शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
2
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
3
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
4
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
5
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
6
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
7
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
8
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
9
"त्यांनी माझे गाल ओढले, दंडाला चिमटे काढले...", हळदीकुंकूच्या कार्यक्रमाला गेलेल्या प्रिया बेर्डेंना चाहत्यांकडून आलेला धक्कादायक अनुभव
10
क्रिकेटरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी दिसणार सलमान खानच्या 'बिग बॉस १९'मध्ये?, जाणून घ्या याबद्दल
11
"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम
12
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
13
जन्माष्टमी २०२५: ‘या’ राशींवर श्रीकृष्ण कृपा, पैसे कमी पडत नाहीत; सुबत्ता-वैभव-भरभराट लाभते!
14
राजा रघुवंशीच्या घरी अचानक पोहोचला पोलिसांच्या वेशातील व्यक्ती; कुटुंबाला आला संशय, तपास करताच धक्कादायक सत्य उघड
15
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
16
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
17
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
18
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
19
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
20
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ

नंदुरबारातील मानसिक रुग्णांची संख्या चिंताजनक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 13:01 IST

पाच वर्षाचा वाढता आलेख : धकाधकीच्या जीवनशैलीत काळजी घेणे गरजेचे

संतोष सूर्यवंशी । लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 19 : नंदुरबार जिल्ह्यात सध्या मानसिक आरोग्याची समस्या भेडसावू लागली आह़े जिल्ह्यात गेल्या पाच वर्षाचा आलेख पाहिला असता मानसिक आजारांवर उपचार घेणा:या रुग्णांची संख्या वाढत जात आहेत़ मार्च 2018 र्पयतच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात  3 हजार 991 मनोरुग्णांची संख्या असल्याचे समजत़े रोजचे धकाधकीचे जीवन, बदलती जीवनशैली आदी कारणांमुळे मानसिक आरोग्य धोक्यात येणाचा संभव असतो़ याचाच परिणाम म्हणून की काय जिल्ह्यात मानसिक आजारांवर उपचार घेणा:या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आह़े ‘लोकमत’तर्फे 2013 पासून जिल्ह्यातील मनोरुग्णांच्या संख्येचा आढावा घेण्यात आला़ मनोरुग्णांची संख्या मोजण्यासाठी साधारणत 4 विभाग करण्यात येत असतात़ आंतररुग्ण विभाग, बाह्यरुग्ण विभाग, नवीन रुग्ण व आधीपासून उपचार घेत असलेले रुग्ण अशी विभागणी करण्यात येत असत़े त्यानुसार 2013 मध्ये 212 रुग्ण, 2014 मध्ये 423 रुग्ण, 2015 मध्ये 1 हजार 660 रुग्ण, 2016 मध्ये 2 हजार 637, 2017 मध्ये 2 हजार 588 तर 2018 मध्ये मार्च महिन्यार्पयत तब्बल 3 हजार 991 रुग्णांची नोंद नंदुरबार येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात करण्यात आली आह़े दिवसेंदिवस जिल्ह्यात मानसिक आरोग्याच्या दृष्टीने चिंता वाटावी अशी आकडेवारी समोर येत आह़े त्यामुळे नागरिकांनी ताण-तणावमुक्त जीवनशैली ठेवावी असा सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात येत आह़े मानसिक तणावामुळे अनेक वेळा रुग्ण आत्महत्यासारखे पर्याय निवडत असतो़ त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णातील मानसिक आरोग्य विभागामार्फत जिल्ह्यात शिबीरे घेऊन दुर्गम भागातील ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करण्यात येत आह़े त्याचा फायदा म्हणून आंतररुग्ण विभागाच्या तुलनेत बाह्यरुग्ण विभागात मोठय़ा संख्येने रुग्णांची नोंद करण्यात येत असत़े  अनेक नागरिकांना मानसिक आजारांची लक्षणे असूनही त्यांना याबाबत समजून येत नसत़े छिन्नमनस्कता, उदासिनता, अतिउत्साह, चिंतेचे विकार, व्यसनाधिनता, मिरगीचा आजार, स्मृतिभं्रश, झोपेचे विकार आदी मानसिक आजारांची लक्षणे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत असतात़ त्यामुळे अशा स्थितीत मानसिक आजार असूनही काही वेळा रुग्ण सामान्य जीवन जगत असतो़ परंतु कालांतराने त्याच्या वागण्यात मोठय़ा प्रमाणात बदल घडून येत असतात़ व हळुहळु लक्षणांमध्ये वाढ होत असत़े जीवनशैलीत बदल करावेअनेक वेळा मानसिक आजाराला कारण ठराविक जीवशैलीदेखील ठरत असत़े कुणाशी न बोलणे, एकांतात राहणे पसंत करणे, इच्छा असूनही एखादी गोष्ट करण्यास कंटाळा करणे आदी जीवनशैलीमुळे मानसिक आजार जडण्याची शक्यता असत़े त्यामुळे सकारात्मक विचारसरणी ठेवल्यास येऊ घातलेल्या मानसिक आजाराला दूर सारता येणे शक्य असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आह़े आदिवासी जिल्हा असल्याने दुर्गम भागात अनेक मानसिक आजारांनी ग्रस्त असलेले रुग्ण आढळून येत असतात़ त्यामुळे दुर्गम तसेच अतिदुर्गम भागात मानसिक आरोग्य सेवेला अत्यंत महत्व निर्माण झाले आहेत़ मानसिक आरोग्य स्वस्त रहावे यासाठी शासनाकडूनही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असत़े