शहरं
Join us  
Trending Stories
1
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
3
IND vs SA Women's World Cup 2025 Final Live Streaming: फायनलमध्ये 'ही' गोष्ट ठरेल भारतासाठी जमेची बाजू
4
"वर्गात एक विद्यार्थी असेल तरी मराठीची तुकडी चालली पाहिजे", विश्वास पाटील यांची स्पष्ट भूमिका
5
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
6
IND vs AUS 3rd T20I Live Streaming : हा सामना जिंका नाहीतर मालिका विसरा! टीम इंडियाकडे शेवटची संधी
7
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
8
निर्भिड आणि बेधडक पत्रकारितेची आज गरज; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मत
9
Pune Crime: नाशिकच्या तरुणीवर हिंजवडीत कोयत्याने हल्ला! प्रेमप्रकरणातून तरुणाने केला जीव घेण्याचा प्रयत्न
10
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
11
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
12
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
13
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
14
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
15
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
16
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
17
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
18
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
19
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
20
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?

नंदुरबारातील मानसिक रुग्णांची संख्या चिंताजनक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 13:01 IST

पाच वर्षाचा वाढता आलेख : धकाधकीच्या जीवनशैलीत काळजी घेणे गरजेचे

संतोष सूर्यवंशी । लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 19 : नंदुरबार जिल्ह्यात सध्या मानसिक आरोग्याची समस्या भेडसावू लागली आह़े जिल्ह्यात गेल्या पाच वर्षाचा आलेख पाहिला असता मानसिक आजारांवर उपचार घेणा:या रुग्णांची संख्या वाढत जात आहेत़ मार्च 2018 र्पयतच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात  3 हजार 991 मनोरुग्णांची संख्या असल्याचे समजत़े रोजचे धकाधकीचे जीवन, बदलती जीवनशैली आदी कारणांमुळे मानसिक आरोग्य धोक्यात येणाचा संभव असतो़ याचाच परिणाम म्हणून की काय जिल्ह्यात मानसिक आजारांवर उपचार घेणा:या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आह़े ‘लोकमत’तर्फे 2013 पासून जिल्ह्यातील मनोरुग्णांच्या संख्येचा आढावा घेण्यात आला़ मनोरुग्णांची संख्या मोजण्यासाठी साधारणत 4 विभाग करण्यात येत असतात़ आंतररुग्ण विभाग, बाह्यरुग्ण विभाग, नवीन रुग्ण व आधीपासून उपचार घेत असलेले रुग्ण अशी विभागणी करण्यात येत असत़े त्यानुसार 2013 मध्ये 212 रुग्ण, 2014 मध्ये 423 रुग्ण, 2015 मध्ये 1 हजार 660 रुग्ण, 2016 मध्ये 2 हजार 637, 2017 मध्ये 2 हजार 588 तर 2018 मध्ये मार्च महिन्यार्पयत तब्बल 3 हजार 991 रुग्णांची नोंद नंदुरबार येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात करण्यात आली आह़े दिवसेंदिवस जिल्ह्यात मानसिक आरोग्याच्या दृष्टीने चिंता वाटावी अशी आकडेवारी समोर येत आह़े त्यामुळे नागरिकांनी ताण-तणावमुक्त जीवनशैली ठेवावी असा सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात येत आह़े मानसिक तणावामुळे अनेक वेळा रुग्ण आत्महत्यासारखे पर्याय निवडत असतो़ त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णातील मानसिक आरोग्य विभागामार्फत जिल्ह्यात शिबीरे घेऊन दुर्गम भागातील ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करण्यात येत आह़े त्याचा फायदा म्हणून आंतररुग्ण विभागाच्या तुलनेत बाह्यरुग्ण विभागात मोठय़ा संख्येने रुग्णांची नोंद करण्यात येत असत़े  अनेक नागरिकांना मानसिक आजारांची लक्षणे असूनही त्यांना याबाबत समजून येत नसत़े छिन्नमनस्कता, उदासिनता, अतिउत्साह, चिंतेचे विकार, व्यसनाधिनता, मिरगीचा आजार, स्मृतिभं्रश, झोपेचे विकार आदी मानसिक आजारांची लक्षणे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत असतात़ त्यामुळे अशा स्थितीत मानसिक आजार असूनही काही वेळा रुग्ण सामान्य जीवन जगत असतो़ परंतु कालांतराने त्याच्या वागण्यात मोठय़ा प्रमाणात बदल घडून येत असतात़ व हळुहळु लक्षणांमध्ये वाढ होत असत़े जीवनशैलीत बदल करावेअनेक वेळा मानसिक आजाराला कारण ठराविक जीवशैलीदेखील ठरत असत़े कुणाशी न बोलणे, एकांतात राहणे पसंत करणे, इच्छा असूनही एखादी गोष्ट करण्यास कंटाळा करणे आदी जीवनशैलीमुळे मानसिक आजार जडण्याची शक्यता असत़े त्यामुळे सकारात्मक विचारसरणी ठेवल्यास येऊ घातलेल्या मानसिक आजाराला दूर सारता येणे शक्य असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आह़े आदिवासी जिल्हा असल्याने दुर्गम भागात अनेक मानसिक आजारांनी ग्रस्त असलेले रुग्ण आढळून येत असतात़ त्यामुळे दुर्गम तसेच अतिदुर्गम भागात मानसिक आरोग्य सेवेला अत्यंत महत्व निर्माण झाले आहेत़ मानसिक आरोग्य स्वस्त रहावे यासाठी शासनाकडूनही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असत़े