शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
2
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
3
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
4
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
5
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर कडेकोट बंदोबस्त; सुरक्षा यंत्रणा, प्रशासन सज्ज
6
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
7
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
8
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
9
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
10
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
11
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
12
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
13
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
14
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
15
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
16
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
17
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
18
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
19
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
20
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...

विकासासाठी मलमपट्टी नव्हे तर सजर्रीच व्हावी

By admin | Updated: April 1, 2017 16:57 IST

सातपुडय़ातील विकासाला गेल्या तीन दशकात निश्चितच गती आली आहे.

 

27 वर्षापासून विकासाचा पाठपुरावा : सातपुडाही मुख्य प्रवाहात येत असल्याचा आमदारांना विश्वासनंदुरबार : सातपुडय़ातील विकासाला गेल्या तीन दशकात निश्चितच गती आली आहे. येथील अनेक प्रश्न कायद्याच्या गुंतागुंतीत अडकल्याने त्याच्या पाठपुराव्यासाठी  अधिक वेळ द्यावा लागला असला तरी कायद्याचे अडथळे दूर झाल्याने विकासाचा मार्ग सुकर झाला आहे. त्यामुळे येत्या काही वर्षातच सातपुडा निश्चितच पुर्णत: बदलून समाजाच्या मुख्य प्रवाहात विकासाच्या पथावर वाटचाल करतांना दिसेल असे मत    आमदार अॅड.के.सी.पाडवी यांनी ‘लोकमत’शी बोलतांना व्यक्त केले.आमदार अॅड.के.सी.पाडवी यांनी ‘लोकमत’ कार्यालयास सदिच्छा भेट दिली. ‘लोकमत’चे निवासी संपादक मिलिंद कुळकर्णी यांनी त्यांचे स्वागत केले. आमदार अॅड.पाडवी यांनी विविध बाबींवर दिलखुलास चर्चा केली. त्यांनी सांगितले, आपण विद्यार्थी दशेपासून संघटनात्मक काम करीत आहोत. नंदुरबारातील जीटीपी महाविद्यालयात शिकत असताना विद्यापीठाच्या सी.आर.पदासाठी थेट निवडणूक लढविली. त्यावेळी केवळ एका मताने आपला पराभव झाला. आदिवासी दुर्गम भागातून येणारा युवक एवढे यश मिळवू शकतो ही भावना प्रबळ झाली आणि तेथून आपल्या संघर्षमय जिवनाला सुरुवात झाली. संघर्षाला सुरुवातयाच काळात अर्थात 1977 मध्ये आदिवासी विद्यार्थी संघटना स्थापन करण्यात आली. तिचे नेतृत्व माङयाकडे देण्यात आले. या माध्यमातून आदिवासी विद्याथ्र्याचे अनेक प्रश्न, समस्या सोडविता आल्या, त्यांना न्याय देता आला. त्यानंतर एलएलबीसाठी पुणे येथे गेलो. या माध्यमातून सेवादलाच्या लोकांशी तसेच अनेक प्रभावी राजकारणी, विचारवंत यांच्याशी संपर्क आला. विद्यापीठ नामांतर लढय़ात रामदास आठवले यांच्यासोबत तुरुंगात गेलो. धुळे येथे वकिलीची प्रॅक्टीस करीत असताना 1989 मध्ये जनता दलातर्फे थेट लोकसभा निवडणुकीचे तिकिट मिळाले. कुठलीही राजकीय पाश्र्वभूमी नसताना केवळ तरुणाईच्या पाठबळावर आणि स्व.पी.के.अण्णा पाटील यांच्या सहकार्याने पहिल्याच निवडणुकीत तब्बल एक लाख 35 हजार मते मिळविली. हाच प्रचार आणि अनुभव 1990 च्या विधानसभा निवडणुकीसाठी कामी आला. जनता दलातर्फेच अक्राणी मतदारसंघात निवडणूक लढवून मोठय़ा मताधिक्याने विजयी झालो. तेव्हापासून सातपुडय़ाचे  प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी अंगावर आली. लोकांची केलेली कामे, जोडून ठेवलेल्या कार्यकत्र्याच्या बळावर आपण 27 वर्षापासून या भागाचे नेतृत्व करीत असल्याचे त्यांनी सांगितले.  विकासासाठी मलमपट्टी नव्हे तर सजर्रीच आवश्यक असल्याचे ते म्हणाले.