शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
3
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
4
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
5
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
6
"सध्या अ‍ॅक्शन सिनेमे चालत आहेत, त्यामुळे.."; आमिर खान 'सितारे जमीन पर'साठी चिंताग्रस्त, म्हणाला-
7
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
8
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
9
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
10
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
11
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
12
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
13
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
14
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
15
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
16
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक
17
T20 Mumbai League : कॅप्टन पृथ्वीची फसलेली चाल; सलामीवीर जोडीदाराला Retire Out करून स्वत:ही परतला तंबूत
18
“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले
19
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
20
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला

४८ गावे ११ पाड्यांमधील एक लाख ग्रामस्थ तहाणले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 12:35 IST

मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : एकीकडे कोरोनाचा अटकाव करण्यासाठी प्रशासनाची धावपळ, दुसरीकडे लॉकडाऊनमुळे शासकीय कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांच्या ...

मनोज शेलार ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : एकीकडे कोरोनाचा अटकाव करण्यासाठी प्रशासनाची धावपळ, दुसरीकडे लॉकडाऊनमुळे शासकीय कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवर मर्यादा यामुळे पाणी टंचाईने होरपळणाºया गावांना कुणीही वाली नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील १ लाख दोन हजार ९१२ लोकसंख्येच्या ४८ गावे व ११ पाड्यांमध्ये तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. पर्यायी उपाययोजना नसल्याने पाणी टंचाईने होरपळणाºया नागरिकांना जंगलात, दºयाखोºयात पायपीट करावी लागत आहे.जिल्ह्यात यंदा सरासरीचा १४२ टक्के पाऊस झाला आहे. सर्वच तालुक्यातील पावसाने सरासरी ओलांडली होती. त्यामुळे लघु व मध्यम प्रकल्पांमध्ये सरासरी ९५ टक्के पाणीसाठा होता. त्यामुळे यंदा पाणी टंचाईची तीव्रता राहणार नाही असे वाटत असतांना ४८ गावे व ११ पाड्यांमध्ये सर्व्हेक्षणाअंती टंचाईच्या झळा बसण्याचे स्पष्ट झाले. आता मे महिना सुरू झाला तरी या गावांना टंचाईच्या उपाययोजना केल्या गेल्या नसल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.शेवटचा टप्पा खडतरफेब्रुवारीपर्यंत टंचाईग्रस्त गावांना पाण्याची फारशी समस्या भेडसावली नाही. शेवटचा टप्पा अर्थात मार्च ते मे दरम्यान तीव्र टंचाईची शक्यता गृहीत धरून मार्च महिन्यात उपाययोजनांना गती देण्यात येणार होती. परंतु मार्चच्या दुसºया आठवड्यापासून कोरोनाची तीव्रता वाढली. तिसºया आठवड्यात अर्थात २३ मार्च पासून लॉकडाऊन सुरू झाले. परिणामी या गावांना पर्यायी उपाययोजना होऊच शकल्या नाहीत. कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांची कमरता, कामासाठी मजुरांची टंचाई, वाहने न मिळणे यासह इतर समस्यांमुळे उपाययोजना होऊच शकल्या नाहीत. परिणामी या गावांना आता भर उन्हाळ्यात तीव्र टंचाईला सामोरे जावे लागत आहे.सर्वाधिक नंदुरबार तालुकाटंचाईच्या झळा असलेल्या सर्वाधिक २४ गावे ही नंदुरबार तालुक्यातील आहेत. त्या खालोखाल १२ गावे शहादा तालुक्यातील असून नवापुर तालुक्यात सहा गावे व नऊ पाडे, अक्कलकुवा तालुक्यात ४ गावे तर धडगाव तालुक्यात दोन गावे व दोन पाड्यांचा समावेश आहे. भूजल विभागाच्या सर्व्हेनुसार ही गावे असले तरी सद्य स्थितीत यापेक्षा दुप्पट गावे व पाड्यांवर टंचाईचा सामना करावा लागत आहे.कुपनलिकांवर हातपंपच नाहीतगेल्या वर्षी टंचाईच्या काळात सातपुड्यातील धडगाव, अक्कलकुवा व तळोदा तालुक्यातील अनेक गाव, पाडयांमध्ये कुपनलिका करण्यात आल्या. त्यांना पाणीही बºयापैकी लागले, परंतु अशा ठिकाणी हातपंपच बसविण्यात आले नसल्याने त्या कुपनलिका नुसत्याच शोभेच्या वस्तू बनून आहेत. हातपंप बसविले गेले असते तर आज संबधीत गाव, पाड्यातील लोकांना स्थानिक ठिकाणीच पाणी उपलब्ध झाले असते.आता तरी गती द्यावीसध्या लॉकडाऊन शिथील करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी रोहयोची कामे सुरू झाली आहेत. शासकीय वाहनांना सुट देण्यात येत आहे. त्यामुळे आता पाणी टंचाई उपाययोजनांच्या कामांना गती द्यावी अशी मागणी होत आहे. कागदपत्र रंगविण्याऐवजी थेट निर्णय घेवून कामांचे कार्यादेश द्यावे अशी मागणी देखील करण्यात आली आहे.४नंदुरबार तालुक्यातील ५७,३२७ लोकसंख्येच्या २४ गावांमध्ये टंचाई आहे. उपाययोजनांमध्ये सर्वच २४ ठिकाणी विहिर अधिग्रहण प्रस्तावीत आहे.४नवापूर तालुक्यातील१२,०१२ लोकख्येंच्या १५ ग्रामपंचायतीची सहा गावे व ९ पाड्यांमध्ये ९ ठिकाणी विहिर अधीग्रहण तर ६ ठिकाणी विंधन विहिर घेण्यात येणार होत्या.शहादा तालुक्यातील २९,०२३ लोकसंख्येच्या १२ गावांमध्ये कुपनलिका खोदण्यात येणार होत्या.अक्लककुवा तालुक्यातील ३,४२४ लोकसंख्येच्या ४ गावांमध्ये चारही ठिकाणी विंधन विहिर खोदण्यात येणार होत्या.धडगाव तालुक्यात १,१२६ लोकसंख्येच्या दोन गावे व दोन पाड्यांमध्ये दोन ठिकाणी विहिर अधिग्रहण तर दोन ठिकाणी टँकर प्रस्तावीत होते.जिल्ह्यात सरासरीचा तब्बल ४२ टक्के अधीक पाऊस झाला असल्यामुळे यंदा जिल्हा टँकरमुक्त राहील असा अंदाज होता. परंतु धडगाव तालुक्यातील गौºयाचा बोदलापडा येथे यंदाही टँकर लागणार आहे.या गावाला एप्रिल महिन्यापासूनच टँकर प्रस्तावीत केले गेले गेल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे टँकरमुक्तीचे स्वप्नच राहिले. दरवर्षी केवळ याच ठिकाणी टँकर सुरू राहते.