शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
3
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
4
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
5
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
6
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
7
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
8
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
9
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
10
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
11
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
12
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
13
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
14
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
15
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
16
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
17
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
18
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
19
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
20
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण

गावेच ठरवतील आता कामांचा आराखडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 12:09 IST

जलयुक्तची जिल्हास्तरीय कार्यशाळा : पालकमंत्र्यांची माहिती, पोपटराव पवार यांचेही मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात येत्या काळात जलयुक्त शिवार योजनेची कामे अधिक प्रभावीपणे राबवायाची असल्यामुळे गाव पातळीवरील सरपंच, ग्रामसेवक, गावकरी यांनी यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा. यंदा जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत दुप्पट भाग सिंचनाखाली आणण्याचा संकल्प करावा असे आवाहन पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले. नंदुरबारात सोमवारी, जिल्हास्तरीय जलयुक्त शिवार अभियान कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेचे उद्घाटन पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार डॉ.विजयकुमार गावीत, आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार उदेसिंग पाडवी, आदर्शगाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास नाईक, नगराध्यक्ष मोतिलाल पाटील, जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी.एम.मोहन, मृद संधारण विभागाचे संचालक कैलास मोते, विभागीय कृषी संचालक सुभाष नागरे, भुजल सव्र्हेक्षण विभागाचे शास्त्रज्ञ वाघमारे, रोहयो उपायुक्त जेजूरकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रमेश शिंदे आदी उपस्थित होते.पालकमंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले, जलयुक्त शिवार योजनेची कामे सुरू करतांना अगोदर जुने बंधारे, धरणे, नाले यांच्या दुरूस्तीच्या कामांना प्राधान्य देण्यात यावे. या कामांसाठी येत्या काळात जिल्हा वार्षिक योजनेतून जिल्ह्यातील कामांसाठी दोन पोकलॅण्ड मशीन खरेदी करण्यात येणार आहेत. समृद्धी जनकल्याण योजनेला महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात प्रतिसाद मिळाला असून येणा:या काळात राज्यात सव्वा लाख विहिरी या योजनेतून पुर्ण करण्याचा संकल्प शासनाने केला आहे. या विहिरी पुर्ण झाल्यास जवळपास सहा लाख हेक्टर बागायतीकरण होईल. यावर्षी जिल्ह्यात एक लाख हेक्टरवर फळबाग लागवड करावयाची असून या माध्यमातून जिल्ह्यात रोजगार उपलब्ध होईल. मागेल त्याला शेततळे या योजनेत नवापूर तालुक्यात चांगली कामे झाल्याचे त्यांनी सांगितले. आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांनी सांगितले, पावसाचे पडणारे पाणी आपल्या शिवाराच्या बाहेर जाणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन केले.पोपटराव पवार यांनी कार्यक्रमाचा मुख्य उद्देश सांगितला. गावांना स्वयंपुर्ण, दुष्काळमुक्त करावयाचा असून शासनाच्या विविध कामांमध्ये गावक:यांचा पुढाकार हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. शासनाच्या योजना चांगल्या प्रकारे राबविण्यात येतात. गावात येणा:या शासकीय योजना म्हणजे गावांचा विकास करण्याच्या संधी असतात. त्या संधीचा फायदा गावक:यांनी घ्यावा. पाण्याची मर्यादा ओळखून पिकांचे व्यवस्थापन करावे. शासनाकडून निधी मिळेल पण काम करण्याची जबाबदारी ही गावातील सर्व शेतक:यांची आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीने शासनाच्या योजना राबविण्यासाठी पुढाकार घ्यावा यासाठी सरपंचांनी नेहमीच जागृत राहणे आवश्यक असल्याचेही पवार यांनी सांगितले.जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी  यांनी प्रास्ताविकात जिल्ह्यातील प्रत्येक गाव हिवरे बाजार झाले पाहिजे  यासाठी प्रय} करावा. जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजना यशस्वीपणे राबविली जात आहे. यावर्षी गाव पातळीवर आराखडा तयार करण्यात येणार असून त्यासाठी गाव पातळीवरील प्रतिनिधी, शेतकरी  यांनी पुढाकार घ्यावा असेही आवाहन त्यांनी दिले. यावेळी जलसाक्षरतेची प्रतिज्ञा देण्यात आली.