शहरं
Join us  
Trending Stories
1
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
2
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
3
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
4
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
5
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
6
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
7
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
8
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
9
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
10
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
11
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
12
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
13
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
14
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
15
हा घ्या पुरावा! पाकिस्तान पुसतोय 'ऑपरेशन सिंदूर'च्या खुणा; एअर बेसवरील बिल्डिंग लाल ताडपत्रीने झाकली
16
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
17
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
18
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
19
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
20
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
Daily Top 2Weekly Top 5

दीड हजार मतदान यंत्र उत्तर भारतातून दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 12:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : प्रशासकीय स्तरावर विधानसभा निवडणुकीच्या तयारीला वेग देण्यात आला आहे. प्रारूप मतदार याद्यांची तयारी पुर्ण ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : प्रशासकीय स्तरावर विधानसभा निवडणुकीच्या तयारीला वेग देण्यात आला आहे. प्रारूप मतदार याद्यांची तयारी पुर्ण करण्यात आली आहे. आवश्यक कर्मचारी, वाहनांची यादी यापूर्वीच राज्य निवडणूक आयोगाला देण्यात आली आहे. आता जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघांसाठी लागणारे ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन उत्तर भारतातून येथे दाखल झाले आहेत. विधानसभा निवडणुकीची घोषणा सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात होण्याची शक्यता आहे. प्रत्यक्षात निवडणूक ऑक्टोबरच्या दुस:या व तिस:या आठवडय़ात होणार आहे. प्रशासकीय पातळीवर निवडणुकीच्या तयारीसाठी आवश्यक त्या साधनांची जुळवाजुळव करण्याच्या सुचना यापूर्वीच राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने त्यादृष्टीने युद्धपातळीवर तयारी सुरू केली आहे. यापूर्वीच मतदार यादी अद्ययावत करण्यात आली आहे. जास्तीत जास्त नवमतदारांना सामावून घेता यावे यासाठी मोहिम राबविण्यात आली. पुरेसे ईव्हीएम दाखलविधानसभा निवडणुकीसाठी मतदान यंत्रांच्या प्रथमस्तरीय तपासणीचे काम नंदुरबारातील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ परिसरात बुधवारपासून सुरू करण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी येथे भेट देऊन प्रक्रीयेची पाहणी केली. उत्तर प्रदेशच्या सितापूर येथून 510 कंन्ट्रोल युनिट, 900 बॅलेट युनिट व 550 व्हीव्हीपॅट यंत्र आले आहेत. हरदोई येथून एक हजार कंन्ट्रोल युनिट आणि एक हजार 100 व्हीव्हीपॅट यंत्र प्राप्त झाले आहेत. तर लोकसभा निवडणुकीतील राखीव असलेले 346 कन्ट्रोल युनिट, एक हजार 679 बॅलेट युनिट आणि 359 व्हीव्हीपॅट प्रथमस्तरीय तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. सर्व यंत्रांची तपासणी पुर्ण झाल्यानंतर सरमिसळ करून विधानसभा मतदारसंघात त्यांचे वितरण करण्यात येणार आहे. त्यानंतर परत एकदा सरमिसळ प्रक्रीय करून मतदान केंद्रांना यंत्र वितरीत करण्यात येतील. निवडणुका पारदर्शक पद्धतीने व्हाव्यात यासाठी प्रशासनाने आवश्यक प्रक्रीया सुरू केली असून राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनीदेखील प्रथमस्तरीय तपासणी प्रक्रीया कामाची पाहणी करण्यासाठी कामाच्या ठिकाणी भेट द्यावी, असे आवाहन जिल्हाधिका:यांनी केले आहे.वाहने आणि कर्मचारीचारही विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आवश्यकता असलेले कर्मचारी आणि वाहनाची व्यवस्था याची जुळवणी आधीच करण्यात आली आहे. तसा अहवाल राज्य निवडणूक आयोगाला देण्यात आला आहे. याशिवाय मतदान केंद्रांची व्यवस्था, त्यासाठीच्या इमारती, खोल्या यांचीही पहाणी यापूर्वीच झालेली आहे. त्यामुळे प्रशासकीय स्तरावर निवडणुकीसाठीची तयारी अंतिम टप्प्यात आहे. आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक प्रक्रीयेत नागरिक व मतदारांच्या सोयीसाठी जिल्हा संपर्क केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. त्याठिकाणी 1950 हा टोल फ्री क्रमांक कार्यान्वीत करण्यात आला आहे. मतदार यादीतील शंकांचे निरसन, मतदार यादीतील नाव व तपशीलाची दुरुस्ती, निवडणुक प्रणालीची माहिती देणे, मतदार यादीत नाव समाविष्ट करणे याबाबत संपर्क केंद्रावर माहिती घेता येईल. त्यासाठी या हेल्पलाईन क्रमांकासाठी स्वतंत्र कर्मचारी नेमण्यात आले आहेत. नागरिकांना कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत  विधानसभा निवडणुक विषयक माहिती घेता येईल. लँडलाईन व मोबाईल अशा दोन्हीवरून ही सुविधा उपलब्ध असेल. नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी केले आहे.