लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : ग्रामसेवक महिलेच्या शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी एकास शहादा न्यायदंडाधिकारी यांनी सहा महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. वडछील येथील ग्रामसेविका वैशाली प्रकाश पाटील या 1 नोव्हेंबर 2012 रोजी ग्रामपंचायत कार्यालयात काम करीत होत्या. त्यावेळी तेथे गावातीलच रवींद्र बन्सीलाल पाटील हे आले. त्यांनी आपल्याला कापसाचे पैसे का मिळाले नाहीत असे विचारून दमदाटी केली. वैशाली पाटील यांनी त्यांना समजविण्याचा प्रय} केला असता ते समजून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. उलट त्यांच्या अंगावर ते धावून गेले. याबाबत ग्रामसेविका वैशाली पाटील यांनी शहादा पोलिसात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला. हवालदार बी.के.माने यांनी पंचनामा करून प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले. न्या.ए.आर.कल्हापूरे यांच्या कोर्टात ही केस चालली. न्यायालयाने रवींद्र बन्सीलाल पाटील, रा.वडछील यांना दोषी ठरवत सहा महिने सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास दोन महिने साध्या कारावासाचीही शिक्षा सुनावली.सरकारी पक्षातर्फे संजय चौधरी यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून आतिक सैय्यद होते.
सरकारी कामात अडथळा एकास सश्रम कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 12:04 IST