शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
2
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
3
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
4
"मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
5
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
6
Dental Care: टार्टर आणि प्लाक दातांचे मुख्य शत्रू, करू शकतात गंभीर नुकसान; वेळीच घ्या 'ही' काळजी 
7
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
8
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
9
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
10
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
11
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
12
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
13
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर
14
Crime: चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय कामगाराला मारहाण; पाय चाटण्यास भाग पाडले!
15
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
16
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
17
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
18
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
19
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
20
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?

ओबीसी मंत्रालयामुळे प्रश्न सुटण्यास मदत होणार - राजकुमार बडोले

By admin | Updated: January 11, 2017 23:39 IST

सरकारने ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुढील काळात लवकरच ओबीसींचे प्रश्नांना न्याय मिळेल असा विश्वास समाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी येथे व्यक्त केला.

नंदुरबार : राज्यातील ओबीसी समाजाचे प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित असून हे प्रश्न सोडविण्यासाठीच सरकारने ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुढील काळात लवकरच ओबीसींचे प्रश्नांना न्याय मिळेल असा विश्वास व्यक्त करीत विजय चौधरी यांच्या रुपाने राज्यातील ओबीसींसाठी चांगले नेतृत्व मिळाल्याचे प्रतिपादन समाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी येथे व्यक्त केले.छत्रपती शिवाजी महाराज नाटय़मंदिरात विजय चौधरी यांचा सुवर्ण महोत्सवी वाढदिवसानिमित्त विजयपथ या गौरविकेचे प्रकाशन मंत्री बडोले यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर खासदार डॉ.हीना गावीत, भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार डॉ.संजय कुटे, हिरालाल मगनलाल चौधरी, माजी नगराध्यक्षा इंदुताई चौधरी, धुळे जिल्हा भाजपा अध्यक्ष बबन चौधरी, आमदार शिरीष चौधरी, धुळ्याच्या माजी महापौर जयo्री अहिरराव, डॉ. रवींद्र चौधरी, अरविंद कुवर, प्रकाश माळी, मनीषा चौधरी, नगरसेविका अनिता चौधरी, वैशाली विजय चौधरी उपस्थित होते.यावेळी बडोले यांनी सांगितले, अनेक वर्षा पासून ओबीसी प्रवर्गाची स्वतंत्र मंत्रालयाची मागणी होती. त्यानुसार तत्कालीन शासनाने 1999 मध्ये यावर विचार केला परंतु तो निर्णय मागे राहिला. भाजप शासनाने यावर विचार करून स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ओबीसी प्रवर्गातील 350 जातींना याचा लाभ होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले.ओबीसी समाजाला चांगले व्यक्तिमत्व लाभले आहे. ते समाजाला उन्नतीकडे नेण्याचा प्रय} करत असल्याचे गौरवोद्गारही बडोले यांनी काढले. खासदार डॉ. हीना गावीत यांनी सांगितले, शहरात प्रस्थापित राजकारणी लोकांसमोर कोणी उभे रहात नव्हते, परंतु  आमदार डॉ. विजयकुमार गावीत यांच्या संघर्षमयी जीवनात नेहमी विजय चौधरी उभे राहिले आहेत. भविष्यात देशात ओबीसी नेतृत्वाच्या रूपाने राष्ट्रीय अध्यक्ष बनावेत अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.आमदार संजय कुटे यांनीही विजय चौधरी यांच्या कार्याचा गौरव केला. आमदार शिरीष चौधरी, पुरूषोत्तम काळे, o्रावण चव्हाण, नाना महाले, प्रशांत पाटील,  वैष्णवी चौधरी यांनीही मनोगत व्यक्त केली.विजय चौधरी यांनी सांगितले, कार्यकर्ते हेच माङो बळ आहे. रणझुंझार समितीच्या माध्यमातून काम केले, लोकांचे प्रश्न सोडविले, प्रस्थापितांविरुद्ध लढलो. प्रामाणिक हेतू, त्याला तडीस नेण्याची धमक असेल तर कोणी पराभूत करू शकत नसल्याचेही त्यांनी सांगितले. ओबीसींना क्रिमिलेअरची अट शिथिल करावी अथवा आठ लाख रुपयाची अट करावी, अशी मागणी विजय चौधरी यांनी केली. प्रस्ताविक रूपेश यांनी केले. सूत्रसंचालन पाटकर आणि विष्णु जोंधळे यांनी केले.      ओबीसी मोर्चा पदाधिका:यांचा राज्यस्तरीय मेळावासकाळी राज्यभरातील ओबीसी मोर्चाच्या पदाधिका:यांचा मेळावा घेण्यात आला. प्रत्येक जिल्ह्यातून दोन प्रतिनिधी या मेळाव्याला उपस्थित होते. त्यांच्या कार्याचा आढावा यावेळी घेण्यात आला. त्यांना मार्गदर्शन करताना राजकुमार बडोले व आमदार संजय कुटे यांनी मार्गदर्शन केले. प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी यांनी देखील पदाधिका:यांना अधीक जोमाने कामाला लागण्याचे आवाहन केले. आणखी एक राज्यस्तरीय दौरा आयोजित करण्यात येणार असून पदाधिका:यांनी आपापल्या जिल्ह्यातील ओबीसी मोर्चाची कार्यकारिणी अधीक क्रियाशिल करण्याचे आवाहन त्यांनी केले.