शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
3
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
4
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
5
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
6
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली
7
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले
8
मुंबई-गोवा ‘वंदे भारत’ २० कोचची होणार? कधीपासून सेवा सुरू करणार? प्रवाशांचा तुफान प्रतिसाद
9
ट्रम्पचा 'टॅरिफ बॉम्ब' थांबता थांबेना! आता थेट चिप्सवर १००% शुल्क, तुमच्या खिशाला किती फटका बसेल?
10
Shravan Purnima 2025: श्रावण पौर्णिमेला कोळीबांधव का करतात रामाची पूजा? जाणून घ्या कारण!
11
मॉर्फ कमी होते म्हणून की काय Elon Musk आता खालच्या पातळीवर उतरले; ग्रोक एआय देणार आता नग्न फोटो 
12
मुलीची पाठवणी करताना वधूपिता गहिवरला, डबडबल्या डोळ्यांनी जावईबापूंना म्हणाला- माझी लेक... (VIDEO)
13
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
14
कोरोना काळात एका गोळीसाठी अमेरिका तडफडत होता, भारताने एका कॉलवर ५० लाख टॅब्लेट पाठवल्या आणि आता...
15
५०० रुपयांच्या SIP चा हप्ता चुकला अन् बँकने लावला ५९० रुपये दंड, तुही तर ही चूक करत नाही ना?
16
“अमेरिकेच्या आदेशांचे पालन करतोय, तोपर्यंत भारत महान मित्र, पण...”; चीनने स्पष्टच सांगितले
17
पीडितेच्या साडीने माजी खासदाराला पाठवले तुरुंगात, प्रज्वल रेवण्णा प्रकरणात कसा सापडला महत्त्वाचा पुरावा?
18
या देशामध्ये मुस्लिमांना सार्वजनिक ठिकाणी सण साजरे करण्यास करण्यात आली मनाई  
19
"मी खेळू शकेन असं वाटत नाही, पण CSK साठी..."; धोनीच्या विधानाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
20
Aashna Chaudhary : जिद्दीला सॅल्यूट! अपयशाने खचली नाही, IPS होण्याचं स्वप्न केलं पूर्ण, आता मिळाली मोठी जबाबदारी

मुक्कामाला येणारी बस आगारातच थांबली ; प्रवाशांची गैरसोय वाढली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:32 IST

नंदुरबार : जिल्ह्यातील चार आगारांची निर्बधांमुळे आर्थिक उत्पन्नात घसरगुंडी सुरू आहे. ग्रामीण मार्गांवर प्रवासीच मिळत नसल्याने बसेस आगारात पडून ...

नंदुरबार : जिल्ह्यातील चार आगारांची निर्बधांमुळे आर्थिक उत्पन्नात घसरगुंडी सुरू आहे. ग्रामीण मार्गांवर प्रवासीच मिळत नसल्याने बसेस आगारात पडून आहेत. यातही मुक्कामी बसेस बंद असल्याने आगारांचे आर्थिक उत्पन्न निचांकी झाले असल्याचे चित्र आहे. यामुळे चार वाजेनंतरचे निर्बंध शिथिल झाल्यास एसटीला प्रवासी मिळतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

नंदुरबार आगारातून दरदिवशी सध्या ३० हजार किलोमीटरचा प्रवास करत आहेत. यातून दिवसाला आठ लाखांची कमाई होत असली तरी चार वाजेनंतर आगाराच्या बसेस बंद पडत आहेत. हीच गत शहादा, नवापूर आणि अक्कलकुवा आगाराची झाली आहे. यातून रात्री शहरी आणि ग्रामीण भागात जाणाऱ्या सुमारे १५० पेक्षा अधिक बसेस सध्या आगारातच थांबल्याचे दिसून आले आहे. सध्या डिझेलच्या दरवाढीमुळे प्रवासी त्याच मार्गावर बसेस असे धोरण आगारांनी अंगीकारले आहे. यातून काही ठिकाणी बसेस प्रवासी न मिळाल्यास ती बस आगारातून रद्द केली जाते. आगारांकडून ज्या मार्गाला प्रवासी अधिक अशाच बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. मुंबई, नाशिक, पुणे या मार्गावरच्या रातराणी बसेस पूर्णपणे बंद करण्यात आल्या आहेत. यातून आगारांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. कोरोनापूर्वी चार आगारांचे दैनंदिन उत्पन्न हे ३५ लाखांच्या घरात होते. हे उत्पन्न आता आठ ते दहा लाखांपर्यंत आल्याचे सांगण्यात येत आहे. येत्या काळात शासनाने निर्बंध उठवल्यानंतरही डिझेल दरवाढीमुळे भाडेवाढीशिवाय बसेस चालणार नसल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील चारही आगारांना सध्या डिझेलसाठी दर आठवड्याला किमान ११ लाख रुपयांची गरज भासते. हा पैसा गोळा झाल्यावरच डिझेल मागवून बसेस चालवल्या जात आहेत. गेल्या वर्षापेक्षा यंदा डिझेलचे दर अधिक वाढल्याने एसटीपुढे अनेक समस्या निर्माण होत आहेत. यामुळे येत्या काळात भाडेवाढ निश्चित मानली जात आहे.

चार आगारांनी ज्या मार्गावर अधिक प्रवासी तेच मार्ग सुरू ठेवले आहेत. दुपारी चार वाजेपर्यंत बसेस सुरू असतात.

ग्रामीण भागातील दिवसाच्या फेऱ्याही बंद आहेत. विद्यार्थी वाहतूक कमी असल्याने आगारांना अद्याप म्हणावा तसा लाभ मिळत नाही.

चार वाजेनंतर प्रवासीच येत नसल्याने बसस्थानकातून बसेस सोडण्यास सध्या तरी नकार दिला जात आहे.

नंदुरबार आगाराचे उत्पन्न हे कमी झाले आहे. परंतू ते वाढवण्याचा प्रयत्न आगार करत आहे. ज्या मार्गांवर प्रवासी असतील अशा मार्गांवरच बसेस सुरू ठेवाव्यात असे नियोजन करत आहोत. चार वाजेनंतर सर्वत्र शुकशुकाट होत असल्याने रात्री पाठवण्यात येणाऱ्या बसेस बंद करण्यात आल्या आहेत. येत्या काळात शासनाचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर पुढील नियोजन करत बसेस सुरू ठेवू.

-मनोज पवार,

आगारप्रमुख, नंदुरबार

कोराेना रुग्णांची संख्या नियंत्रणात आहे. यामुळे आगारांनी बसेस सुरू करायला हव्यात, ग्रामीण भागात बसेसची अपेक्षा आहे. तालुक्याच्या गावी जाण्यासाठी शेतकरी बसचा वापर करतात. गेल्या अनेक वर्षापासून हा प्रवास सुरू आहे. हा प्रवास खंडित करू नये.

-पुरुषोत्तम पाटील, प्रवासी,

शहादा ते नंदुरबार असा नियमित प्रवास करत आहे. यासाठी बस हा एकमेव चांगला पर्याय आहे. हा पर्याय चांगला असला तरी बसेस कमी झाल्या आहेत. बससाठी ताटकळत बसावे लागते. एसटी आगाराने बसेस वाढवून प्रवाशांची सोय करावी.

-महेश पाटील, प्रवासी,