शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

४८ गावे ११ पाड्यांमधील एक लाख ग्रामस्थ तहाणले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 12:35 IST

मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : एकीकडे कोरोनाचा अटकाव करण्यासाठी प्रशासनाची धावपळ, दुसरीकडे लॉकडाऊनमुळे शासकीय कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांच्या ...

मनोज शेलार ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : एकीकडे कोरोनाचा अटकाव करण्यासाठी प्रशासनाची धावपळ, दुसरीकडे लॉकडाऊनमुळे शासकीय कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवर मर्यादा यामुळे पाणी टंचाईने होरपळणाºया गावांना कुणीही वाली नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील १ लाख दोन हजार ९१२ लोकसंख्येच्या ४८ गावे व ११ पाड्यांमध्ये तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. पर्यायी उपाययोजना नसल्याने पाणी टंचाईने होरपळणाºया नागरिकांना जंगलात, दºयाखोºयात पायपीट करावी लागत आहे.जिल्ह्यात यंदा सरासरीचा १४२ टक्के पाऊस झाला आहे. सर्वच तालुक्यातील पावसाने सरासरी ओलांडली होती. त्यामुळे लघु व मध्यम प्रकल्पांमध्ये सरासरी ९५ टक्के पाणीसाठा होता. त्यामुळे यंदा पाणी टंचाईची तीव्रता राहणार नाही असे वाटत असतांना ४८ गावे व ११ पाड्यांमध्ये सर्व्हेक्षणाअंती टंचाईच्या झळा बसण्याचे स्पष्ट झाले. आता मे महिना सुरू झाला तरी या गावांना टंचाईच्या उपाययोजना केल्या गेल्या नसल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.शेवटचा टप्पा खडतरफेब्रुवारीपर्यंत टंचाईग्रस्त गावांना पाण्याची फारशी समस्या भेडसावली नाही. शेवटचा टप्पा अर्थात मार्च ते मे दरम्यान तीव्र टंचाईची शक्यता गृहीत धरून मार्च महिन्यात उपाययोजनांना गती देण्यात येणार होती. परंतु मार्चच्या दुसºया आठवड्यापासून कोरोनाची तीव्रता वाढली. तिसºया आठवड्यात अर्थात २३ मार्च पासून लॉकडाऊन सुरू झाले. परिणामी या गावांना पर्यायी उपाययोजना होऊच शकल्या नाहीत. कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांची कमरता, कामासाठी मजुरांची टंचाई, वाहने न मिळणे यासह इतर समस्यांमुळे उपाययोजना होऊच शकल्या नाहीत. परिणामी या गावांना आता भर उन्हाळ्यात तीव्र टंचाईला सामोरे जावे लागत आहे.सर्वाधिक नंदुरबार तालुकाटंचाईच्या झळा असलेल्या सर्वाधिक २४ गावे ही नंदुरबार तालुक्यातील आहेत. त्या खालोखाल १२ गावे शहादा तालुक्यातील असून नवापुर तालुक्यात सहा गावे व नऊ पाडे, अक्कलकुवा तालुक्यात ४ गावे तर धडगाव तालुक्यात दोन गावे व दोन पाड्यांचा समावेश आहे. भूजल विभागाच्या सर्व्हेनुसार ही गावे असले तरी सद्य स्थितीत यापेक्षा दुप्पट गावे व पाड्यांवर टंचाईचा सामना करावा लागत आहे.कुपनलिकांवर हातपंपच नाहीतगेल्या वर्षी टंचाईच्या काळात सातपुड्यातील धडगाव, अक्कलकुवा व तळोदा तालुक्यातील अनेक गाव, पाडयांमध्ये कुपनलिका करण्यात आल्या. त्यांना पाणीही बºयापैकी लागले, परंतु अशा ठिकाणी हातपंपच बसविण्यात आले नसल्याने त्या कुपनलिका नुसत्याच शोभेच्या वस्तू बनून आहेत. हातपंप बसविले गेले असते तर आज संबधीत गाव, पाड्यातील लोकांना स्थानिक ठिकाणीच पाणी उपलब्ध झाले असते.आता तरी गती द्यावीसध्या लॉकडाऊन शिथील करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी रोहयोची कामे सुरू झाली आहेत. शासकीय वाहनांना सुट देण्यात येत आहे. त्यामुळे आता पाणी टंचाई उपाययोजनांच्या कामांना गती द्यावी अशी मागणी होत आहे. कागदपत्र रंगविण्याऐवजी थेट निर्णय घेवून कामांचे कार्यादेश द्यावे अशी मागणी देखील करण्यात आली आहे.४नंदुरबार तालुक्यातील ५७,३२७ लोकसंख्येच्या २४ गावांमध्ये टंचाई आहे. उपाययोजनांमध्ये सर्वच २४ ठिकाणी विहिर अधिग्रहण प्रस्तावीत आहे.४नवापूर तालुक्यातील१२,०१२ लोकख्येंच्या १५ ग्रामपंचायतीची सहा गावे व ९ पाड्यांमध्ये ९ ठिकाणी विहिर अधीग्रहण तर ६ ठिकाणी विंधन विहिर घेण्यात येणार होत्या.शहादा तालुक्यातील २९,०२३ लोकसंख्येच्या १२ गावांमध्ये कुपनलिका खोदण्यात येणार होत्या.अक्लककुवा तालुक्यातील ३,४२४ लोकसंख्येच्या ४ गावांमध्ये चारही ठिकाणी विंधन विहिर खोदण्यात येणार होत्या.धडगाव तालुक्यात १,१२६ लोकसंख्येच्या दोन गावे व दोन पाड्यांमध्ये दोन ठिकाणी विहिर अधिग्रहण तर दोन ठिकाणी टँकर प्रस्तावीत होते.जिल्ह्यात सरासरीचा तब्बल ४२ टक्के अधीक पाऊस झाला असल्यामुळे यंदा जिल्हा टँकरमुक्त राहील असा अंदाज होता. परंतु धडगाव तालुक्यातील गौºयाचा बोदलापडा येथे यंदाही टँकर लागणार आहे.या गावाला एप्रिल महिन्यापासूनच टँकर प्रस्तावीत केले गेले गेल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे टँकरमुक्तीचे स्वप्नच राहिले. दरवर्षी केवळ याच ठिकाणी टँकर सुरू राहते.