शहरं
Join us  
Trending Stories
1
गोंधळात गोंधळ: ससूनमधील गैरप्रकाराच्या चौकशीसाठी SIT, मात्र अध्यक्षावरच आहेत भ्रष्टाचाराचे आरोप!
2
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
3
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
4
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
5
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
6
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
7
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
8
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
9
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
10
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
11
विरोधक पुन्हा एकवटणार, 1 जून रोजी INDIA आघाडाची दिल्लीत बैठक, जाणून घ्या कारण...
12
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
13
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
14
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा
15
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
16
रायफलने डीजे ऑपरेटरच्या छातीत मारली गोळी; मद्यपानानंतर झालेल्या भांडणात तरुणाची हत्या
17
Tata Altroz ​​Racer चा टीझर रिलीज, पुढच्या महिन्यात होणार लाँच, किती असेल किंमत?
18
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
19
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
20
अंबाती रायुडूला RCB चा माजी खेळाडू Live Show मध्ये 'Joker' म्हणाला, मयांतीने मुद्दा छेडला अन्... 

शाळेची मान्यता रद्द करण्यासंदर्भात नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 1:40 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पथराई विद्यालयातील शिक्षकांना मारहाण प्रकरणी माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी धमडार्ई, ता.नंदुरबार येथील आवडामाई शैक्षणिक व ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पथराई विद्यालयातील शिक्षकांना मारहाण प्रकरणी माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी धमडार्ई, ता.नंदुरबार येथील आवडामाई शैक्षणिक व सास्कृतिक मंडळाच्या अध्यक्ष व सचिवांना नोटीस बजावली आहे. संस्थाचालकांच्या फूसवरूनच शिक्षकांना शाळेत जावून जमावाने बेदम मारहाण केल्याची घटना गेल्या मंगळवारी घडली होती. याबाबत सर्वप्रथम ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशीत केले होते. त्यानंतरच या घटनेची वाच्यता झाली होती.शैक्षणिक वर्तूळात खळबळ उडवून देणाऱ्या या घटनेची शिक्षण विभागाने दखल घेतली असून आतातरी पोलिसात गुन्हा दाखल केला जातो की नाही याबाबत शिक्षण संस्था चालकांच्या भुमिकेकडे लक्ष लागले आहे.माध्यमिक शिक्षणाधिकारी एम.व्ही. कदम यांनी २१ फेब्रुवारी रोजी संस्थेला आणि मुख्याध्यापकांना याबाबत बजावलेल्या नोटीसीत म्हटले आहे की, आवडामाई शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ धमडाई संचलित माध्यमिक विद्यालय पथराई येथे शिक्षकांना मारहाण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मारहाण प्रकरणी शिक्षकांची कोणत्याही प्रकारची चूक नसून एका सूड भावनेने हा प्रकार घडून आल्याचे स्पष्ट होते.ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी शाळेत सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांसमोर ही घटना घडली. मुख्याध्यापकांनी घटना निदर्शनास आल्यानंतर मध्यस्थी का केली नाही. झालेला वाद हा मिटविला का नाही? याबाबत पोलिसात कुठलीही तक्रार का दिली गेली नाही? या बाबी संसयास्पद आहेत.झालेला प्रकार हा अत्यंत निंदनीय असून याबाबत जिल्ह्यात व जिल्हाबाहेर शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त करण्यात येत आहे. हा प्रकार शिक्षणासारख्या पवीत्र क्षेत्राला काळीमा फासणारा आहे. संस्थेने याबाबत कोणती कारवाई केली हे स्पष्ट करावे. या गंभीर घटनेला संस्थाचालक दोषी ठरवून शाळेची मान्यता का काढण्यात येवू नये आदी प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.संस्थेवर प्रशासक बसविण्याबाबत शिक्षण संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय यांच्याकडे शिफारस करून प्रस्ताव का सादर करण्यात येवू नये याबाबत तातडीने खुलासा करावा. समक्ष कार्यालयात येवून याबाबत स्पष्टीकरण द्यावे असेही या नोटीसीत नमुद करण्यात आले आहे.शिक्षणाधिकारी यांनी घेतलेल्या कडक भुमिकेमुळे शिक्षण क्षेत्रात समाधान व्यक्त केले जात असून यापुढे असे प्रकार घडणार नाहीत यासाठी संस्थेला व संबधितांना कठोर शिक्षा करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.दरम्यान, या घटनेचा जिल्ह्यात सर्वच स्थरातून निषेध व्यक्त केला जात आहे.४एवढी मोठी घटना घडून, त्यात चार शिक्षक जखमी होऊन देखील शाळा किंवा संस्थेतर्फे कुठलीही तक्रार करण्यात आलेली नाही, पोलिसांकडे साधा तक्रारी अर्जही दिला गेला नाही.४गुंड प्रवृत्तीचा जमाव शाळेत येतो, विद्यार्थी, शिक्षकांसमोर ठराविक शिक्षकांनाच मारहाण करतो, विद्यार्थीनी शिक्षकांची बाजू घेत असतांनाही मुख्याध्यापक किंवा अन्य कुणी मध्यस्थी करीत नाही या सर्वच गोष्टी संशायस्पद आहेत. घटना घडवून आणण्यामागचे कारण काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.