शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट: श्रेयस अय्यर ड्रेसिंग रुममध्येच बेशुद्ध पडलेला; वैद्यकीय पथकाने लागलीच धोका ओळखला, नाहीतर...
2
"तेच रडणे, तीच मळमळ, त्याच उलट्या, त्याच फुशारक्या...", भाजपाने उद्धव ठाकरेंना डिवचलं
3
पेटीएम, जीपे, फोनपेवरील ऑटो पे कसे बंद कराल? आपोआप जातायत सबस्क्रीप्शन, पेमेंटचे पैसे... 
4
Aadhaar Card New Rules 1st Nov: महत्त्वाची बातमी! १ नोव्हेंबरपासून बदलणार आधार कार्डाशी निगडीत ३ मोठे नियम, जाणून घ्या
5
वनप्लस १५ येतोय...! पण १४ क्रमांक का वगळला? चिनी संस्कृतीत असे काय आहे...
6
Bank Holidays November 2025: नोव्हेंबरमध्ये किती दिवस बँका राहणार बंद? पाहा RBI ची हॉलिडे लिस्ट, पटापट आटपा काम
7
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
8
शंकर महाराज प्रकट दिन: म्हणा अकरा कवनांचे स्तोत्र, विजयी होईल सर्वत्र; कामना होतील पूर्ण
9
Tulasi Vivah 2025: विष्णू हे लक्ष्मीपती असूनही दरवर्षी तुळशीशी का लावला जातो विवाह?
10
LIC ची ‘ही’ स्कीम गुंतवणूकदारांना बनवेल कोट्यधीश!; ४ वर्षापर्यंत भरा प्रीमिअम, मिळतील १ कोटी
11
१०० वर्षांनी महालक्ष्मीसह ४ राजयोग: ७ राशींना सुबत्ता, कल्याण; बक्कळ लाभ, यशाचा मंगलमय काळ!
12
"मी तुला कच्च खाऊन टाकेन"; बायकोने नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडलं, चपलेने धू-धू धुतलं
13
आजचे राशीभविष्य, २८ ऑक्टोबर २०२५: ‘मौनं सर्वार्थ साधनम्’, येणी वसूल होतील; सरकारी लाभ
14
तेव्हा गरजेपेक्षा जास्त कर्मचारी भरले, आता त्यांना बेरोजगार करणार; ॲमेझॉनमध्ये ३०,००० नोकऱ्या धोक्यात
15
चिनी हँडलर, टेलिग्राम ट्रॅप, लाखोंची लूट... ४७ लाखांच्या फसवणुकीचा पर्दाफाश, तिघांना अटक
16
तुमचे अधिकारी वृत्तपत्र वाचत नाहीत का? देशाची प्रतिमा मलिन होतेय; भटक्या कुत्र्यांवरून भडकले कोर्ट
17
Shani Gochar 2025: शनिचा फेरा आपल्या राशीसाठी नेहमीच तापदायक ठरतो का? पाहूया भावानुसार फळ
18
१२ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; SIR दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून, महाराष्ट्राचा समावेश नाही
19
मतदाराचे आणि त्याच्या वडिलाचे आडनाव वेगवेगळे, २० हजार मतदारांची नावे संशयास्पद: आदित्य ठाकरे
20
शाळेची नव्हे, धोक्याची घंटा! सरकारी अनास्था आणि 'विनाअनुदानित' इंग्रजी शाळांचा वाढता बाजार

गावेच ठरवतील आता कामांचा आराखडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 12:09 IST

जलयुक्तची जिल्हास्तरीय कार्यशाळा : पालकमंत्र्यांची माहिती, पोपटराव पवार यांचेही मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात येत्या काळात जलयुक्त शिवार योजनेची कामे अधिक प्रभावीपणे राबवायाची असल्यामुळे गाव पातळीवरील सरपंच, ग्रामसेवक, गावकरी यांनी यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा. यंदा जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत दुप्पट भाग सिंचनाखाली आणण्याचा संकल्प करावा असे आवाहन पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले. नंदुरबारात सोमवारी, जिल्हास्तरीय जलयुक्त शिवार अभियान कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेचे उद्घाटन पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार डॉ.विजयकुमार गावीत, आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार उदेसिंग पाडवी, आदर्शगाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास नाईक, नगराध्यक्ष मोतिलाल पाटील, जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी.एम.मोहन, मृद संधारण विभागाचे संचालक कैलास मोते, विभागीय कृषी संचालक सुभाष नागरे, भुजल सव्र्हेक्षण विभागाचे शास्त्रज्ञ वाघमारे, रोहयो उपायुक्त जेजूरकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रमेश शिंदे आदी उपस्थित होते.पालकमंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले, जलयुक्त शिवार योजनेची कामे सुरू करतांना अगोदर जुने बंधारे, धरणे, नाले यांच्या दुरूस्तीच्या कामांना प्राधान्य देण्यात यावे. या कामांसाठी येत्या काळात जिल्हा वार्षिक योजनेतून जिल्ह्यातील कामांसाठी दोन पोकलॅण्ड मशीन खरेदी करण्यात येणार आहेत. समृद्धी जनकल्याण योजनेला महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात प्रतिसाद मिळाला असून येणा:या काळात राज्यात सव्वा लाख विहिरी या योजनेतून पुर्ण करण्याचा संकल्प शासनाने केला आहे. या विहिरी पुर्ण झाल्यास जवळपास सहा लाख हेक्टर बागायतीकरण होईल. यावर्षी जिल्ह्यात एक लाख हेक्टरवर फळबाग लागवड करावयाची असून या माध्यमातून जिल्ह्यात रोजगार उपलब्ध होईल. मागेल त्याला शेततळे या योजनेत नवापूर तालुक्यात चांगली कामे झाल्याचे त्यांनी सांगितले. आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांनी सांगितले, पावसाचे पडणारे पाणी आपल्या शिवाराच्या बाहेर जाणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन केले.पोपटराव पवार यांनी कार्यक्रमाचा मुख्य उद्देश सांगितला. गावांना स्वयंपुर्ण, दुष्काळमुक्त करावयाचा असून शासनाच्या विविध कामांमध्ये गावक:यांचा पुढाकार हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. शासनाच्या योजना चांगल्या प्रकारे राबविण्यात येतात. गावात येणा:या शासकीय योजना म्हणजे गावांचा विकास करण्याच्या संधी असतात. त्या संधीचा फायदा गावक:यांनी घ्यावा. पाण्याची मर्यादा ओळखून पिकांचे व्यवस्थापन करावे. शासनाकडून निधी मिळेल पण काम करण्याची जबाबदारी ही गावातील सर्व शेतक:यांची आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीने शासनाच्या योजना राबविण्यासाठी पुढाकार घ्यावा यासाठी सरपंचांनी नेहमीच जागृत राहणे आवश्यक असल्याचेही पवार यांनी सांगितले.जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी  यांनी प्रास्ताविकात जिल्ह्यातील प्रत्येक गाव हिवरे बाजार झाले पाहिजे  यासाठी प्रय} करावा. जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजना यशस्वीपणे राबविली जात आहे. यावर्षी गाव पातळीवर आराखडा तयार करण्यात येणार असून त्यासाठी गाव पातळीवरील प्रतिनिधी, शेतकरी  यांनी पुढाकार घ्यावा असेही आवाहन त्यांनी दिले. यावेळी जलसाक्षरतेची प्रतिज्ञा देण्यात आली.