शहरं
Join us  
Trending Stories
1
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
2
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
3
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
4
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
5
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
6
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
7
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
9
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
10
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
11
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
12
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
13
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
14
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
15
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
16
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
17
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
18
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
19
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
20
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला

पुर ओसरल्यानंतर आता आरोग्याचा प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 12:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : पावसामुळे शहरात ठिकठिकाणी मोठ-मोठे डबके साचले असल्यामुळे डासांचाही प्रचंड प्रादुर्भाव वाढला आहे. परिणामी साथींचा ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : पावसामुळे शहरात ठिकठिकाणी मोठ-मोठे डबके साचले असल्यामुळे डासांचाही प्रचंड प्रादुर्भाव वाढला आहे. परिणामी साथींचा रुग्णांमध्येदेखील वाढ झाली आहे. सरकारी बरोबरच खाजगी दवाखाने अशा रुग्णांनी हाऊस फूल होत असल्याचे चित्र आहे. संबंधीत आरोग्य विभाग व पालिका प्रशासनाने यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.गेल्या 15 दिवसांपासून शहराबरोबरच संपूर्ण तालुक्यात पाऊस सुरू आहे. त्यामुळे शहरात सर्वच भागात ठिकठिकाणी मोठ-मोठे डबके साचले आहेत. परिणामी डासांचीदेखील मोठय़ा प्रमाणात उत्पत्ती वाढली आहे. डासांच्या या वाढत्या प्रादुर्भावामुळे मलेरिया, टाईफाईड, थंडी, ताप, खोकला, अशा साथीच्या आजारांच्या रुग्णांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. उपचारासाठी रुग्ण दवाखान्यामध्ये दाखल होत असल्यामुळे दवाखानेही हाऊस फुल्ल झाले आहेत. काही ठिकाणी रुग्णांना बसायला जागा मिळत नसल्याने अक्षरश: दवाखान्याबाहेर रांगेत, ताटकळत उभे राहावे लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे. आधीच 15 दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल होत असल्यामुळे घरोघरी ताप, थंडी, खोकला, सर्दीचे रुग्ण असल्याचे म्हटले जात आहे. दवाखान्यात डॉक्टरांकडून एकदा उपचार घेऊन तात्पुरता दोन दिवस बरे झाल्यानंतर पुन्हा सर्दी, ताप, खोकल्याची               लागन होत असल्यामुळे शहरवासीय अक्षरश: वैतागले आहेत. साथीच्या वाढत्या रोगांमुळे कुटुंबांना             आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.वास्तविक शहरात मोठय़ा प्रमाणात थंडी, ताप, सर्दीची साथ पसरत असतांना त्यावर उपाययोजना करण्यासाठी पालिकेच्या आरोग्य विभाग व शासनाच्या आरोग्य विभागाने साफ दुर्लक्ष केल्याचा नागरिकांचा आरोप आहे. या दोन्ही यंत्रणांनी घरोघरी जावून अशा रुग्णांची रक्त तपासणी, औषधोपचार करण्याची अपेक्षा आहे. शहरात शासनाचे मोठे उपजिल्हा रुग्णालय असले तरी तेथे  वैद्यकीय अधिका:यांची संख्या कमी असल्यामुळे रुग्णांना तत्काळ उपचार मिळत नाही. त्यामुळे गरीब रुग्णांना नाईलाजास्तव बाहेरील खाजगी दवाखान्याचा आधार घ्यावा लागत असून, यात आर्थिक फटका बसत असल्याची व्यथा काही नातेवाईकांनी बोलून दाखविली. संबंधीत यंत्रणांच्या वरिष्ठ प्रशासनाने दखल घेऊन उपाययोजना करण्याबाबत संबंधीतांना  सक्त ताकीद द्यावी, अशी मागणी आहे.

शहरातील डासांचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी येथील नगरपालिकेने गेल्या दोन वर्षापूर्वी दोन-अडीच लाखांचे धुरळणी यंत्र खरेदी केले आहे. मात्र त्याचा वापर होण्या ऐवजी ते अक्षरश: धुळखात पडल्याचे नागरिक सांगतात. वास्तविक शहरात बहुतेक ठिकाणी पावसाच्या पाण्यामुळे मोठ-मोठे डबके साचले आहेत. पालिका हद्दीतील सर्वच नवीन वसाहतींमध्ये तर गटारी व पक्के रस्त्यांअभावी अक्षरश: तलावच भरले आहेत. त्यामुळे तेथे दरुगधी पसरली आहेच. परंतु डासांची उत्पत्तीदेखील वाढली आहे. या पाश्र्वभूमिवर पालिकेकडून धुरळणीची मोहीम राबविणे गरजेचे आ9ह. मात्र या कडे खुद्द पालिकेच्या प्रशासनाबरोबर पदाधिका:यांनीही साफ दुर्लक्ष केल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे.