हजार ८०३ वर जाऊन पोहचली आहे़ दर तीन रुग्णांमागे एक रुग्ण अपघातातील जखमी असल्याची माहिती आहे़गेल्या काही दिवसांपासून नंदुरबार शहरासह जिल्ह्यात अपघातांची मालिका सुरु आहे़ यात, किरकोळ अपघातांसह प्राणांकीत अपघातांचाही मोेठ्या प्रमाणात समावेश आहे़ वारंवार अपघात होत असल्याने याबाबत प्रशासनाकडून तत्काळ उपाय योजना करणे आवश्यक ठरणार आहे़ वाढते अपघात आटोक्यात आणण्याचे प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे़२०१४ साली जिल्ह्यात एकूण ६०५ अपघातांची नोंद करण्यात आली़ यात १२८ प्राणांकित अपघतांचा समावेश असून यात एकूण १५२ जणांना मृत्यू झाला़ २०१५ साली ५८७ अपघात झालेत़ यात १४३ प्राणांकित अपघातात १७५ जणांना मृत्यू झाला़ २०१६ या वर्षी ६२३ अपघात झालेत़ यात एकूण १५४ प्राणांकित अपघाताचा समावेश असून यात, १७९ जणांचा बळी गेला़२०१७ साली ५२७ अपघातांची नोंद करण्यात आली असून यात १२८ प्राणांकित अपघात आहेत़ त्यात, १४६ जणांना आपला प्राण गमवावा लागला़ २०१८ या वर्षी एकूण ३३७ अपघातात सर्वाधिक म्हणजे १६२ प्राणांकित अपघात झाले़ यात १७७ जणांना मृत्यू झाला़ तर एप्रिल २०१९ पर्यंत जिल्ह्यात एकूण १२४ अपघात झाले असून यात ५९ प्राणांकित अपघतांचा समावेश आहे़ तर ७२ जणांना यात बळी गेला आहे़ रस्त्यांची दैनिय स्थिती, वाहनांचा वाढता बेशिस्त वापर, अवजड वाहनांची समस्या तसेच सर्वात महत्वाचे म्हणजे वाहतुकीच्या नियमांचे झालेले तिनतेरा यामुळे गेल्या पाच वर्षात अपघातांचा आलेख पाहिला असता यात वाढ झालेली दिसून येत आहे़ शेकडो जण जखमीही झालेत आहेत़ गेल्या काही वर्षांमध्ये जिल्ह्यात कमालीची बेशिस्त वाहतूक वाढली आहे़ याचा परिणाम म्हणून अपघातांच्या संख्येतही घसघशीत वाढ झाली असल्याचे दिसून येत आहे़ शहरी भागासह ग्रामीण भागातील मुख्य रस्त्यांवर खड्डे तसेच साईडपट्टयांची समस्या जाणवत आहे़त्यामुळे सध्याची रस्त्यांची स्थितीही या अपघातास कारण की.. अशीच दिसून येत आहे़ दरम्यान, अनेक ठिकाणचे निमुळते रस्ते, धाकेदायक वळणे आदी ठिकाणी अपघातांच्या संख्येत अधिक वाढ होत असल्याचे काही दिवसांमध्ये दिसून येत आहे़ जिल्ह्यातील पुलांची स्थितीदेखील अत्यंत दैनिय झाली आहे़ त्यामुळे अशा पुलांचे सर्वेक्षण करुन प्रशासनाने याबाबत तत्काळ कार्यवाही करावी अशी मागणी आता करण्यात येत आहे़ याबाबत आॅडीट होणे अपेक्षीत आहे़