शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

अधिका:यांच्या ‘दांडी’मुळे टंचाई बैठक बारगळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 12:56 IST

तळोदा तालुका : दुष्काळ आढावा बैठक पुन्हा 26 ला घेण्याचे आमदारांची सूचना

तळोदा : तालुक्यातील संभाव्य पाणीटंचाईबाबत येथील प्रशासकीय इमारतीत आढावा बैठक घेण्यात आली. परंतु या बैठकीस काही विभाग प्रमुख आणि कर्मचा:यांनी दांडी मारल्यामुळे टंचाईबाबत सविस्तर चर्चा होवू शकली नाही. ही बैठक पुन्हा 26 ऑक्टोबर 2018 रोजी घेण्यात येणार असल्याचे महसूल प्रशासनाने सांगितले. तथापि संपूर्ण तालुका दुष्काळाने होरपळत असतांना कर्मचा:यांचा बेजबाबदार भूमिकेविषयी ग्रामीण जनतेमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून, अशा दांडी बहाद्दरांवर प्रशासन काय कारवाई करते याकडे लक्ष लागून आहे.तळोदा शहराबरोबरच संपूर्ण तालुक्यात यंदा सरासरी पेक्षा कमी पजर्न्यमान झाले आहे. अगदी शेवटर्पयत दमदार पाऊस झाला नाही. साहजिकच नद्या-नाल्यांनादेखील पूर आला नाही. लघुसिंचन प्रकल्पदेखील पाच ते दहा टक्केही भरले नाही. त्यामुळे भूगर्भातील पाण्याच्या पातळी अभावी आतापासूनच जनतेला दुष्काळाच्या दाहकतेला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र आहे. शासन-प्रशासन स्तरावर आतापासूनच उपाययोजना राबविण्याचा प्रय} केला जात आहे. याच पाश्र्वभूमिवर तळोदा तालुक्यातील पाणीटंचाईबाबत प्रशासनातर्फे मंगळवारी येथील प्रशासकीय मध्यवर्ती इमारतीत विभाग प्रमुख, ग्रामसेवक यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीच्या अध्यक्षस्थानी आमदार उदेसिंग पाडवी होते. तहसीलदार योगेश चंद्रे, गटविकास अधिकारी सावित्री खर्डे व इतर विभाग प्रमुखही उपस्थित होते. तथापि काही विभागप्रमुख आणि कर्मचारी बैठकीस गैरहजर राहिल्यामुळे त्यांच्याकडील कामाचा आढावा यापुढील आराखडय़ाबाबत आढावा समजू शकला नाही. या वेळी आमदार पाडवी यांनी अशा कामचुकार कर्मचा:यांबाबत तीव्र नाराजी व्यक्तकेली. टंचाईबाबत पुन्हा नवीन बैठक घेण्याची सूचना प्रशासनास दिली. त्यामुळे पुढील आठवडय़ात 26 ऑक्टोबर 2018 रोजी पुन्हा मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतच बैठक आयोजित करण्यात आली असल्याचे सूत्रांनी सांगितले. वास्तविक कमी पजर्न्यमानामुळे ग्रामीण भागातील जनतेच्या पाणीटंचाईचा प्रश्न भविष्यात अधिक उग्रस्वरूप घेण्याची शक्यता असतांना यावर ठोस कार्यवाही होणे अपेक्षित आहे. परंतु काही बेजबाबदार अधिकारी, कर्मचारी सर्रास दांडी मारीत असतांना अशा कामचुकार नोकरशाहीस प्रशासनाने धडा शिकविण्यासाठी कारवाई करण्याची मागणी जनतेमधून केली जात आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनानेही गांभीर्याने दखल घेण्याची अपेक्षा आहे.दरम्यान या वेळी काही गावांमध्ये संभाव्य पाणीटंचाईबाबत आढावा घेण्यात आला. तालुक्यातील 20 गावांमध्ये आदिवासी उपयोजनेंतर्गत 2018-2019 मध्ये हातपंप मंजूर झाले असल्याचे पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले. त्यामुळे या हातपंपासाठी संबंधितांनी तातडीने कार्यवाही करून कामे हाती घेण्याची सूचनाही आमदार पाडवी यांनी दिली.बैठकीस ग्रामीण भागातील काही सरपंचही अनुपस्थित होते. पुढील बैठकीस तरी त्यांनी उपस्थित राहून आपल्या गावातील पाणीटंचाईबाबत मुद्दा उपस्थित करावा, अशी ग्रामीण जनतेची मागणी आहे.