शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
3
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
4
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
5
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
6
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
7
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
8
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
9
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
10
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
11
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
12
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
13
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
16
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
17
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
18
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
19
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
20
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?

शाळेची मान्यता रद्द करण्यासंदर्भात नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 13:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पथराई विद्यालयातील शिक्षकांना मारहाण प्रकरणी माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी धमडार्ई, ता.नंदुरबार येथील आवडामाई शैक्षणिक व ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पथराई विद्यालयातील शिक्षकांना मारहाण प्रकरणी माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी धमडार्ई, ता.नंदुरबार येथील आवडामाई शैक्षणिक व सास्कृतिक मंडळाच्या अध्यक्ष व सचिवांना नोटीस बजावली आहे. संस्थाचालकांच्या फूसवरूनच शिक्षकांना शाळेत जावून जमावाने बेदम मारहाण केल्याची घटना गेल्या मंगळवारी घडली होती. याबाबत सर्वप्रथम ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशीत केले होते. त्यानंतरच या घटनेची वाच्यता झाली होती.शैक्षणिक वर्तूळात खळबळ उडवून देणाऱ्या या घटनेची शिक्षण विभागाने दखल घेतली असून आतातरी पोलिसात गुन्हा दाखल केला जातो की नाही याबाबत शिक्षण संस्था चालकांच्या भुमिकेकडे लक्ष लागले आहे.माध्यमिक शिक्षणाधिकारी एम.व्ही. कदम यांनी २१ फेब्रुवारी रोजी संस्थेला आणि मुख्याध्यापकांना याबाबत बजावलेल्या नोटीसीत म्हटले आहे की, आवडामाई शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ धमडाई संचलित माध्यमिक विद्यालय पथराई येथे शिक्षकांना मारहाण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मारहाण प्रकरणी शिक्षकांची कोणत्याही प्रकारची चूक नसून एका सूड भावनेने हा प्रकार घडून आल्याचे स्पष्ट होते.ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी शाळेत सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांसमोर ही घटना घडली. मुख्याध्यापकांनी घटना निदर्शनास आल्यानंतर मध्यस्थी का केली नाही. झालेला वाद हा मिटविला का नाही? याबाबत पोलिसात कुठलीही तक्रार का दिली गेली नाही? या बाबी संसयास्पद आहेत.झालेला प्रकार हा अत्यंत निंदनीय असून याबाबत जिल्ह्यात व जिल्हाबाहेर शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त करण्यात येत आहे. हा प्रकार शिक्षणासारख्या पवीत्र क्षेत्राला काळीमा फासणारा आहे. संस्थेने याबाबत कोणती कारवाई केली हे स्पष्ट करावे. या गंभीर घटनेला संस्थाचालक दोषी ठरवून शाळेची मान्यता का काढण्यात येवू नये आदी प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.संस्थेवर प्रशासक बसविण्याबाबत शिक्षण संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय यांच्याकडे शिफारस करून प्रस्ताव का सादर करण्यात येवू नये याबाबत तातडीने खुलासा करावा. समक्ष कार्यालयात येवून याबाबत स्पष्टीकरण द्यावे असेही या नोटीसीत नमुद करण्यात आले आहे.शिक्षणाधिकारी यांनी घेतलेल्या कडक भुमिकेमुळे शिक्षण क्षेत्रात समाधान व्यक्त केले जात असून यापुढे असे प्रकार घडणार नाहीत यासाठी संस्थेला व संबधितांना कठोर शिक्षा करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.दरम्यान, या घटनेचा जिल्ह्यात सर्वच स्थरातून निषेध व्यक्त केला जात आहे.४एवढी मोठी घटना घडून, त्यात चार शिक्षक जखमी होऊन देखील शाळा किंवा संस्थेतर्फे कुठलीही तक्रार करण्यात आलेली नाही, पोलिसांकडे साधा तक्रारी अर्जही दिला गेला नाही.४गुंड प्रवृत्तीचा जमाव शाळेत येतो, विद्यार्थी, शिक्षकांसमोर ठराविक शिक्षकांनाच मारहाण करतो, विद्यार्थीनी शिक्षकांची बाजू घेत असतांनाही मुख्याध्यापक किंवा अन्य कुणी मध्यस्थी करीत नाही या सर्वच गोष्टी संशायस्पद आहेत. घटना घडवून आणण्यामागचे कारण काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.