शहरं
Join us  
Trending Stories
1
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
2
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
3
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
4
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
5
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
6
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
7
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
8
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
9
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
10
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
11
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
12
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
13
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
14
प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला मिळाला राष्ट्रीय अध्यक्ष; या व्यक्तीवर जबाबदारी...
15
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
16
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
17
'कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा', डॉ.दीपक सावंत यांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र
18
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
19
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
20
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?

विकासासाठी मलमपट्टी नव्हे तर सजर्रीच व्हावी

By admin | Updated: April 1, 2017 16:57 IST

सातपुडय़ातील विकासाला गेल्या तीन दशकात निश्चितच गती आली आहे.

 

27 वर्षापासून विकासाचा पाठपुरावा : सातपुडाही मुख्य प्रवाहात येत असल्याचा आमदारांना विश्वासनंदुरबार : सातपुडय़ातील विकासाला गेल्या तीन दशकात निश्चितच गती आली आहे. येथील अनेक प्रश्न कायद्याच्या गुंतागुंतीत अडकल्याने त्याच्या पाठपुराव्यासाठी  अधिक वेळ द्यावा लागला असला तरी कायद्याचे अडथळे दूर झाल्याने विकासाचा मार्ग सुकर झाला आहे. त्यामुळे येत्या काही वर्षातच सातपुडा निश्चितच पुर्णत: बदलून समाजाच्या मुख्य प्रवाहात विकासाच्या पथावर वाटचाल करतांना दिसेल असे मत    आमदार अॅड.के.सी.पाडवी यांनी ‘लोकमत’शी बोलतांना व्यक्त केले.आमदार अॅड.के.सी.पाडवी यांनी ‘लोकमत’ कार्यालयास सदिच्छा भेट दिली. ‘लोकमत’चे निवासी संपादक मिलिंद कुळकर्णी यांनी त्यांचे स्वागत केले. आमदार अॅड.पाडवी यांनी विविध बाबींवर दिलखुलास चर्चा केली. त्यांनी सांगितले, आपण विद्यार्थी दशेपासून संघटनात्मक काम करीत आहोत. नंदुरबारातील जीटीपी महाविद्यालयात शिकत असताना विद्यापीठाच्या सी.आर.पदासाठी थेट निवडणूक लढविली. त्यावेळी केवळ एका मताने आपला पराभव झाला. आदिवासी दुर्गम भागातून येणारा युवक एवढे यश मिळवू शकतो ही भावना प्रबळ झाली आणि तेथून आपल्या संघर्षमय जिवनाला सुरुवात झाली. संघर्षाला सुरुवातयाच काळात अर्थात 1977 मध्ये आदिवासी विद्यार्थी संघटना स्थापन करण्यात आली. तिचे नेतृत्व माङयाकडे देण्यात आले. या माध्यमातून आदिवासी विद्याथ्र्याचे अनेक प्रश्न, समस्या सोडविता आल्या, त्यांना न्याय देता आला. त्यानंतर एलएलबीसाठी पुणे येथे गेलो. या माध्यमातून सेवादलाच्या लोकांशी तसेच अनेक प्रभावी राजकारणी, विचारवंत यांच्याशी संपर्क आला. विद्यापीठ नामांतर लढय़ात रामदास आठवले यांच्यासोबत तुरुंगात गेलो. धुळे येथे वकिलीची प्रॅक्टीस करीत असताना 1989 मध्ये जनता दलातर्फे थेट लोकसभा निवडणुकीचे तिकिट मिळाले. कुठलीही राजकीय पाश्र्वभूमी नसताना केवळ तरुणाईच्या पाठबळावर आणि स्व.पी.के.अण्णा पाटील यांच्या सहकार्याने पहिल्याच निवडणुकीत तब्बल एक लाख 35 हजार मते मिळविली. हाच प्रचार आणि अनुभव 1990 च्या विधानसभा निवडणुकीसाठी कामी आला. जनता दलातर्फेच अक्राणी मतदारसंघात निवडणूक लढवून मोठय़ा मताधिक्याने विजयी झालो. तेव्हापासून सातपुडय़ाचे  प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी अंगावर आली. लोकांची केलेली कामे, जोडून ठेवलेल्या कार्यकत्र्याच्या बळावर आपण 27 वर्षापासून या भागाचे नेतृत्व करीत असल्याचे त्यांनी सांगितले.  विकासासाठी मलमपट्टी नव्हे तर सजर्रीच आवश्यक असल्याचे ते म्हणाले.