शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
3
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
4
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
5
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
6
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक
7
T20 Mumbai League : कॅप्टन पृथ्वीची फसलेली चाल; सलामीवीर जोडीदाराला Retire Out करून स्वत:ही परतला तंबूत
8
“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले
9
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
10
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
11
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
12
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
13
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
14
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
15
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
16
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
17
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
18
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
19
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
20
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार

लाॅकडाऊनमधून पोळून निघालेल्या दीड हजार मोठ्या व लघुउद्योगांनी घेतली भरारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:32 IST

नंदुरबार : सातपुड्याच्या दुर्गम भागाचा समावेश असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील उद्योगधंद्यांना सलग तीन महिन्यांच्या लाॅकडाऊनमुळे १५० कोटी रुपयांचा फटका बसला ...

नंदुरबार : सातपुड्याच्या दुर्गम भागाचा समावेश असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील उद्योगधंद्यांना सलग तीन महिन्यांच्या लाॅकडाऊनमुळे १५० कोटी रुपयांचा फटका बसला होता. यातून सावरत हे उद्योग आता पुन्हा उभारी धरत असून, यातून नवीन मार्ग सापडून नव्याने अर्थकारणाला सुरुवात झाली आहे.

मार्च २०२०पासून लागू करण्यात आलेल्या लाॅकडाऊनमुळे जनजीवन थांबले होते. यात नंदुरबार जिल्ह्यातील दीड हजार उद्योग समूहांचा समावेश होता. कालांतराने ३३ टक्के कामगारांसह उद्योग सुरू करण्यास परवानगी देण्यात आली खरी; परंतु उत्पादनवाढीसाठी लागणारे मनुष्यबळ, कच्चा माल याचा अभाव असल्याने उद्योगाची गाडी रुळावर येतच नव्हती, जून महिन्यात सुरू झालेल्या उद्योगांना खऱ्या अर्थाने ऑक्टोबर २०२०पासून उभारी मिळण्यास सुरुवात झाली. यात जिल्हा उद्योग केंद्रातून चालवण्यात येणारे पंतप्रधान आणि मुख्यमंत्री रोजगार उन्नती कार्यक्रम सर्वाधिक मदतीचे ठरले होते. याअंतर्गत बँकांकडे ५० लाख रुपयांचे उद्योग सुरू करण्यासाठी प्रस्ताव उद्योजकांकडून देण्यात आले होते. यातून नंदुरबार जिल्ह्यात ३० कोटी रुपयांची गुंतवणूक होऊन त्यातून उत्पादन सुरू होऊन रोजगार निर्मिती झाली आहे. हे उद्योग सुरू करण्यासाठी शासनाकडूनही तातडीने परवानगी देण्यात आल्याने जिल्ह्यातील उद्योगधद्यांना लाभ झाला.

लाॅकडाऊन काळानंतर उभ्या राहणाऱ्या उद्योगांना रोजगार उन्नती कार्यक्रम हा सर्वाधिक लाभदायकही ठरला होता. २०१९ -२० या वर्षात ४६ नवे उद्योग सुरू करण्यात आले होते. यातून २३ कोटी ५० लाख रुपयांची थेट गुंतवणूक झाल्याने जिल्ह्यातील उद्योग व्यवसायाचा आलेख हा वर सरकता राहिला होता. प्रामुख्याने कुशल आणि अशकुल अशा दोन्ही क्षेत्रांतील मजुरांना रोजगार उपलब्ध झाल्याने अनेकांवर बेरोजगार होण्याची वेळ आली नव्हती. प्रामुख्याने मिरची, मसाले, जिनिंग, प्रेसिंग, काॅटन सीड, ऑइल मिल, फूड प्रोसेसिंग युनिट, कृषिपूरक साहित्यनिर्मिती, फळप्रक्रिया, दुग्धोत्पादन आदी उद्योग बळकट होत गेल्याने लाॅकडाऊननंतरची बेकारीची लाट जिल्ह्यावर आली नाही.

एक हजार ४४६ लघुउद्योग

नंदुरबार जिल्ह्यात दोन मोठे उद्योग आहेत, तर एक हजार ४४६ लघुउद्योग आहेत. मोठ्या उद्योगामध्ये ऑइल मिल व डाळ मिल यांचा समावेश आहे. लाॅकडाऊन उघडल्यानंतर ऑइल मिलमधील पुन्हा जुन्या वेगाने सुरू झाल्या होत्या.

जिल्ह्यात मिरची प्रक्रिया मसाले, इंजिनिअरिंग, कृषिपूरक, उद्योग, दुग्धोत्पादन यांसह विविध उद्योगांचा समावेश आहे. लाॅकडाऊन उघडल्यानंतर नवापुरातील वस्त्रोद्योग, नंदुरबारातील मिरची व मसाले उद्योग स्थिरस्थावर होण्यास बराच वेळ लागला; परंतु कच्च्या मालाच्या उपलब्धतेनुसार हे उद्योग सुरू आहेत. एकीकडे हे उद्योग सुरू असताना दुसरीकडे जिल्ह्यातील दहा कोल्डस्टोरेजही सुरळीत सुरू असल्याची माहिती जिल्ह्यातील कोल्डस्टोरेज दोन महिने बंद राहिल्याने गेल्या वर्षात मोठे नुकसान व्यापाऱ्यांना सहन करावे लागले होते. मालाचा साठा झाला असला तरी तो काढण्यासाठी मजूरच नसल्याने मोठ्या अडचणींना व्यापाऱ्यांनी तोंड दिले हाेते.