शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
2
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
3
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

लसीकरणाचा एक लाखाचा टप्पा पार, परंतु ग्रामीण भाग उदास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:30 IST

नंदुरबार : जिल्ह्यात लसीकरणाचा एक लाखाचा टप्पा पार पडला असला तरी ग्रामीणसह दुर्गम भागात लसीकरणाचा वेग वाढत नसल्याची स्थिती ...

नंदुरबार : जिल्ह्यात लसीकरणाचा एक लाखाचा टप्पा पार पडला असला तरी ग्रामीणसह दुर्गम भागात लसीकरणाचा वेग वाढत नसल्याची स्थिती आहे. भीती आणि गैरसमज हे कारणे असल्यामुळे जनजागृतीवर भर देण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनाने सुरू केला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४ हजार इतके लसीकरण झाले आहे. लक्ष्यांकापेक्षा ते केवळ ३० टक्के इतके आहे. लसीकरणाला वेग मिळावा यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे ६० ठिकाणी सोय करण्यात आली आहे. परंतु ग्रामीण व आदिवासी दुर्गम भागात गैरसमज आणि भीतीमुळे लसीकरणास प्रतिसाद कमी राहत आहे. जनतेमधील भीती दूर करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पथनाट्याद्वारे प्रयत्न चालविले आहेत. जिल्हाधिकारी डाॅ. राजेंद्र भारुड यांनी स्वत: आदिवासी, अहिराणी व मराठी भाषेत जनजागृतीपर आवाहन करणारे संदेश समाजमाध्यमावर प्रसारित केले आहेत. दरम्यान, १ मेपासून १८ वर्षावरील सर्वांना लसीकरण केले जाणार असल्यानेही वेग वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.