शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
3
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
4
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
5
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
6
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
7
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
8
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
9
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
10
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
11
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
12
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
13
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
14
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
15
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
16
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
17
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
18
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
19
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
20
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?

ओबीसी मंत्रालयामुळे प्रश्न सुटण्यास मदत होणार - राजकुमार बडोले

By admin | Updated: January 11, 2017 23:39 IST

सरकारने ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुढील काळात लवकरच ओबीसींचे प्रश्नांना न्याय मिळेल असा विश्वास समाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी येथे व्यक्त केला.

नंदुरबार : राज्यातील ओबीसी समाजाचे प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित असून हे प्रश्न सोडविण्यासाठीच सरकारने ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुढील काळात लवकरच ओबीसींचे प्रश्नांना न्याय मिळेल असा विश्वास व्यक्त करीत विजय चौधरी यांच्या रुपाने राज्यातील ओबीसींसाठी चांगले नेतृत्व मिळाल्याचे प्रतिपादन समाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी येथे व्यक्त केले.छत्रपती शिवाजी महाराज नाटय़मंदिरात विजय चौधरी यांचा सुवर्ण महोत्सवी वाढदिवसानिमित्त विजयपथ या गौरविकेचे प्रकाशन मंत्री बडोले यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर खासदार डॉ.हीना गावीत, भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार डॉ.संजय कुटे, हिरालाल मगनलाल चौधरी, माजी नगराध्यक्षा इंदुताई चौधरी, धुळे जिल्हा भाजपा अध्यक्ष बबन चौधरी, आमदार शिरीष चौधरी, धुळ्याच्या माजी महापौर जयo्री अहिरराव, डॉ. रवींद्र चौधरी, अरविंद कुवर, प्रकाश माळी, मनीषा चौधरी, नगरसेविका अनिता चौधरी, वैशाली विजय चौधरी उपस्थित होते.यावेळी बडोले यांनी सांगितले, अनेक वर्षा पासून ओबीसी प्रवर्गाची स्वतंत्र मंत्रालयाची मागणी होती. त्यानुसार तत्कालीन शासनाने 1999 मध्ये यावर विचार केला परंतु तो निर्णय मागे राहिला. भाजप शासनाने यावर विचार करून स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ओबीसी प्रवर्गातील 350 जातींना याचा लाभ होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले.ओबीसी समाजाला चांगले व्यक्तिमत्व लाभले आहे. ते समाजाला उन्नतीकडे नेण्याचा प्रय} करत असल्याचे गौरवोद्गारही बडोले यांनी काढले. खासदार डॉ. हीना गावीत यांनी सांगितले, शहरात प्रस्थापित राजकारणी लोकांसमोर कोणी उभे रहात नव्हते, परंतु  आमदार डॉ. विजयकुमार गावीत यांच्या संघर्षमयी जीवनात नेहमी विजय चौधरी उभे राहिले आहेत. भविष्यात देशात ओबीसी नेतृत्वाच्या रूपाने राष्ट्रीय अध्यक्ष बनावेत अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.आमदार संजय कुटे यांनीही विजय चौधरी यांच्या कार्याचा गौरव केला. आमदार शिरीष चौधरी, पुरूषोत्तम काळे, o्रावण चव्हाण, नाना महाले, प्रशांत पाटील,  वैष्णवी चौधरी यांनीही मनोगत व्यक्त केली.विजय चौधरी यांनी सांगितले, कार्यकर्ते हेच माङो बळ आहे. रणझुंझार समितीच्या माध्यमातून काम केले, लोकांचे प्रश्न सोडविले, प्रस्थापितांविरुद्ध लढलो. प्रामाणिक हेतू, त्याला तडीस नेण्याची धमक असेल तर कोणी पराभूत करू शकत नसल्याचेही त्यांनी सांगितले. ओबीसींना क्रिमिलेअरची अट शिथिल करावी अथवा आठ लाख रुपयाची अट करावी, अशी मागणी विजय चौधरी यांनी केली. प्रस्ताविक रूपेश यांनी केले. सूत्रसंचालन पाटकर आणि विष्णु जोंधळे यांनी केले.      ओबीसी मोर्चा पदाधिका:यांचा राज्यस्तरीय मेळावासकाळी राज्यभरातील ओबीसी मोर्चाच्या पदाधिका:यांचा मेळावा घेण्यात आला. प्रत्येक जिल्ह्यातून दोन प्रतिनिधी या मेळाव्याला उपस्थित होते. त्यांच्या कार्याचा आढावा यावेळी घेण्यात आला. त्यांना मार्गदर्शन करताना राजकुमार बडोले व आमदार संजय कुटे यांनी मार्गदर्शन केले. प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी यांनी देखील पदाधिका:यांना अधीक जोमाने कामाला लागण्याचे आवाहन केले. आणखी एक राज्यस्तरीय दौरा आयोजित करण्यात येणार असून पदाधिका:यांनी आपापल्या जिल्ह्यातील ओबीसी मोर्चाची कार्यकारिणी अधीक क्रियाशिल करण्याचे आवाहन त्यांनी केले.