शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
3
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला
4
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
5
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
6
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
7
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
8
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारच्या आगामी सिनेमाची घोषणा, 'ही' अभिनेत्री साकारणार आईची भूमिका
9
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी
10
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
11
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
12
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
13
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
14
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
15
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
16
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
17
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
18
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
19
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
20
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...

आता आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागाचे स्वप्न-अभय गुरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2020 11:50 IST

जिल्ह्यातील युवकांना क्रिडा क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी मोठा वाव आहे. प्रशासनानेही सुविधा उपलब्ध करून देणे अपेक्षीत आहे. - अभय गुरव

लोकमत न्यूज नेटवर्कजिद्द आणि परिश्रमाच्या जोरावर कुणीही यश मिळवू शकतो. फक्त योग्य मार्गदर्शनाची गरज असल्याचे प्रतिपादन खेलो इंडिया स्पर्धेत उंच उडीत सुवर्णपदक मिळविलेल्या अभय गुरव याने व्यक्त केले....उंचउडी खेळाकडे कसा वळला?खेळाविषयी आपल्याला लहानपणापासून आवड होती. गावात खेळतांना किंवा शेतात जातांना सहज सराव म्हणून खेळत राहिलो आणि या खेळाकडे आकर्षीलो गेलो. महाविद्यालयीन शिक्षणाच्या वेळी खरे मार्गदर्शन मिळाले आणि यश मिळवित गेलो.खेळातील तांत्रिक बाबींचे मार्गदर्शन कुठून घेतले?शालेय जीवनात खेळतांना कुणीही मार्गदर्शन केले नाही. युट्यूबच्या माध्यमातून खेळातील काही बाबी जाणून घेतल्या. महाविद्यालयीन शिक्षण घेतांना यशवंत विद्यालयातील क्रिडा मार्गदर्शक डॉ.मयूर ठाकरे यांनी खेळातील अनेक बारकावे शिकविले. खेळण्यासाठी सोय करून दिली. आवश्यक साहित्य खरेदीसाठी प्रोत्साहन दिले. त्यानंतर आपण खऱ्या अर्थाने खेळाच्या ट्रॅकवर आलो.यापुढे काय नियोजन आहे?आर्मी पोस्टमध्ये आपली निवड झाली आहे. आता आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागाचे स्वप्न आहे.

खेलो इंडियासारख्या राष्ट्रीय स्पर्धेतील अनुभव फारच वेगळा होता. यामुळे आता आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळासाठीचे बारकावे माहित झाले आहे. आपण घेतलेली मेहनतीमुळे या स्पर्धेत आपण पदक पटकवूच ही अपेक्षा होती. परंतु थेट सुवर्णपदकावर पोहचलो.

परिश्रम हवेच...खेळात परिश्रम, जिद्द याशिवाय पर्याय नाही. जास्तीत जास्त सराव करणे आणि खेळातील बारकावे शिकणे आवश्यक आहे. युवकांनी आपल्या आवडीच्या खेळात पारंगत होऊन योग्य मार्गदर्शकाच्या हाताखाली मेहनत व सराव केल्यास यश नक्कीच मिळेल.