शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मध्य रेल्वेची ठाणे ते सीएसएमटी दरम्यानची वाहतूक पूर्णपणे बंद
2
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
3
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
4
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
5
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
6
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?
7
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
8
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
9
'हिंदुस्तान झिदाबाद...' तिरंग्यासाठी लंडनमध्ये पाकिस्तानींशी भिडल्या भारतीय तरुणी, पाहा VIDEO
10
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...
12
LIC ची मोठी घोषणा! बंद पडलेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची सुवर्णसंधी; विलंब शुल्कातही मोठी सूट
13
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
14
रोनाल्डोचा साखरपुडा आणि सौदीचे ‘रहस्य’! स्थानिकांना वेगळा नियम आणि स्टारला वेगळा न्याय, का?
15
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?
16
चिपळुणात वाशिष्ठी नदीने ओलांडली इशारा पातळी; पूरसदृश स्थितीमुळे कामाशिवाय घराबाहेर न पडण्याची सूचना
17
"२६ जुलैचा जलप्रलय, तुम्ही मला...", वीणा जामकरने सांगितली ज्योती चांदेकरांची भावुक आठवण
18
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
19
Pune Traffic: पुण्यात सकाळपासून मुसळधार! शहरात प्रचंड वाहतूककोंडी, प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
20
"झोया अख्तर बड्या बापाची मुलगी...", 'गलीबॉय'साठी ऑडिशन द्यायला सांगितल्याने भडकल्या उषा नाडकर्णी

रोजी गेली, तरी जिल्ह्यातील एक लाख कुटुंबांना मिळणार रोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:27 IST

नंदुरबार : गेल्या वर्षी कोरोनाच्या काळात जिल्ह्यातील प्राधान्य कुटुंब आणि अंत्योदय कुटुंबातील रेशनकार्डधारकांना तब्बल आठ महिने मोफत रेशन पुरवठा ...

नंदुरबार : गेल्या वर्षी कोरोनाच्या काळात जिल्ह्यातील प्राधान्य कुटुंब आणि अंत्योदय कुटुंबातील रेशनकार्डधारकांना तब्बल आठ महिने मोफत रेशन पुरवठा करण्यात आला होता. आता त्याच अनुषंगाने यावेळीही राज्य सरकारने लावलेल्या संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर एक महिन्याचे धान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचा लाभ जिल्ह्यातील एक लाख चार हजार ९५३ कुटुंबांना मिळणार आहे. हे धान्य वाटपासंदर्भात नियोजन करण्यात येत आहे.

कोरोनामुळे राज्य सरकारने १५ एप्रिलपासून १ मे पर्यंत संचारबंदी लागू केली आहे. नंदुरबार जिल्ह्यात मात्र स्थानिक प्रशासनाने १ एप्रिलपासूनच संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे अनेकांचे रोजगार बुडाले असून अनेकांचे संसार उघड्यावर येण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेता राज्य शासनाने दारिद्र रेषेखालील कुटुंबांना एक महिन्याचे मोफत धान्य रेशन दुकानातून पुरविण्याचे ठरविले आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनातर्फे नियोजन सुरू आहे. लवकरच रेशन दुकानदारांना हे धान्य पुरविण्यात येणार असून त्यांच्या मार्फत लाभार्थी कुटुंबांना ते पुरविले जाणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे अशा कुटुंबांना एक आधार मिळणार आहे.

गहू व तांदूळ मिळणार

राज्य शासनाने जाहीर केल्याप्रमाणे लाभार्थी कुटुंबांना गहू व तांदूळ मिळणार आहे. त्या अनुषंगाने रेशन दुकानदारांना लाभार्थी संख्येप्रमाणे धान्याचा कोटा दिला जाणार आहे.

n कोरोनाच्या आठ महिन्यांच्या काळात अर्थात एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्याच्या कालावधीत शासनातर्फे मोफत गहू व तांदूळ वाटप करण्यात आले. यामुळे अनेक कुटुंबांची गैरसोय दूर झाली होती.

nजिल्ह्यात दोन लाख ३६ हजार ५०१ कुटुंबांना या योजनेचा लाभ झाला होता. त्यांना दोन लाख ७० हजार १३६ क्विंटल तांदूळ तर एक लाख ८० हजार ४०० क्विंटल गहू वाटप झाला.

कोरोनाचा कहर वाढत आहे. त्यामुळे कडक उपाययोजना करणे आवश्यक होते. त्या उपाययोजनांच्या आधारे संचारबंदी लागू केली असून ते योग्यच आहे. ते करतांना शासनाने आमच्या सारख्या कुटुंबांचीही काळजी केल्याने तो एक आधार मिळाला आहे.

-एक लाभार्थी कुटुंब प्रमुख, नंदुरबार.

कोरोनामुळे अनेकांची रोजीरोटी गेली आहे. गेल्या वर्षी शासनाने मोफत धान्याचा आधार दिला होता. साधारणत: आठ महिने मोफत धान्य मिळत होते. आता देखील राज्य शासनाने अशा कुटुंबांची काळजी घेतली असल्याने समाधानाची बाब आहे.

-एक लाभार्थी, शहादा.