शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

तीन रुग्णांमागे एक रुग्ण अपघाताचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 12:15 IST

जिल्ह्याची स्थिती : पाच वर्षात गमावले ९०१ जणांनी प्राण, ७७४ प्राणांकित अपघात

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यात सन २०१४ ते एप्रिल २०१९ पर्यंतच्या साधारणत: पाच वर्षांच्या कालावाधीत एकूण झालेल्या ७७४ प्राणांकीत (फेटल) अपघातात एकूण ९०१ जणांचा बळी गेला आहे़ तर जिल्ह्यातील एकूण अपघातांची संख्या पाच वर्षात २ हजार ८०३ वर जाऊन पोहचली आहे़ दर तीन रुग्णांमागे एक रुग्ण अपघातातील जखमी असल्याची माहिती आहे़गेल्या काही दिवसांपासून नंदुरबार शहरासह जिल्ह्यात अपघातांची मालिका सुरु आहे़ यात, किरकोळ अपघातांसह प्राणांकीत अपघातांचाही मोेठ्या प्रमाणात समावेश आहे़ वारंवार अपघात होत असल्याने याबाबत प्रशासनाकडून तत्काळ उपाय योजना करणे आवश्यक ठरणार आहे़ वाढते अपघात आटोक्यात आणण्याचे प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे़२०१४ साली जिल्ह्यात एकूण ६०५ अपघातांची नोंद करण्यात आली़ यात १२८ प्राणांकित अपघतांचा समावेश असून यात एकूण १५२ जणांना मृत्यू झाला़ २०१५ साली ५८७ अपघात झालेत़ यात १४३ प्राणांकित अपघातात १७५ जणांना मृत्यू झाला़ २०१६ या वर्षी ६२३ अपघात झालेत़ यात एकूण १५४ प्राणांकित अपघाताचा समावेश असून यात, १७९ जणांचा बळी गेला़२०१७ साली ५२७ अपघातांची नोंद करण्यात आली असून यात १२८ प्राणांकित अपघात आहेत़ त्यात, १४६ जणांना आपला प्राण गमवावा लागला़ २०१८ या वर्षी एकूण ३३७ अपघातात सर्वाधिक म्हणजे १६२ प्राणांकित अपघात झाले़ यात १७७ जणांना मृत्यू झाला़ तर एप्रिल २०१९ पर्यंत जिल्ह्यात एकूण १२४ अपघात झाले असून यात ५९ प्राणांकित अपघतांचा समावेश आहे़ तर ७२ जणांना यात बळी गेला आहे़ रस्त्यांची दैनिय स्थिती, वाहनांचा वाढता बेशिस्त वापर, अवजड वाहनांची समस्या तसेच सर्वात महत्वाचे म्हणजे वाहतुकीच्या नियमांचे झालेले तिनतेरा यामुळे गेल्या पाच वर्षात अपघातांचा आलेख पाहिला असता यात वाढ झालेली दिसून येत आहे़ शेकडो जण जखमीही झालेत आहेत़ गेल्या काही वर्षांमध्ये जिल्ह्यात कमालीची बेशिस्त वाहतूक वाढली आहे़ याचा परिणाम म्हणून अपघातांच्या संख्येतही घसघशीत वाढ झाली असल्याचे दिसून येत आहे़ शहरी भागासह ग्रामीण भागातील मुख्य रस्त्यांवर खड्डे तसेच साईडपट्टयांची समस्या जाणवत आहे़त्यामुळे सध्याची रस्त्यांची स्थितीही या अपघातास कारण की.. अशीच दिसून येत आहे़ दरम्यान, अनेक ठिकाणचे निमुळते रस्ते, धाकेदायक वळणे आदी ठिकाणी अपघातांच्या संख्येत अधिक वाढ होत असल्याचे काही दिवसांमध्ये दिसून येत आहे़ जिल्ह्यातील पुलांची स्थितीदेखील अत्यंत दैनिय झाली आहे़ त्यामुळे अशा पुलांचे सर्वेक्षण करुन प्रशासनाने याबाबत तत्काळ कार्यवाही करावी अशी मागणी आता करण्यात येत आहे़ याबाबत आॅडीट होणे अपेक्षीत आहे़