लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : लॉकडाउनच्या काळात घरात चार दिवसांपासून खायला काहीच नाही, अशी थेट गृहमंत्रालयाकडे तक्रार करणाºया व प्रेम विवाह करून पिंप्राळा परिसरात राहणाºया व्यक्तीस महसूल विभागाच्यावतीने एक महिन्याचे धान्य व इतर साहित्य दिले. विशेष म्हणजे या व्यक्तीकडे पाहणीदरम्यान सर्व वस्तू असल्याच्या आढळून आले. पिंप्राळा परिसरात राहणाºया एका जणाने थेट गृहमंत्रालयाकडे तक्रार करून गेल्या चार दिवसांपासून घरात खायला काहीच नसल्याचे नमूद केले. त्यानुसार जिल्हा प्रशासनाकडे या बाबत माहिती देण्यात आल्यानंतर तहसीलदार वैशाली हिंगे व अन्य जणांनी पाहणी केली असता या व्यक्तीकडे फ्रीड, कुलर, टीव्ही, मोबाईल व इतर वस्तू आढळून आल्या. अधिक तपास केला असता या व्यक्तीने प्रेम विवाह करून तो घरातून पळून आलेला आहे. अखेर प्रशासनाने त्याला एक महिन्याचे धान्य व इतर साहित्य उपलब्ध करून दिले. त्यानंतर जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी गृहमंत्रालयाला तक्रार सोडविल्याची माहिती दिली.